शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:56 IST

..तर टोल नाही टोले देऊ !

उंब्रज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून अन्यायकारकपणे टोलवसुली केली जात आहे. याच्या विरोधात उंब्रजसह परिसरातील नागरिकांनी रविवारी शेकडो चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह टोलनाक्याची सातारा ते कऱ्हाडला जाणारी वाहतूक रोखून आंदोलन केले.उंब्रजसह परिसरातील शेकडो नागरिकांनी चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह रविवारी सकाळी अकराच्या सुमारास तासवडे टोल नाक्याची सातारा-कऱ्हाड वाहतूक रोखली. टोल प्रशासनाला स्थानिकांना टोल नाक्याच्या स्थापनेपासून सुरू असणारी टोलमाफी कायम ठेवावी या मागणीचे निवेदन दिले. टोल आजपर्यंत दिला नाही, पुढेही टोल देणार अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. टोल प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक थोरात यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कऱ्हाड पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर उपस्थित होते. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तासवडे टोल नाक्यावर मागील आठ ते दहा दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या फास्ट टॅगमधून वाहनाने टोल परिससरात ये-जा केल्यानंतर आपोआप पैसे कापले जात होते. यामध्ये फास्ट टॅग घरी असला तरी काहींना मेसेज आल्याने स्थानिकांत नाहक भुर्दंड बसू लागल्याने रोष निर्माण होऊ लागला होता. याबाबत ३० जून रोजी उद्धवसेनेचे कऱ्हाड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांनी निवेदन दिले होते. तरीही टोल प्रशासनाने स्थानिकांची टोल वसुली सुरूच ठेवल्याने वाहनांसह मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यानुसार रविवारी सकाळी अकरा वाजता परिसरातील आंदोलक वाहनांसह एकत्र जमा होऊन तासवडे टोलनाका परिसरात मार्गस्थ झाले.यावेळी उंब्रजचे सरपंच योगराज जाधव, मार्केट कमिटी संचालक सोमनाथ जाधव, उंब्रज ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, संजय भोसले तसेच ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ‘न्हाय’च्या कोल्हापूर कार्यालयास माहिती देऊन शासनाने मानवरहित टोल ही संकल्पना अवलंबली असल्याने नवीन पद्धतीने केली जाणारी टोल वसुली यंत्रणा अवलंबल्याने स्थानिकांचा टोल कापला जात आहे. वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून समन्वय काढून अडचणीतून मार्ग काढणार आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.

..तर टोल नाही टोले देऊ !आजी-माजी स्थानिक लोकप्रतिनिधी शांत आहेत. नागरिकांच्या अडचणी त्यांना समजत नाहीत का? टोल नाक्यावर ये-जा करीत असताना स्थानिक नागरिकांचे वाहन सोडले जाते. गाडी टोल पास करून पुढे आल्यानंतर टोल कटिंग मेसेज येतो. हा वाहनधारकांच्या खिशावर दरोडा आहे. हे त्वरित न थांबल्यास टोल नाहीच पण टोले दिले जातील, असा इशारा उंब्रजचे सरपंच योगराज जाधव यांनी दिला.

टोलनाका स्थापनेपासून टोल दिला नाही व यापुढेही देणार नाही. स्थानिकांना दैनंदिन गोष्टीसाठी टोलनाक्यावरून ये-जा करावी लागते. वाहनधारकांच्या नकळत त्यांचे टोल कट होत आहेत, हा अन्याय स्थानिक कदापि सहन करणार नाहीत. - सोमनाथ जाधव, संचालक, शेती उत्पन्न बाजार समिती कऱ्हाड.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाagitationआंदोलन