शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

निरा देवघरचे पाणी डेटा बदलून बारामतीला वळविले, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:28 IST

केंद्र सरकार निरा देवघर आणि कृष्णा भीमा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईल

नसीर शिकलगार

फलटण: निरा देवघर प्रकल्प हा तत्कालीन सरकारने रखडला असून याचे हककाचे पाणी  डेटा बदलून बारामतीला वळविण्याचा गंभीर आरोप केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला. केंद्र सरकार निरा देवघर आणि कृष्णा भीमा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईल आणि दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडवेल अशी ग्वाही मंत्री शेखावत यांनी यावेळी दिली.रखडलेला निरा देवघर सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या अनुषंगाने व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या हेतूसाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज, सकाळपासून पुण्यातून हेलिकॉप्टरने हवाई पाहणी केली. यानंतर त्यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदे घेतली. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीराव पाटील, आ. समाधान अवताडे, माजी आमदार  प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री शेखावत म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न संदर्भात यापूर्वी खासदार नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्याशी वारंवार संवाद साधून पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष हवाई पाहणी दौरा करून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा आढावा घेतला. यापूर्वीच्या सरकारने प्रकल्प रखडवलायापूर्वीच्या सरकारने राजकारण आणून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प रखडविला होता. तत्कालीन सरकारने प्रकल्प रखडवितानाच स्थानिकावर अन्याय करून निरा देवघरचा डेटा बदलून हे पाणी बारामतीकडे वळविले होते व दिशाभूल केली होती. याचा रिपोर्ट आपल्याकडे आहे असे स्पष्ट करून निरा देवघर सिंचन प्रकल्पाला तीन हजार नऊशे कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली असल्याने केंद्र सरकार सुद्धा या प्रकल्पासाठी गांभीर्याने निधी उपलब्ध करून देईल व सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न कायमचा संपवून टाकेल असे गजेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले.अत्यंत सुनियोजित पद्धतीने पूर्वीच्या सरकारने निरा देवघरचे हक्काचे पाणी बारामतीला वळविले होते. याबाबत आपण केंद्र व राज्य सरकारला सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये हक्काचे पाणी बारामतीला दिल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून हे प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही शेखावत यांनी दिल्याने पाणी प्रश्न संपुष्टात येईल असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरWaterपाणी