शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Satara: माणगंगेबरोबरच येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करा; पंतप्रधान मोदींना 'स्वाभिमानी'चे साकडे

By नितीन काळेल | Updated: February 8, 2024 18:58 IST

१९ फेब्रुवारीला माण तालुक्यात पंतप्रधान मोदी येणार 

सातारा : माण तालुक्यातील आंधळी धरण येथे गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना माणगंगेबरोबरच खटावमधील येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करण्याची विनंती केली आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार करुन साकडेही घालण्यात आले आहे.याबाबत संघटनेकडून देण्यात आलेली माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १९ फेब्रुवारी रोजी आंधळी धरण येथे दिवंगत गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपुजनाला येणार आहेत. माण तालुक्याच्या दृष्टीने हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहला जाणार आहे. खरेतर या योजनेची सुरुवात २८ वर्षापूर्वी झाली असलीतरी अनेक हेलकावे खात जिहे कटापूर उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला जात आहे. या योजनेचे पाणी जिहे कटापूरमधून नेर धरणात जाते. त्यानंतर या नेरमधूनच १४ किलोमिटर बोगद्याद्वारे आंधळी धरणात दाखल झाले आहे. आता आंधळी धरणातून माणगंगा नदी प्रवाहित केली जाणार आहे. याच पाण्याचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.माणमधील जलपूजन सोहळा आंधळी धरणात पूर्णत्वास जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करून माण तालुक्याबरोबरच खटावलाही येण्याचे साकडे घातले आहे. कारण, या पाणी योजनेला पंतप्रधान मोदी यांचे गुरू दिवंगत लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव देण्यात आले आहे. इनामदार यांचे मूळ गाव खटाव आहे. त्यांच्याच तालुका आणि गावातून वाहणाऱ्या येरळामाई नदीचाही जिहे कटापूर योजनेत समावेश आहे. या योजनेतूनच येरळामाई नदीवरील १५ बंधारे भरण्याची तरतूद आहे. तसेच योजनेतून खटाव तालुक्यातील जवळपास ११ हजार ७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.सध्या माणबरोबरच खटाव तालुक्यातही दुष्काळ पडला आहे. उरमोडीचे आवर्तनही एक महिना उशिरा सुटले आहे. त्यामुळे पिके वाया गेली आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर खटावच्या जनतेला भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पशुधन अडचणीत येणार आहे. यासाठी येरळामाई प्रवाहित करून खटाववासियांचा आनंद द्विगुणित करण्याची गरज आहे.दरम्यान, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला निमंत्रण पाठवले आहे. हे निमंत्रण कार्यालयाला प्राप्त झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पंतप्रधान कार्यालय उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.

जिहे कटापूर योजनेद्वारे कृष्णामाई माणगंगा आणि येरळामाई नदी प्रवाहित होऊन दुष्काळमुक्ती करेल असे स्वप्न १९९५ पासून खटाव आणि माणमधील जनता उराशी बाळगून आहे. माणगंगा नदीचे निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण प्रवाहित करून जलपूजन केले जात आहे. याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, तो क्षण माणगंगेबरोबरच खटावची वरदायिनी असलेल्या येरळामाईच्या वाट्याला यायला पाहिजे होता. मात्र, असे घडत नसल्याने खटाववासियांना प्रचंड वाईट वाटत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करुन माणगंगेबरोबरच खटावमधील येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. - अनिल पवार, राज्य प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाNarendra Modiनरेंद्र मोदी