शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
5
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
6
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
7
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
8
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
9
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
10
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
11
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
12
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
13
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
14
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
15
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
16
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
17
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
18
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
19
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
20
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...

Kaas plateau: कास पठार घेणार मोकळा श्वास!, संरक्षक जाळ्या काढण्यास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 15:42 IST

वन्यप्राण्यांपासून फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून फुलणाऱ्या फुलांचे प्रमाण कमी होताना दिसत होते

सागर चव्हाण

पेट्री : शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावरील तारेची संरक्षक जाळी काढण्याचे काम सुरू असल्याने कास पठार आता मोकळा श्वास घेणार आहे. याचा फायदा फुलांच्या हंगामात दुर्मीळ फुलांच्या वाढीसाठी होणार असल्याचे बोलले जात आहे.जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावर दरवर्षी फुलांच्या हंगामात विविधरंगी तसेच दुर्मीळ फुले फुलतात. दरम्यान हा फुलोत्सव पाहण्यासाठी जिल्हा, राज्य, देश-विदेशातून लाखो पर्यटक कास पठाराला भेट देत असतात. गेल्या काही वर्षांपासून फुलणाऱ्या फुलांचे प्रमाण कमी होतानाचे चित्र दिसत असल्याने वन्यप्राणी तसेच गाई, गुरे मुक्तपणे संचार करून शेणखत उपलब्ध झाल्यास तसेच या प्राण्यांचा वावर मुक्तपणे सर्वत्र पठारावर असल्यास फुले फुलण्याच्या प्रमाणात वाढ होईल. संरक्षक जाळी हटविली जावी, यासाठी अनेकांनी आपले मत व्यक्त केले होते.तसेच जाळी बसविल्यापासूनच ‘लोकमत’नेही या संरक्षक जाळ्या बसविण्याला प्रखर विरोध केला होता. दरम्यान तेव्हाच संरक्षक जाळ्या हटविल्या असत्या तर आज फुलांचे अत्यल्प प्रमाण पाहायला मिळाले नसते असे अनेक पर्यटकांनी मत व्यक्त केले. पठारावरील फुलांचे प्रमाण कमी होण्यामागे अति पाऊस हे जरी कारण पुढे येत असले तरी ते निसर्गतः आहे. निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही; परंतु प्राण्यांचा मुक्त संचार पठारावर झाल्यास फुले फुलण्याचे प्रमाण निश्चित वाढू शकेल. ही उपाययोजना आपल्या हातात असून, याचा निश्चितच फायदा येथून पुढे फुलत्या फुलोत्सवावरून पाहावयास मिळेल, असे मत व्यक्त केले जात आहे. तसेच फुलांच्या हंगामात वर्दळ वाढून फुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरुपात संरक्षक जाळीची सोय केली जाणार असल्याचे सांगितले. 

कुमुदिनी परिसरात फुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामानाने इतरत्र रस्त्यालगत फुलांचे प्रमाण कमी असल्याने गुरे सर्वत्र चरणे आवश्यक आहे. परिसरात गुरांचे प्रमाण वाढून गुरे चारण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. याचा फायदा फुलांच्या वाढीवर नक्कीच होईल. -सचिन पवार, सातारा, पर्यटककास पठार समिती व वनविभागामार्फत संरक्षक जाळी लावण्यात आली होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या जाळीचा दुष्परिणाम फुलांच्या हंगामावर होत असल्याने आजपासून जाळी काढण्याचे काम सुरू आहे. आता वन्यप्राण्यांसाठी पठार परिसर मोकळा होत असून, पुढील फुलांचा हंगाम पूर्वीप्रमाणे येईल, अशी अपेक्षा आहे. हंगाम काळात फुलांच्या संरक्षणासाठी तात्पुरती जाळी बसवली जाणार आहे. - रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारforest departmentवनविभाग