शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

संतोष पोळच्या ३६ खुनाच्या दाव्याने पोलिस संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 20:53 IST

संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणा-या वाई हत्याकांडामध्ये आणखी नव नवे खुलासे होत असून डॉ. संतोष पोळने म्हणे आणखी तीसजणांचे खून केल्याचा दावा केला असून, या नव्या दाव्यामुळे पोलिस संभ्रमात पडले आहेत.

 सातारा - संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणा-या वाई हत्याकांडामध्ये आणखी नव नवे खुलासे होत असून डॉ. संतोष पोळने म्हणे आणखी तीसजणांचे खून केल्याचा दावा केला असून, या नव्या दाव्यामुळे पोलिस संभ्रमात पडले आहेत. संतोष पोळ हा दिशाभूल करत असून मात्र, तरीसुद्धा तपासाचा भाग म्हणून त्याचा तपास घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली असल्याचे पोलिसांनी सांगितले.संतोष पोळने सहा खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र हादरून निघाला होता. एकापाठोपाठ सहा खुनांची मालिका समोर आल्याने डॉ. संतोष पोळचा खरा चेहरा उघड झाला. सुरुवातीला तो मी नव्हेच अशा आविर्भावात असलेल्या संतोष पोळने पोलिसी खाक्यानंतर सहा खुनांची कबुली दिली. मात्र, एवढ्यावरच न थांबता त्याने त्याचवेळी आणखी तीसजणांचे खून केले आहेत, असा दावा वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक वेताळ यांच्याकडे केला होता. मात्र त्याचा हा दावा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी असल्याचे वेताळ यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. संतोष पोळला अटक केल्यानंतर अनेकदा न्यायालयात नेण्यात आले. त्यावेळी त्याने न्यायालयासमोर का सांगितले नाही. आपण ३० खून केले म्हणून. असा प्रश्न उपस्थित करत वेताळ म्हणाले, ज्यावेळी ज्योती मांढरे माफीची साक्षीदार झाल्यानंतर आपण या प्रकरणात अडकलो असल्याचे त्याला जाणवले असेल तेव्हा त्याची मानसिक स्थिती ढासळली. त्यामुळे तो काहीही बोलू लागला. एवढेच नव्हे तर आरोपपत्रामध्ये नमूद असलेल्या साक्षीदारांचीही नावे तो हे सर्वजण खून प्रकरणातील आरोपी आहेत, असे सांगत आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे, असेही वेताळ यांनी सांगितले.दरम्यान, संतोष पोळने तीस खुनांचा दावा करून जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र तरी सुद्धा खातरजमा म्हणून संतोष पोळकडे तपास करणे गरजेचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी न्यायालयाकडे तपासासाठी परवानगी मागितली आहे. आता यावर ९ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे.संतोष पोळ हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटे दावे करत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ३० खून केले आहेत. तर आमच्या डायरीमध्ये ३० जण बेपत्ता हवेत ना. जे बेपत्ता होते. त्यामध्ये काहींनी लग्न केले.- विनायक वेताळ (पोलिस निरीक्षक वाई)

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसCourtन्यायालय