शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

संतोष पोळच्या ३६ खुनाच्या दाव्याने पोलिस संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 20:53 IST

संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणा-या वाई हत्याकांडामध्ये आणखी नव नवे खुलासे होत असून डॉ. संतोष पोळने म्हणे आणखी तीसजणांचे खून केल्याचा दावा केला असून, या नव्या दाव्यामुळे पोलिस संभ्रमात पडले आहेत.

 सातारा - संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणा-या वाई हत्याकांडामध्ये आणखी नव नवे खुलासे होत असून डॉ. संतोष पोळने म्हणे आणखी तीसजणांचे खून केल्याचा दावा केला असून, या नव्या दाव्यामुळे पोलिस संभ्रमात पडले आहेत. संतोष पोळ हा दिशाभूल करत असून मात्र, तरीसुद्धा तपासाचा भाग म्हणून त्याचा तपास घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली असल्याचे पोलिसांनी सांगितले.संतोष पोळने सहा खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र हादरून निघाला होता. एकापाठोपाठ सहा खुनांची मालिका समोर आल्याने डॉ. संतोष पोळचा खरा चेहरा उघड झाला. सुरुवातीला तो मी नव्हेच अशा आविर्भावात असलेल्या संतोष पोळने पोलिसी खाक्यानंतर सहा खुनांची कबुली दिली. मात्र, एवढ्यावरच न थांबता त्याने त्याचवेळी आणखी तीसजणांचे खून केले आहेत, असा दावा वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक वेताळ यांच्याकडे केला होता. मात्र त्याचा हा दावा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी असल्याचे वेताळ यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. संतोष पोळला अटक केल्यानंतर अनेकदा न्यायालयात नेण्यात आले. त्यावेळी त्याने न्यायालयासमोर का सांगितले नाही. आपण ३० खून केले म्हणून. असा प्रश्न उपस्थित करत वेताळ म्हणाले, ज्यावेळी ज्योती मांढरे माफीची साक्षीदार झाल्यानंतर आपण या प्रकरणात अडकलो असल्याचे त्याला जाणवले असेल तेव्हा त्याची मानसिक स्थिती ढासळली. त्यामुळे तो काहीही बोलू लागला. एवढेच नव्हे तर आरोपपत्रामध्ये नमूद असलेल्या साक्षीदारांचीही नावे तो हे सर्वजण खून प्रकरणातील आरोपी आहेत, असे सांगत आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे, असेही वेताळ यांनी सांगितले.दरम्यान, संतोष पोळने तीस खुनांचा दावा करून जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र तरी सुद्धा खातरजमा म्हणून संतोष पोळकडे तपास करणे गरजेचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी न्यायालयाकडे तपासासाठी परवानगी मागितली आहे. आता यावर ९ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे.संतोष पोळ हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटे दावे करत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ३० खून केले आहेत. तर आमच्या डायरीमध्ये ३० जण बेपत्ता हवेत ना. जे बेपत्ता होते. त्यामध्ये काहींनी लग्न केले.- विनायक वेताळ (पोलिस निरीक्षक वाई)

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसCourtन्यायालय