शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालल्याने फोडणी झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

सातारा : पाश्चात्य देशांनी निर्यात कर वाढवल्याने खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. साताऱ्यात तर तेलाचा डबा २,१०० ते ...

सातारा : पाश्चात्य देशांनी निर्यात कर वाढवल्याने खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. साताऱ्यात तर तेलाचा डबा २,१०० ते २,६०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे भाजीची फोडणी कमी झाली आहे तर डाळींचे दर स्थिर असून, कांदा आणखी स्वस्त झाला आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांमधून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते. सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ५२७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली तर कांद्याची ३९५ क्विंटलची आवक झाली. या रविवारी कांद्याची आवक चांगली झाली. बाजार समितीत वांग्याला १० किलोला अवघा ८० ते १०० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ६० ते ७० रुपयेे, कोबी ३० ते ५० रुपये, फ्लाॅवरला ६० ते ८० रुपये, दोडका अन् कारल्याला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. इतर पालेभाज्यांचे दरही स्थिर होते.

कलिंगडाची आवक

साताऱ्यात सध्या कलिंगड आणि द्राक्षाची आवक अधिक आहे. त्यामुळे दरात फार वाढ झालेली नाही. कलिंगड १० रुपयांपासून तर द्राक्षे ४० रुपये किलो दराने मिळत आहेत.

खाद्यतेलात वाढ कायम

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मागील आठवड्यात १५ किलोचा सूर्यफूल तेल डबा २,५०० ते २,५५०, सोयाबीन २,१०० ते २,२०० तर शेंगदाणा तेल डबा २,४०० ते २,६००पर्यंत होता. तर एक लीटरचा शेंगदाणा तेल पाऊच १६५ ते १८०, सोयाबीन १३० ते १३५, सूर्यफूलचा पाऊच १६५ ते १७० रुपयांपर्यंत मिळत होता.

लसूण दर कमी

बाजार समितीत अनेक भाज्यांना कमी दर मिळत आहे. गवारला १० किलोला ४०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवगा शेंगला अवघा १०० ते २००, पावटा ३०० ते ३५० आणि भेंडीला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. तर लसणाचा दर २ ते ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत होता.

कोट :

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कमी होत आहेत. यामुळे दिलासा मिळत असला, तरी खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालले आहेत. त्यामुळे खर्चातही वाढ होत आहे.

- तेजश्री पाटील, ग्राहक

कोट

भारतात ७० टक्के खाद्यतेल आयात होते. कोरोनामुळे पाश्चात्य देशांची अर्थव्यवस्था खालावली. त्यामुळे या देशांनी निर्यात कर वाढवला आहे. परिणामी खाद्यतेलाचे दर वाढले आहेत.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोट

कांद्याचा दर एकदमच खाली आला आहे. त्यामुळे खर्च तरी निघेल का नाही, अशी स्थिती आहे. त्यातच इतर भाज्यांचेही दर कमी झाले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

- परशुराम काटे, शेतकरी

.....................................................................................