शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली सही बळीराजासाठी!; पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार 'निधी'
2
दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; संजय शिरसाटांच विधान अन् चर्चांना पूर्णविराम
3
सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाची घोषणा
4
जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले...
5
Suresh Gopi : काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण
6
IND vs PAK मॅच बघायला लेकीसह न्यूयॉर्कला गेल्या अमृता फडणवीस, नेटकरी म्हणाले- "शपथविधी सोडून..."
7
'माझं कधीही पॅकअप होऊ शकतं', असं का म्हणाला कार्तिक आर्यन? 'चंदू चॅम्पियन'चं वक्तव्य चर्चेत
8
दक्षिणेतल्या सुषमा स्वराज...! कोण आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी? 18व्या लोकसभाध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे!
9
नड्डा, खट्टर, शिवराज मंत्री झाले; आता भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? 'या' मराठी नावाची चर्चा
10
Reasi Terror Attack : दहशतवाद्यांची आता खैर नाही, रियासी हल्ल्याचा तपास NIA टीम करणार! 
11
Akhilesh Yadav : २०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले...
12
"दहशतवादी ५-६ गोळ्या झाडल्यानंतर थांबायचे अन्..."; यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?
13
छत्रपती संभाजीनगरात 'हिट अँड रन'; कार चोरून नेताना राडा, रस्त्यातील ४ दुचाकींचा चुराडा
14
Somnath Bharti : "पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न
15
मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; चंद्रशेखर पेम्मासानी यांची संपत्ती वाचून व्हाल धक्क!
16
एक वृत्त आणि Suzlon Energy चा शेअर जोरदार आपटला, पाहा काय आहे कारण? 
17
खटा-खट परतावा! ७२ पैशांचा शेअर ₹९० वर पोहोचला; कंपनीचा एक निर्णय अन् खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडला!
18
"आता ३० मिनिटांनी भेटू.."; मुलाखत घेणाऱ्या पत्नीला बुमराहचं उत्तर, त्यावर संजना म्हणाली...
19
शपथ घेताच मोदी ३.० सरकार ॲक्शन मोडमध्ये, नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; काय असेल मोठा निर्णय?
20
निवडणूक निकाल : Share Marketच्या घसरणीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; केली 'ही' मोठी मागणी

पाटणचे जलसंपदा प्रकल्प निधीअभावी रखडले-प्रकल्पग्रस्तांच्या शेतीलाही पाणी मिळेना :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:27 PM

पाटण : पाण्याशिवाय तालुक्यातील डोंगरदऱ्यांतील शेतकºयांची प्रगती नाही. जिल्ह्यामध्ये शासनाच्या जलसंपदा विभागाने २००० मध्ये काही प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे ...

ठळक मुद्देमोरगिरी, साखरी, निवकणे, बिबी प्रकल्प ठप्प, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू

पाटण : पाण्याशिवाय तालुक्यातील डोंगरदऱ्यांतील शेतकºयांची प्रगती नाही. जिल्ह्यामध्ये शासनाच्या जलसंपदा विभागाने २००० मध्ये काही प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे तालुक्यातील हजारो कोटी खर्च करून उभे राहिलेले प्रकल्प आता काही कोटींच्या निधीसाठी अपूर्णावस्थेत आहेत.

पाटण तालुक्यातील मोरगिरी, साखरी चिटेघर, निवकणे आणि बिबी येथील सलतेवाडीजवळ असणारा लहान प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. तालुक्यातील हे प्रकल्प लवकर मंजुरी मिळवून ते लवकर पूर्ण होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. हे प्रकल्प पूर्ण होऊन स्थानिकांच्या शेतीला पाणी आणि त्याबरोबर भौगोलिक परिस्थितीचा फायदा व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते. या प्रकल्पांमुळे पर्यटन, मत्स्यशेतीलाही फायदा झाला असता. पूरक व्यवसाय उभे राहून भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळाले असते.

पाटण तालुक्याचा भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सर्वात जास्त लहान-मोठे प्रकल्प हे एकट्या पाटण तालुक्यात आले. सुरुवातीला या प्रकल्पाकरिता शासनाने निधीही दिला. मात्र त्यानंतर या प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मोरणा गुरेघर प्रकल्पाचे पाणी हे डाव्या तीरावरून सोळा किलोमीटर आणि उजव्या तीरावरून ३२ किलोमीटरचे कालवे काढून शेतीसाठी पुरविण्यात येणार होते. मात्र, सध्या या प्रकल्पात पाणीसाठा असूनही सर्वसामान्य शेतकºयांपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. दोन्ही बाजूने कालव्याचे काम करण्यासाठी निधीचा तुडवडा आहे. त्यामुळे कालव्याची कामे रखडली आहेत. तर काही ठिकाणी राजकारण करण्यात आले आहे. त्यामुळे या विभागातील शेतकºयांना कर्ज काढून मोरणा नदीमधून पाणी उचलून शेतीला घ्यावे लागले. कालव्यातून पाणी मिळाले असते तर मोरणा विभाग सधन आणि संपन्न दिसला असता.

बिबी गावाजवळच सलतेवाडी येथील येडोबा नाल्यावर संपूर्ण मातीच्या बंधाºयाचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण असून, राहिलेल्या कामाचे माती परीक्षण करण्यासाठी पाच वर्षे झाली तरी अद्याप संबंधित विभागाकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ८० टक्के काम होऊनही पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाला नाही. फक्त जमिनी देऊन अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पाकडे निव्वळ पाहत बसण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आली आहे.

निवकणे प्रकल्पाकरिता जनतेला जवळपास पंधरा वर्षे जमिनी देऊनही शेतीला पाणी मिळाले नाही. दरवर्षी या प्रकल्पाच्या कामाकडे शेतकरी डोळे लावून बसलेले असतात. यावर्षी तरी अपूर्ण प्रकल्पाला निधी मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र, शासनांची घोर निराशा करत आहे.

निवकणे प्रकल्पाकरिता जनतेला जवळपास पंधरा वर्षे जमिनी देऊनही शेतीला पाणी मिळाले नाही. दरवर्षी या प्रकल्पाच्या कामाकडे शेतकरी डोळे लावून बसलेले असतात. यावर्षी तरी अपूर्ण प्रकल्पाला निधी मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना असते. मात्र, शासनांची घोर निराशा करत आहे.

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण