शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: माणगंगेबरोबरच येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करा; पंतप्रधान मोदींना 'स्वाभिमानी'चे साकडे

By नितीन काळेल | Updated: February 8, 2024 18:58 IST

१९ फेब्रुवारीला माण तालुक्यात पंतप्रधान मोदी येणार 

सातारा : माण तालुक्यातील आंधळी धरण येथे गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना माणगंगेबरोबरच खटावमधील येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करण्याची विनंती केली आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार करुन साकडेही घालण्यात आले आहे.याबाबत संघटनेकडून देण्यात आलेली माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १९ फेब्रुवारी रोजी आंधळी धरण येथे दिवंगत गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपुजनाला येणार आहेत. माण तालुक्याच्या दृष्टीने हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहला जाणार आहे. खरेतर या योजनेची सुरुवात २८ वर्षापूर्वी झाली असलीतरी अनेक हेलकावे खात जिहे कटापूर उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला जात आहे. या योजनेचे पाणी जिहे कटापूरमधून नेर धरणात जाते. त्यानंतर या नेरमधूनच १४ किलोमिटर बोगद्याद्वारे आंधळी धरणात दाखल झाले आहे. आता आंधळी धरणातून माणगंगा नदी प्रवाहित केली जाणार आहे. याच पाण्याचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.माणमधील जलपूजन सोहळा आंधळी धरणात पूर्णत्वास जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करून माण तालुक्याबरोबरच खटावलाही येण्याचे साकडे घातले आहे. कारण, या पाणी योजनेला पंतप्रधान मोदी यांचे गुरू दिवंगत लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव देण्यात आले आहे. इनामदार यांचे मूळ गाव खटाव आहे. त्यांच्याच तालुका आणि गावातून वाहणाऱ्या येरळामाई नदीचाही जिहे कटापूर योजनेत समावेश आहे. या योजनेतूनच येरळामाई नदीवरील १५ बंधारे भरण्याची तरतूद आहे. तसेच योजनेतून खटाव तालुक्यातील जवळपास ११ हजार ७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.सध्या माणबरोबरच खटाव तालुक्यातही दुष्काळ पडला आहे. उरमोडीचे आवर्तनही एक महिना उशिरा सुटले आहे. त्यामुळे पिके वाया गेली आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर खटावच्या जनतेला भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पशुधन अडचणीत येणार आहे. यासाठी येरळामाई प्रवाहित करून खटाववासियांचा आनंद द्विगुणित करण्याची गरज आहे.दरम्यान, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला निमंत्रण पाठवले आहे. हे निमंत्रण कार्यालयाला प्राप्त झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पंतप्रधान कार्यालय उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.

जिहे कटापूर योजनेद्वारे कृष्णामाई माणगंगा आणि येरळामाई नदी प्रवाहित होऊन दुष्काळमुक्ती करेल असे स्वप्न १९९५ पासून खटाव आणि माणमधील जनता उराशी बाळगून आहे. माणगंगा नदीचे निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण प्रवाहित करून जलपूजन केले जात आहे. याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, तो क्षण माणगंगेबरोबरच खटावची वरदायिनी असलेल्या येरळामाईच्या वाट्याला यायला पाहिजे होता. मात्र, असे घडत नसल्याने खटाववासियांना प्रचंड वाईट वाटत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करुन माणगंगेबरोबरच खटावमधील येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. - अनिल पवार, राज्य प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाNarendra Modiनरेंद्र मोदी