राजकारण कराल तर उचलबांगडी ! : शिवतारे
By Admin | Updated: January 13, 2015 00:49 IST2015-01-13T00:36:51+5:302015-01-13T00:49:52+5:30
जिल्हा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिला इशारा

राजकारण कराल तर उचलबांगडी ! : शिवतारे
सातारा : ‘सातारा जिल्हा हा ठरावीक पक्षाचा बालेकिल्ला आहे, असे समजून त्याच्या नावावर लोकांची अडवणूक केली तर खपवून घेणार नाही. सरकारी अधिकाऱ्यांचा प्रामाणिकपणा हा जनतेच्या कामांसाठी दिसू द्या. कामे न करणाऱ्या, कामात राजकारण आणणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करेन,’ असा गर्भित इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.
येथील जिल्हा नियोजन भवनात आज, सोमवारी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अश्विन मुद््गल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार दगडू सकपाळ, शिवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, ‘स्थानिक आमदारांच्या दबावाखाली काम करण्याची गरज नाही. आरोप होतील. काम करणाराच चुकतो. सातारचा सर्वांगीण विकास हे धोरण घेऊन आमचे शासन कामाला लागले आहे. यात अकारण राजकारण आणण्याची गरज नाही. विरोधी पक्षातील आमदारांना सोबत घेऊन आम्ही कामे करणार आहोत. मात्र, एखादा आमदार सांगतो आहे म्हणून त्याचंच ऐकायचं, चुकीचं काही तरी रेटायचं, हे आता खपवून घेणार नाही. गेल्या १५ वर्षांत येथील अधिकाऱ्यांना ‘त्यांच्या’ सवयी झाल्या असतील तर त्या आता (पान ९ वर)
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची पाठ
पालकमंत्री विजय शिवतारे यांनी साताऱ्यात घेतलेली ही पहिलीच आढावा बैठक होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच आणि काँग्रेसचे दोन आमदार असून, विधान परिषदेचा एक आमदारही राष्ट्रवादीचा आहे.
यापैकी एकही आमदार या बैठकीस उपस्थित नव्हता. शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची मात्र प्रचंड उपस्थिती यावेळी होती. असे चित्र एरवी दिसत नाही.
जिहे-कटापूर पूर्ण करणार
‘जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यावर आपला भर राहणार आहे. जिहे-कटापूर योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे. या योजनेचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करून नेर तलावात पाणी नेणार आहे,’ अशी गर्जनाही शिवतारे यांनी केली.
‘जिल्ह्यात नदीची वाळू चोरणाऱ्या माफियांची गय करणार नाही. त्यांना हिसका दाखवू,’ असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकाऱ्यांबरोबर
गोपनीय बैठक
पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सत्कार सोहळा संपल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा सर्किट हाउसमध्ये जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यासोबत बंद दरवाज्याआड अर्धा तास गोपनीय बैठक घेतली.
यावेळी सर्व राजकीय पदाधिकारी व इतर अधिकारी यांना बाहेरच ताटकळत ठेवण्यात आले होते. या बैठकीत जिल्ह्याच्या राजकीय पार्श्वभूमीवरील भविष्यातील कामांची चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.