शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालल्याने फोडणी झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

सातारा : पाश्चात्य देशांनी निर्यात कर वाढवल्याने खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. साताऱ्यात तर तेलाचा डबा २,१०० ते ...

सातारा : पाश्चात्य देशांनी निर्यात कर वाढवल्याने खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. साताऱ्यात तर तेलाचा डबा २,१०० ते २,६०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे भाजीची फोडणी कमी झाली आहे तर डाळींचे दर स्थिर असून, कांदा आणखी स्वस्त झाला आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांमधून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते. सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ५२७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली तर कांद्याची ३९५ क्विंटलची आवक झाली. या रविवारी कांद्याची आवक चांगली झाली. बाजार समितीत वांग्याला १० किलोला अवघा ८० ते १०० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ६० ते ७० रुपयेे, कोबी ३० ते ५० रुपये, फ्लाॅवरला ६० ते ८० रुपये, दोडका अन् कारल्याला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. इतर पालेभाज्यांचे दरही स्थिर होते.

कलिंगडाची आवक

साताऱ्यात सध्या कलिंगड आणि द्राक्षाची आवक अधिक आहे. त्यामुळे दरात फार वाढ झालेली नाही. कलिंगड १० रुपयांपासून तर द्राक्षे ४० रुपये किलो दराने मिळत आहेत.

खाद्यतेलात वाढ कायम

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मागील आठवड्यात १५ किलोचा सूर्यफूल तेल डबा २,५०० ते २,५५०, सोयाबीन २,१०० ते २,२०० तर शेंगदाणा तेल डबा २,४०० ते २,६००पर्यंत होता. तर एक लीटरचा शेंगदाणा तेल पाऊच १६५ ते १८०, सोयाबीन १३० ते १३५, सूर्यफूलचा पाऊच १६५ ते १७० रुपयांपर्यंत मिळत होता.

लसूण दर कमी

बाजार समितीत अनेक भाज्यांना कमी दर मिळत आहे. गवारला १० किलोला ४०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवगा शेंगला अवघा १०० ते २००, पावटा ३०० ते ३५० आणि भेंडीला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. तर लसणाचा दर २ ते ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत होता.

कोट :

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कमी होत आहेत. यामुळे दिलासा मिळत असला, तरी खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालले आहेत. त्यामुळे खर्चातही वाढ होत आहे.

- तेजश्री पाटील, ग्राहक

कोट

भारतात ७० टक्के खाद्यतेल आयात होते. कोरोनामुळे पाश्चात्य देशांची अर्थव्यवस्था खालावली. त्यामुळे या देशांनी निर्यात कर वाढवला आहे. परिणामी खाद्यतेलाचे दर वाढले आहेत.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोट

कांद्याचा दर एकदमच खाली आला आहे. त्यामुळे खर्च तरी निघेल का नाही, अशी स्थिती आहे. त्यातच इतर भाज्यांचेही दर कमी झाले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

- परशुराम काटे, शेतकरी

.....................................................................................