शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

नितीन पाटील राज्यसभेसाठी अर्ज भरणार; महायुतीकडून जागा बिनविरोध करण्याची रणनिती

By दीपक देशमुख | Updated: August 20, 2024 19:53 IST

ही निवड बिनविरोध करण्यासाठी महायुतीची रणनिती असल्यामुळे नितीन पाटील खासदार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

दिपक देशमुख 

सातारा : लोकसभेच्या सातारा जागेवरील दावा सोडणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून पियुष ओयल यांच्या रिक्त जागी पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नितीन पाटील मुंबईला दाखल झाले आहेत. महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई विधान भवनात अर्ज भरण्यात येणार आहे. ही निवड बिनविरोध करण्यासाठी महायुतीची रणनिती असल्यामुळे नितीन पाटील खासदार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

सातारा जिल्ह्याला खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या रुपाने खंबीर नेतृत्व मिळाले होते. त्यानंतर चिरंजीव आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी त्यांची धुरा सांभाळली असून मकरंद पाटील वाई मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत तर नितीन पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत.अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथील मेळाव्यात सातारा लोकसभेवर दावा सांगत नितीन पाटील यांच्या उमेदवारी देण्याचे सुतोवाच केले. परंतु, भाजपाचाही दावा मजबूत असल्यामुळे लोकसभेला उमेदवारी कोणाला द्यायची हा पेच वाढू लागला. त्यावेळी अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेत लोकसभेची जागा भाजपाला सोडली व त्याबदल्यात राज्यसभेची जागा मागून घेतली.

हा तोडगा निघाल्यामुळे लोकसभेची दावेदारी त्यांनी सोडून नितीन पाटील यांना खासदारकीसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. राज्यातील दोन जागांसह नऊ राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त १२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नितीन पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी नितीन पाटील राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी रात्री झाली. या बैठकीत एकमताने नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बैठकीला अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते उपस्थित होते.

नितीन पाटील यांना लोकसभेवेळी राज्यसभेवर घेण्याचा अजित पवार यांनी जो शब्द दिला, तो खरा केला आहे. त्यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असून यामुळे आम्हा कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

श्रीनिवास शिंदे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस