शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:56 IST

..तर टोल नाही टोले देऊ !

उंब्रज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून अन्यायकारकपणे टोलवसुली केली जात आहे. याच्या विरोधात उंब्रजसह परिसरातील नागरिकांनी रविवारी शेकडो चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह टोलनाक्याची सातारा ते कऱ्हाडला जाणारी वाहतूक रोखून आंदोलन केले.उंब्रजसह परिसरातील शेकडो नागरिकांनी चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह रविवारी सकाळी अकराच्या सुमारास तासवडे टोल नाक्याची सातारा-कऱ्हाड वाहतूक रोखली. टोल प्रशासनाला स्थानिकांना टोल नाक्याच्या स्थापनेपासून सुरू असणारी टोलमाफी कायम ठेवावी या मागणीचे निवेदन दिले. टोल आजपर्यंत दिला नाही, पुढेही टोल देणार अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. टोल प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक थोरात यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कऱ्हाड पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर उपस्थित होते. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तासवडे टोल नाक्यावर मागील आठ ते दहा दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या फास्ट टॅगमधून वाहनाने टोल परिससरात ये-जा केल्यानंतर आपोआप पैसे कापले जात होते. यामध्ये फास्ट टॅग घरी असला तरी काहींना मेसेज आल्याने स्थानिकांत नाहक भुर्दंड बसू लागल्याने रोष निर्माण होऊ लागला होता. याबाबत ३० जून रोजी उद्धवसेनेचे कऱ्हाड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांनी निवेदन दिले होते. तरीही टोल प्रशासनाने स्थानिकांची टोल वसुली सुरूच ठेवल्याने वाहनांसह मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यानुसार रविवारी सकाळी अकरा वाजता परिसरातील आंदोलक वाहनांसह एकत्र जमा होऊन तासवडे टोलनाका परिसरात मार्गस्थ झाले.यावेळी उंब्रजचे सरपंच योगराज जाधव, मार्केट कमिटी संचालक सोमनाथ जाधव, उंब्रज ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, संजय भोसले तसेच ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ‘न्हाय’च्या कोल्हापूर कार्यालयास माहिती देऊन शासनाने मानवरहित टोल ही संकल्पना अवलंबली असल्याने नवीन पद्धतीने केली जाणारी टोल वसुली यंत्रणा अवलंबल्याने स्थानिकांचा टोल कापला जात आहे. वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून समन्वय काढून अडचणीतून मार्ग काढणार आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.

..तर टोल नाही टोले देऊ !आजी-माजी स्थानिक लोकप्रतिनिधी शांत आहेत. नागरिकांच्या अडचणी त्यांना समजत नाहीत का? टोल नाक्यावर ये-जा करीत असताना स्थानिक नागरिकांचे वाहन सोडले जाते. गाडी टोल पास करून पुढे आल्यानंतर टोल कटिंग मेसेज येतो. हा वाहनधारकांच्या खिशावर दरोडा आहे. हे त्वरित न थांबल्यास टोल नाहीच पण टोले दिले जातील, असा इशारा उंब्रजचे सरपंच योगराज जाधव यांनी दिला.

टोलनाका स्थापनेपासून टोल दिला नाही व यापुढेही देणार नाही. स्थानिकांना दैनंदिन गोष्टीसाठी टोलनाक्यावरून ये-जा करावी लागते. वाहनधारकांच्या नकळत त्यांचे टोल कट होत आहेत, हा अन्याय स्थानिक कदापि सहन करणार नाहीत. - सोमनाथ जाधव, संचालक, शेती उत्पन्न बाजार समिती कऱ्हाड.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाagitationआंदोलन