शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

सेवानिवृत्त जवानांना जनतेचा सलाम । गावोगावी वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:38 PM

पूर्वी सैन्य दलातून एखादा सैनिक सेवानिवृत्त झाल्याचे कोणाला समजायचेही नाही. मात्र, आता या उलट चित्र सगळीकडे पाहायला मिळतेय. सेवानिवृत्त होणा-या सैनिकांचे जंगी स्वागत करण्यासाठी आख्खं गाव महिनाभरापासून तयारी करत असते.

ठळक मुद्देदेशाभिमान जागृत

दत्ता यादव ।सातारा : सैन्य दलातील जवानांप्रती लोकांमध्ये आत्मीयता वाढत असून, देशसेवा करून आपल्या घरी परतणाऱ्या सैनिकांना जनताच आता सॅल्यूट ठोकत आहे. आख्खं गाव सेवानिवृत्त सैनिकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असून, कोणी घोड्यावर तर कोणी अश्वरथामध्ये बसवून सैनिकांची वाजत-गाजत मिरवणूक काढत आहे. हे चित्र अलीकडे अनेक ठिकाणी पाहायला मिळत असून, लोकांमध्ये देशाभिमानही जागृत होत आहे.

सातारा जिल्हा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळात लढाईमध्येही मोठे योगदान दिले आहे. ही परंपरा आपल्या सैनिकांनी आजतागायत सुरूच ठेवली आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातून सैन्य दलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मिल्ट्री अपशिंगे हे गाव केवळ त्या गावातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्य दलात भरती होत असल्यामुळे त्या गावाला मिल्ट्री अपशिंगे असे संबोधले जाते. मात्र, आता ही परिस्थिती राहिली नाही. मिल्ट्री अपशिंगेसारखी अनेक गावे आता सैनिकांची म्हणून ओळखू लागली आहेत. एका-एका गावात दोनशे ते चारशे युवक सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यामुळे जवानांबद्दल समाजात आदर आणि सहानुभूतीही निर्माण होत आहे.

पूर्वी सैन्य दलातून एखादा सैनिक सेवानिवृत्त झाल्याचे कोणाला समजायचेही नाही. मात्र, आता या उलट चित्र सगळीकडे पाहायला मिळतेय. सेवानिवृत्त होणा-या सैनिकांचे जंगी स्वागत करण्यासाठी आख्खं गाव महिनाभरापासून तयारी करत असते. ज्या दिवशी सेवा संपवून सैनिक गावात येतात. त्या दिवशी गावातील सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत.

सेवानिवृत्त सैनिकांना घोड्यावर तर कोणी उघड्या जीपमधून जवानांची गावातून वाजत-गाजत फुलांचा वर्षाव करत मिरवणूक काढत आहे. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने जवानांचे स्वागत करण्याची परंपरा आता गावोगावी सुरू झाली आहे. यामुळे तरुणांना प्रेरणा मिळत आहे.

आपल्या स्वागतासाठी जनतेकडून आपुलकी आणि भावना अशा प्रकारे व्यक्त होत असल्याचे पाहून अनेक जवान भारावून जात आहेत. तर अनेक जवानांना अश्रूही आवरता येत नाहीत. ‘भारत माता की जय,’चा गजर करत जनतेमधून देशाभिमान जागृत केला जात आहे. अशा प्रकारे कोणत्याही नोकरीतून एखादा सेवानिवृत्त झाला तर त्याचे स्वागत होत नसते. मात्र, याला सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान अपवाद ठरले आहेत.

थरारक अनुभवातून डबडबतायत डोळे..सैन्य दलातून जवान निवृत्त झाल्यानंतर त्यांचा गावागावांत आणि शाळांमध्ये सन्मापूर्वक गौरव होत आहे. यावेळी जवानांना देशसेवेतील आपले अनुभव कसे होते, याबाबत बोलण्यास सांगितले जाते. त्यावेळी जवानांकडून सांगितलेले थरारक अनुभव ऐकून अनेकांचे डोळे पाणावून जातात. सोबत असलेल्या शहीद जवानांच्या आठवणीने व्याकूळ झालेले सेवा निवृत्त जवानही आठवणींना उजाळा देऊन यावेळी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देताना दिसत आहेत.

क-हाड येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्यावतीने बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी-पुणे येथून सेवानिवृत्त झालेल्या जवानांची घोड्यांवरून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर