शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त जवानांना जनतेचा सलाम । गावोगावी वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:40 IST

पूर्वी सैन्य दलातून एखादा सैनिक सेवानिवृत्त झाल्याचे कोणाला समजायचेही नाही. मात्र, आता या उलट चित्र सगळीकडे पाहायला मिळतेय. सेवानिवृत्त होणा-या सैनिकांचे जंगी स्वागत करण्यासाठी आख्खं गाव महिनाभरापासून तयारी करत असते.

ठळक मुद्देदेशाभिमान जागृत

दत्ता यादव ।सातारा : सैन्य दलातील जवानांप्रती लोकांमध्ये आत्मीयता वाढत असून, देशसेवा करून आपल्या घरी परतणाऱ्या सैनिकांना जनताच आता सॅल्यूट ठोकत आहे. आख्खं गाव सेवानिवृत्त सैनिकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असून, कोणी घोड्यावर तर कोणी अश्वरथामध्ये बसवून सैनिकांची वाजत-गाजत मिरवणूक काढत आहे. हे चित्र अलीकडे अनेक ठिकाणी पाहायला मिळत असून, लोकांमध्ये देशाभिमानही जागृत होत आहे.

सातारा जिल्हा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळात लढाईमध्येही मोठे योगदान दिले आहे. ही परंपरा आपल्या सैनिकांनी आजतागायत सुरूच ठेवली आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातून सैन्य दलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मिल्ट्री अपशिंगे हे गाव केवळ त्या गावातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्य दलात भरती होत असल्यामुळे त्या गावाला मिल्ट्री अपशिंगे असे संबोधले जाते. मात्र, आता ही परिस्थिती राहिली नाही. मिल्ट्री अपशिंगेसारखी अनेक गावे आता सैनिकांची म्हणून ओळखू लागली आहेत. एका-एका गावात दोनशे ते चारशे युवक सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यामुळे जवानांबद्दल समाजात आदर आणि सहानुभूतीही निर्माण होत आहे.

पूर्वी सैन्य दलातून एखादा सैनिक सेवानिवृत्त झाल्याचे कोणाला समजायचेही नाही. मात्र, आता या उलट चित्र सगळीकडे पाहायला मिळतेय. सेवानिवृत्त होणा-या सैनिकांचे जंगी स्वागत करण्यासाठी आख्खं गाव महिनाभरापासून तयारी करत असते. ज्या दिवशी सेवा संपवून सैनिक गावात येतात. त्या दिवशी गावातील सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत.

सेवानिवृत्त सैनिकांना घोड्यावर तर कोणी उघड्या जीपमधून जवानांची गावातून वाजत-गाजत फुलांचा वर्षाव करत मिरवणूक काढत आहे. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने जवानांचे स्वागत करण्याची परंपरा आता गावोगावी सुरू झाली आहे. यामुळे तरुणांना प्रेरणा मिळत आहे.

आपल्या स्वागतासाठी जनतेकडून आपुलकी आणि भावना अशा प्रकारे व्यक्त होत असल्याचे पाहून अनेक जवान भारावून जात आहेत. तर अनेक जवानांना अश्रूही आवरता येत नाहीत. ‘भारत माता की जय,’चा गजर करत जनतेमधून देशाभिमान जागृत केला जात आहे. अशा प्रकारे कोणत्याही नोकरीतून एखादा सेवानिवृत्त झाला तर त्याचे स्वागत होत नसते. मात्र, याला सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान अपवाद ठरले आहेत.

थरारक अनुभवातून डबडबतायत डोळे..सैन्य दलातून जवान निवृत्त झाल्यानंतर त्यांचा गावागावांत आणि शाळांमध्ये सन्मापूर्वक गौरव होत आहे. यावेळी जवानांना देशसेवेतील आपले अनुभव कसे होते, याबाबत बोलण्यास सांगितले जाते. त्यावेळी जवानांकडून सांगितलेले थरारक अनुभव ऐकून अनेकांचे डोळे पाणावून जातात. सोबत असलेल्या शहीद जवानांच्या आठवणीने व्याकूळ झालेले सेवा निवृत्त जवानही आठवणींना उजाळा देऊन यावेळी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देताना दिसत आहेत.

क-हाड येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्यावतीने बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी-पुणे येथून सेवानिवृत्त झालेल्या जवानांची घोड्यांवरून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर