विकासकामाच्या लढाईत विरोधक असमर्थ
By Admin | Updated: September 30, 2014 00:06 IST2014-09-30T00:04:23+5:302014-09-30T00:06:20+5:30
दहिवडी : जयकुमार गोरे यांच्या सभेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर

विकासकामाच्या लढाईत विरोधक असमर्थ
दहिवडी : ‘आमदार जयकुमार गोरे यांनी पाच वर्षांत केलेली विकासकामे, उरमोडीचे आणलेले पाणी, गावोगावचा विकास, बंधाऱ्याची जलक्रांतीच त्याच्या कामाची धमक दाखवून देत आहे. विकासकामाची लढाई लढण्यात विरोधक असमर्थ आहेत,’ असे मत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
दहिवडी, ता. माण येथील बाजार पटांगणावर आयोजित सभेत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले म्हणाले, ‘जयकुमार गोरे यांच्यामुळे प्रस्थापितांनाही घरी बसावे लागले होते. आता तर पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून निवडणुकीला उभे आहेत.’
अॅड. विजयराव कणसे म्हणाले, ‘पाच वर्षांत गोरे यांनी माणमध्ये इतिहास रचला आहे. पाण्यासाठी आमदारकी पणाला लावणारे हे नेतृत्त्व जपणे आपले कर्तव्य आहे.’
दिलीप जाधव म्हणाले, ‘विकास म्हणजे काय असतो, हे आमदार गोरेंमुळे चाळीस वर्षांत प्रथमच कळले आहे.’
अशोक गोडसे म्हणाले, ‘ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक सोंगाडे सोंग घेऊन नाचायला लागले आहेत. जनता त्यांना असेच झुलवत ठेवणार आहे.’
नंदकुमार गोडसे, अर्जून काळे यांची भाषणे झाली. सरपंच धनाजी जाधव, बाळासाहेब माने, शिवाजी शेडगे, भास्कर जाधव, अविनाश पवार, संतोष पवार, सचिन घाडगे विविध गावांचे सरपंच, विकास संस्थांचे अध्यक्ष, सदस्य , पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)