शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

प्रथमच एक कोटी क्विंटल साखर उत्पादन- सातारा जिल्ह्यातील विक्रमी गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:38 IST

वाठार स्टेशन : चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी आत्तापर्यंतच्या गाळपाच्या सीमा पार करत १८ एप्रिलअखेर ८६ लाख ७७ हजार २०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले.

ठळक मुद्देगाळपात सह्याद्री कारखान्याची आघाडी तर कृष्णेचा साखर उतारा सर्वाधिक

संजय कदम ।वाठार स्टेशन : चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी आत्तापर्यंतच्या गाळपाच्या सीमा पार करत १८ एप्रिलअखेर ८६ लाख ७७ हजार २०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. तर १ कोटी ३ लाख ७७ हजार ४०५ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या एकूण साखर कारखान्यांपैकी जवळपास नऊ कारखान्यांचे गाळप उसाअभावी बंद झाले आहे. उर्वरित सर्वच कारखाने दि. २५ ते ३० एप्रिलअखेर बंद होतील, अशी माहिती साखर कारखानदारांनी दिली आहे.सातारा जिल्ह्याचा गाळप हंगाम यंदा दि. ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. जवळपास १५० ते १६० दिवसांच्या या हंगामात एकूण १४ कारखान्यांपैकी यंत्रणेअभावी प्रतापगड कारखाना सुरुवातीपासूनच बंद राहिला तर उर्वरित सर्व १३ कारखाने मार्च अखेरपर्यंत गाळपास सज्ज राहिले. दि. १८ एप्रिलअखेर जवळपास नऊ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. सह्याद्री कारखान्याने आतापर्यंत सर्वाधिक १२ लाख ५६ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप करत १५ लाख ६२ हजार १९५ क्विंटल साखर उत्पादित केली. या कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक साखरनिर्मिती केली आहे. तर या पाठोपाठ कृष्णा सहकारी कारखान्याने ११ लाख ५७ हजार २५० टन उसाचे गाळप करत १४ लाख ७२ हजार २८० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. या कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक १२.७२ एवढा राहिला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर जरंडेश्वर शुगर मिल्स हा कारखाना राहिला असून, या कारखान्याने ९ लाख १० हजार ९३० मेट्रिक टन उसाचे गाळप करत १० लाख ९८ हजार ५७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.याशिवाय शरयू कारखान्याने ८ लाख ४१ हजार ५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ९ लाख १७ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. स्वराज ४ लाख ९४ हजार ३३ टन उसाचे गाळप करत ५ लाख ३४ हजार ३५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. ग्रीन पॉवरने ६ लाख १४ मेट्रिक टन गाळप पूर्ण करत ७ लाख १ हजार ८९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जयवंत शुगरने ६ लाख १४ हजार १० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ९६ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. न्यू फलटण साखरवाडी कारखान्याने २ लाख ८३ हजार ४५७ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करत ३ लाख ३ हजार २५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. खंडाळा तालुका साखर कारखान्याने २ लाख ९१ हजार १६० मेट्रिक टन ऊस गाळप करून ३ लाख ३३ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.रयत कारखान्याने ४ लाख ४४ हजार ९४० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. अजिंक्यतारा कारखान्याने ६ लाख ७ हजार ९८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ३३ हजार ८२० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने २ लाख ४२ हजार २५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. किसन वीर कारखान्याने ८ लाख १८ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर श्रीराम कारखान्याने ३ लाख ८५ हजार ९३५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ४ लाख ४८ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.चार कारखान्यांचे गाळप लवकरच संपणारउसाअभावी जिल्ह्यातील श्रीराम-(जवाहर) फलटण, लोकनेते बाळासाहेब देसाई पाटण, रयत कºहाड, न्यू फलटण साखरवाडी, स्वराज फलटण, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर, जयवंत शुगर, ग्रीन पॉवर गोपूज, शरयू फलटण या नऊ कारखान्यांचे गाळप दि. १५ एप्रिलअखेर बंद झाले आहे. तर उर्वरित चार कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिलअखेर संपणार आहे.वर्ष साखर गाळप मे. टन साखर (लाख क्विंटल)२०१४-१५ ७५ लाख ६५ हजार ६३२ ८९ लाख ६ हजार २९२०१५-१६ ७७ लाख ६५ हजार ३७८ ९० लाख ६६ हजार १८२०१६-१७ ५४ लाख ३६ हजार ९३५ ६४ लाख ५१ हजार ७२

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर