शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

साताऱ्यात कांदा दरात पुन्हा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:58 IST

सातारा : जिल्ह्यात कांदा दरात वाढ होतच असून, सोमवारी दुसऱ्यादिवशीही सातारा बाजार समितीत क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ...

सातारा : जिल्ह्यात कांदा दरात वाढ होतच असून, सोमवारी दुसऱ्यादिवशीही सातारा बाजार समितीत क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे कांद्याचा दर ४३०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असले तरी सामान्यांना मात्र, कांदा रडवू लागला आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. यामध्ये कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो.

सातारा बाजार समितीत रविवारी कांद्यात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे दर ४२०० रुपये क्विंटलपर्यंत गेला होता; तर हलक्या प्रतिच्या कांद्याला एक हजारापर्यंत भाव आलेला. सोमवारी दुसऱ्यादिवशीही सातारा बाजार समितीत कांदा दरात सुधारणा झाली. क्विंटलला ४३०० रुपयांपर्यंत दर आला; तर हलक्या प्रतिच्या कांद्याचा दर १५०० रुपये क्विंटलपर्यंत निघाला. यामुळे कांदा महाग होऊ लागल्याचे दिसत आहे. साताऱ्यातील मंडई तसेच दुकानातही कांदा विक्रीचा दर ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे सामान्यांना खर्चात काटकसर करावी लागत आहे.

सातारा बाजार समितीत सोमवारी ५२ वाहनांतून ३३७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याची १६० क्विंटल आवक झाली, तर बटाटा २३८, लसूण २२ आणि आल्याची ४ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक झाली होती. बाजार समितीत गवारला १० किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. रविवारच्या तुलनेत दरात सुधारणा झाली. तसेच शेवग्याला ३०० ते ४०० भाव आला. वांग्याला १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटो ४० ते ७०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला ८० ते १३० तर दोडक्याला ३०० ते २५० रुपये दर आला.

बटाट्याला क्विंटलला ७०० पासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला २५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १७०० रुपयांदरम्यान दर मिळाला. लसणाला क्विंटलला ३ ते ७ हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजूनही स्वस्त आहे. ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.

चौकट :

पालेभाज्यांची आवक कमी...

सातारा बाजार समितीत सोमवारी पालेभाज्यांची आवक कमी झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात चढ-उतार पाहायला मिळाला. मेथीच्या एक हजार पेंडीची आवक झाली. याला शेकडा ४०० ते ७०० रुपये दर मिळाला, तर कोथिंबीरच्या १३०० पेंड्यांची आवक झाली. याला शेकडा दर ४०० ते ५०० रुपयांदरम्यान दर मिळाला, तर पालकाला शेकडा ४०० ते ५०० रुपये भाव आला.

......................................................