शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

ओळखपत्र, मास्कशिवाय मतदान केंद्रात प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST

कऱ्हाड : ‘यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक मंगळवारी होत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ ...

कऱ्हाड : ‘यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक मंगळवारी होत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत एकूण १४८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. ओळखपत्र व मास्क असल्याशिवाय मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मोबाईल घेऊन येण्यास मनाई आहे,’ अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मतदानासाठी फक्त मतदारयादीमधील मतदारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी येताना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विहित केलेल्या आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना, पॅनकार्ड, केंद्र, राज्य शासन सार्वजनिक उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कर्मचाऱ्यांचे फोटो ओळखपत्र, पोस्ट कार्यालयाने दिलेले फोटो असलेले पासबुक, स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र, फोटो असलेले जात प्रमाणपत्र, फोटो असलेला अपंग दाखला, फोटो असलेला शस्र परवाना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी यंत्रणा फोटो असलेले जाॅबकार्ड, निवृत्त कर्मचारी फोटो पेन्शन पासबुक, आरोग्य विमा योजना फोटो असलेले स्मार्ट कार्ड यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे. मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी (मोबाईल) घेऊन जाण्यास मनाई आहे. त्यामुळे मतदारांनी केंद्रामध्ये मोबाईल घेऊन येऊ नये.

तसेच सर्व मतदारांनी कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या आदेश व निर्देश याचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. मास्क नसल्यास मतदान केंद्रामध्ये प्रवेश मिळणार नाही. याबाबत सर्व मतदार, उमेदवार, प्रतिनिधींनी नोंद घ्यावी, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.