शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

वसना नदीवर अपघाताची शक्यता, पुलाची दुर्दशा : प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 6:42 PM

कोरेगाव तालुक्यातील हा सर्वात महत्त्वाचा पूल असून, या पुलावरून पुणे, अहमदनगरकडे जाणारी अवजड वाहतूक होते. त्याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्'ातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूकदेखील याच पुलावरून होते. पुलाच्या दोन्ही बाजूस तीव्र वळण असल्याने पुलावर नेमके कोणते वाहन आहे, हे इतर वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.

ठळक मुद्दे सातारारोड-जळगाव रस्ता

कोरेगाव : खंडाळा-शिरोळ (जयसिंगपूर) राज्यमार्गावर सातारारोड ते जळगावदरम्यान वसना नदीवरील पुलाची मोठी दुर्दशा झाली असून, संरक्षक पाईप गायब झाल्या आहेत. पुलाला कठडेदेखील नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रचंड वर्दळ असलेल्या या मार्गावरील पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची मागणी होत आहे.

कोरेगाव तालुक्यातील हा सर्वात महत्त्वाचा पूल असून, या पुलावरून पुणे, अहमदनगरकडे जाणारी अवजड वाहतूक होते. त्याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्'ातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूकदेखील याच पुलावरून होते. पुलाच्या दोन्ही बाजूस तीव्र वळण असल्याने पुलावर नेमके कोणते वाहन आहे, हे इतर वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.

पावसाळ्यापासून पुलाची दुर्दशा झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. पावसाळ्याचे निमित्त सांगून वेळ निभावून नेण्यात आली, मात्र पावसाळा उलटून चार महिने झाले तरी पुलाच्या दुरुस्तीचा मुहूर्त लागत नाही. बांधकाम विभागामध्ये अभियंत्यांमध्ये ताळमेळ नसल्याने या पुलाबाबत नेमके कोणते धोरण आहे, याचा उलगडा होत नाही.

  • पर्यायी मार्ग म्हणून सर्वाधिक वापर

सातारा-वाढे-वडूथ-शिवथर-वाठार स्टेशन या २४ तास रहदारी असलेल्या मार्गाला कोरेगाव तालुक्यातील मार्ग हा पर्यायी म्हणून वापरला जातो. मध्यंतरीच्या काळात वडूथ-आरळेदरम्यान कृष्णा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीच्याकाळात वाहतूक वळविण्यात आली होती, ती वाहतूक याच पुलावरून सुरू होती. त्याचबरोबर राष्टÑीय महामार्गावरील टोल वाचविण्यासाठी अनेक अवजड वाहनांचे चालक याच मार्गाचा वापर करतात, त्यामुळे भविष्यात अपघात टाळायचे झाल्यास बांधकाम विभागाने तातडीने पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक बनले आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदी