शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रथमच एक कोटी क्विंटल साखर उत्पादन- सातारा जिल्ह्यातील विक्रमी गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:38 IST

वाठार स्टेशन : चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी आत्तापर्यंतच्या गाळपाच्या सीमा पार करत १८ एप्रिलअखेर ८६ लाख ७७ हजार २०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले.

ठळक मुद्देगाळपात सह्याद्री कारखान्याची आघाडी तर कृष्णेचा साखर उतारा सर्वाधिक

संजय कदम ।वाठार स्टेशन : चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी आत्तापर्यंतच्या गाळपाच्या सीमा पार करत १८ एप्रिलअखेर ८६ लाख ७७ हजार २०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. तर १ कोटी ३ लाख ७७ हजार ४०५ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या एकूण साखर कारखान्यांपैकी जवळपास नऊ कारखान्यांचे गाळप उसाअभावी बंद झाले आहे. उर्वरित सर्वच कारखाने दि. २५ ते ३० एप्रिलअखेर बंद होतील, अशी माहिती साखर कारखानदारांनी दिली आहे.सातारा जिल्ह्याचा गाळप हंगाम यंदा दि. ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. जवळपास १५० ते १६० दिवसांच्या या हंगामात एकूण १४ कारखान्यांपैकी यंत्रणेअभावी प्रतापगड कारखाना सुरुवातीपासूनच बंद राहिला तर उर्वरित सर्व १३ कारखाने मार्च अखेरपर्यंत गाळपास सज्ज राहिले. दि. १८ एप्रिलअखेर जवळपास नऊ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. सह्याद्री कारखान्याने आतापर्यंत सर्वाधिक १२ लाख ५६ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप करत १५ लाख ६२ हजार १९५ क्विंटल साखर उत्पादित केली. या कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक साखरनिर्मिती केली आहे. तर या पाठोपाठ कृष्णा सहकारी कारखान्याने ११ लाख ५७ हजार २५० टन उसाचे गाळप करत १४ लाख ७२ हजार २८० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. या कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक १२.७२ एवढा राहिला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर जरंडेश्वर शुगर मिल्स हा कारखाना राहिला असून, या कारखान्याने ९ लाख १० हजार ९३० मेट्रिक टन उसाचे गाळप करत १० लाख ९८ हजार ५७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.याशिवाय शरयू कारखान्याने ८ लाख ४१ हजार ५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ९ लाख १७ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. स्वराज ४ लाख ९४ हजार ३३ टन उसाचे गाळप करत ५ लाख ३४ हजार ३५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. ग्रीन पॉवरने ६ लाख १४ मेट्रिक टन गाळप पूर्ण करत ७ लाख १ हजार ८९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जयवंत शुगरने ६ लाख १४ हजार १० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ९६ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. न्यू फलटण साखरवाडी कारखान्याने २ लाख ८३ हजार ४५७ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करत ३ लाख ३ हजार २५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. खंडाळा तालुका साखर कारखान्याने २ लाख ९१ हजार १६० मेट्रिक टन ऊस गाळप करून ३ लाख ३३ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.रयत कारखान्याने ४ लाख ४४ हजार ९४० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. अजिंक्यतारा कारखान्याने ६ लाख ७ हजार ९८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ३३ हजार ८२० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने २ लाख ४२ हजार २५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. किसन वीर कारखान्याने ८ लाख १८ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर श्रीराम कारखान्याने ३ लाख ८५ हजार ९३५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ४ लाख ४८ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.चार कारखान्यांचे गाळप लवकरच संपणारउसाअभावी जिल्ह्यातील श्रीराम-(जवाहर) फलटण, लोकनेते बाळासाहेब देसाई पाटण, रयत कºहाड, न्यू फलटण साखरवाडी, स्वराज फलटण, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर, जयवंत शुगर, ग्रीन पॉवर गोपूज, शरयू फलटण या नऊ कारखान्यांचे गाळप दि. १५ एप्रिलअखेर बंद झाले आहे. तर उर्वरित चार कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिलअखेर संपणार आहे.वर्ष साखर गाळप मे. टन साखर (लाख क्विंटल)२०१४-१५ ७५ लाख ६५ हजार ६३२ ८९ लाख ६ हजार २९२०१५-१६ ७७ लाख ६५ हजार ३७८ ९० लाख ६६ हजार १८२०१६-१७ ५४ लाख ३६ हजार ९३५ ६४ लाख ५१ हजार ७२

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर