महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे रिमझिम पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिक सुखावले आहेत. ...
सातारा शहराच्या वाढे फाटा परिसरातील मंगलमूर्ती सोसायटीमधील सात ते आठ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. ...
चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे मलकापूर शहरातील युवकांनीही हाणामारी करण्याची ठिकाणे बदलली आहेत. गत चार दिवसांत तीन ठिकाणी भांडणाचे प्रकार घडले असून, आडमार्गाच्या रस्त्यांवरच आता हाणामारीच्या घटना घडत आहेत. ...
शिक्षकांच्या बदली अर्जाच्या प्रक्रियेतील गोंधळ अद्यापही सुरूच आहे. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतरही संकेतस्थळ सुरू होण्यात तांत्रिक अडचणी येत असून, त्यामुळे शिक्षक अक्षरश: वैतागले आहेत. अनेक शिक्षक अद्याप अर्ज भरू शकलेले नाहीत. ...
साखर कारखाने सुरू होण्याची वेळ आली आहे. परंतु तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आळी मिळी गुप चिळीची भूमिका घेणे पसंत केले आहे. यंदा उसाचा पहिला हप्ता किती दिला जाणार? याबाबत चारपैकी एकाही साखर कारखान्याकडून वाच्यता होत नसल्याने ऊस उत्पाद ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरातील एकेरी वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, एकेरी वाहतुकीचा नियम मोडणाºया वाहन चालकांना आता दुहेरी दंड बसत आहे. नो एन्ट्रीच्या प्रवेशद्वाराजवळ न थांबता सावज हेरण्यासाठी पोलिस आतमध्येच उभे राहात असल्या ...
सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या जळकेवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यास प्रशासनाला यश आले. या गावाने रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. ८० वर्षांनंतर या गावाला हक्काचा रस्ता मिळणार आहे. ...
सोयाबीन पिकाची हमीभावाने खरेदी करा, या मागणीसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी वडूज येथील खरेदी-विक्री संघावर मोर्चा काढला. तसेच कार्यालयात अधिकाऱ्यांच्या टेबलवरच सोयाबीन ओतून शासनाचा निषेध केला. त्यानंतर काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
तांबवे येथील कोयना नदीवरील पुलापासून सुमारे पन्नास मीटरवर रात्रीचा वाळू उपसा केला जात आहे. गत दोन दिवसांपासून ही वाळू चोरी जोरात सूरू असून, त्यामुळे जुना पूल व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाला धोका निर्माण होत आहे. ...
दिवाळीच्या सुटीसाठी अनेकजण आपल्या गावी आणि पर्यटनासाठी गेले आहेत. घराला कुलूप असल्याने चोरटे अशाच संधीचा फायदा उठवत असतात. सातारकरांना सुटीचा आनंद घेता यावा म्हणून पोलिसांनी नेहमीपेक्षा जादा कुमक रात्रगस्तीवर वाढविली आहे. ...