शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

केवळ तीनच महिन्यांत तलाव आटले! नांदलमध्ये पाणीबाणी : धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 18:48 IST

नांदल हे फलटण तालुक्यातील पर्जन्यमान कमी असणारे गाव. जून महिन्यात पाऊस चांगला झाला. त्यानंतर या गावातील तब्बल आठ सिमेंट बंधारे काठोकाठ भरलेले होते. मात्र, केवळ तीनच महिन्यांत गावातील पाणीसाठा संपल्याने गावावर दुष्काळाचे सावट

मलटण : नांदल हे फलटण तालुक्यातील पर्जन्यमान कमी असणारे गाव. जून महिन्यात पाऊस चांगला झाला. त्यानंतर या गावातील तब्बल आठ सिमेंट बंधारे काठोकाठ भरलेले होते. मात्र, केवळ तीनच महिन्यांत गावातील पाणीसाठा संपल्याने गावावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.माणमधील टाकेवाडी, भांडवली या गावांची यशोगाथा पाहिल्यानंतर नांदलसारख्या गावावर पाण्याचे संकट येणे ही खेदाची बाब आहे. या ठिकाणी कमिन्स इंडिया कंपनीमार्फत तब्बल आठ बंधाऱ्यांची निर्मिती केली गेली. दरवर्षी असणारी दुष्काळसदृश्य परिस्थिती काही प्रमाणात कमी झाली. गावातील तब्बल आठ बंधारे काठोकाठ भरले. गावकºयांनी आनंदोत्सव साजरा केला; केवळ तीनच महिन्यांत या आनंदावर विरजन पडले.जूननंतर गावातील शेतकºयांनी अनेक प्रकारची पिके घेतली. उसाचे मळेही दिसू लागले; पण जूननंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने बंधाºयातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदलकरांमध्ये कभी खुशी कभी गम, अशीच अवस्था झाली आहे.गावातील विहिरींची पाणीपातळी खलावल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जूनमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी खरिपाची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली. काही शेतकºयांनी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागणी केल्या; पण आॅगस्ट संपता-संपता पाणी पातळी एकदम खालावली. त्यामुळे त्वरित उपाययोजना करत धोम-बलकवडीचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नांदल, सुरवडी, मुळीकवाडी ग्रामस्थांमधून होत आहे.पाणी तलावांमध्ये सोडल्यास पाणी संकट दूर होईल..धोम-बलकवडीच्या कॅनॉलमधून पाणी सोडून फलटण तालुक्यातील मुळीकवाडी, हिंगणगाव, धुमाळवाडी, कुरवली येथील धरणात सोडण्यात येऊ शकते. सध्या धोम धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीला पाणी सोडून देण्यापेक्षा ते छोट्या-छोट्या धरण व तलावांमध्ये सोडल्यास गावांचे पाणी संकट दूर होईल.

 

मुळीकवाडी तलावात धोम-बलकवडी कॅनॉलचे पाणी सोडून नांदल, सुरवडीमधील बंधारे भरण्यात यावे. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.-महादेव मोहिते, सरपंच, नांदल

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणwater shortageपाणीटंचाई