शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

वडूजमध्ये अल्पवयीन दुचाकीस्वारांचा सुळसुळाट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

वडूज : शाळा, काॅलेज आणि इतर शैक्षणिक शिक्षणासाठी वेळेत पोहोचण्यासाठी अल्पवयीन मुला-मुलींकडून वडूज शहरात सर्रास दुचाकींचा वापर होत आहे. ...

वडूज : शाळा, काॅलेज आणि इतर शैक्षणिक शिक्षणासाठी वेळेत पोहोचण्यासाठी अल्पवयीन मुला-मुलींकडून वडूज शहरात सर्रास दुचाकींचा वापर होत आहे. तसेच या दुचाकीस्वारांच्या वाहनांचा वेगही जादा असल्याने अनेकवेळा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अशा घटना थोपविण्यासाठी पालकांबरोबरीने पोलीस प्रशासनाकडून शहरात धडक मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शाळेपासून आपण जवळच राहतो, काय हरकत आहे, मुलाने गाडी नेली तर? पाच मिनिटांचे काम आहे, ये पटकन बाजारात जाऊन, घरी सोडायला कोण नाही, जा गाडी घेऊन‌... हे अतिलाडाचे प्रकार कोठे तरी थांबविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. मुलांच्या हट्टापायी आपण त्यांना नवीन गाडी घेऊन देतो. अल्पवयीन मुलांकडे समयसूचकतेचे प्रमाण फारच कमी असल्याने वाहन चालवताना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. तर? प्रसंगावधान मूलमंत्राचे ज्ञान अपुरे असल्याने अनेक अपघाती प्रसगांना पालकांसह अल्पवयीन चालकाला प्रसंगी मोठी किंमत मोजावी लागली आहे. हीच दुचाकी कधी-कधी त्यांच्याकरिता घातक ठरू शकते. केवळ पालकांनीच नव्हे, तर? समाजातील प्रत्येक घटकाने याकरिता पुढाकार घेणे आवश्यक आहे. शाळांनीही दुचाकी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मज्जाव करून, अल्पवयात गाडी चालविणे किती घातक ठरू शकते, याचे गांभीर्य पटवून देणे काळाची गरज बनली आहे.

पोलीस प्रशासनानेही यांच्यावर दंडात्मक कारवाई करून अल्पवयीन वाहन चालकांवर अंकुश ठेवणे अत्यावश्यक आहे. वाहनचालक परवाना नसताना व अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालवणे गुन्हा असताना देखील पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत, हाच मुळात कळीचा मुद्दा बनला आहे. पोलिसांच्या गांधारीच्या भूमिकेमुळे वडूज शहरात हेच अल्पवयीन दुचाकीस्वार बिनधास्तपणे आणि राजरोसपणे वाहने मिरवत आहेत.

पालक, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये, पोलीस प्रशासन व समाजातील प्रत्येक घटकाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. रस्त्यावरील वाढत असलेले अपघात व अपघातात होणारे शरीराचे कधीही भरून न येणारे नुकसान आणि प्रसंगी अल्पवयीन मुला-मुलींचे जाणारे प्राण, ही खूपच वेदना देणारी बाब आहे. यासाठी सर्वच स्तरातून प्रबोधन होणे आवश्यक आहे. तसेच अल्पवयीन मुला-मुलींनीही वाहने चालविण्याच्या बालहट्टाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील राहिले, तरच संभाव्य गंभीर अपघात टाळले जाऊ शकतील.

चौकट

अल्पवयीन व्यक्तीनं गुन्हा केल्यास वाहनाच्या मालकाला दोषी ठरवलं जाईल आणि २५ हजार रुपये दंडासोबत ३ वर्षांचा तुरुंगवास होईल. शिवाय, गाडीची नोंदणी एक वर्षासाठी रद्द केली जाईल. तसेच अल्पवयीन आरोपी २५ वर्षांचा होईपर्यंत त्याला वाहन परवाना दिला जाणार नाही.

फोटो- संग्रहीत फोटो दुचाकीस्वार फीचर वापरणे