शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

निरा देवघरचे पाणी डेटा बदलून बारामतीला वळविले, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:28 IST

केंद्र सरकार निरा देवघर आणि कृष्णा भीमा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईल

नसीर शिकलगार

फलटण: निरा देवघर प्रकल्प हा तत्कालीन सरकारने रखडला असून याचे हककाचे पाणी  डेटा बदलून बारामतीला वळविण्याचा गंभीर आरोप केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला. केंद्र सरकार निरा देवघर आणि कृष्णा भीमा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईल आणि दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडवेल अशी ग्वाही मंत्री शेखावत यांनी यावेळी दिली.रखडलेला निरा देवघर सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या अनुषंगाने व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या हेतूसाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज, सकाळपासून पुण्यातून हेलिकॉप्टरने हवाई पाहणी केली. यानंतर त्यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदे घेतली. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीराव पाटील, आ. समाधान अवताडे, माजी आमदार  प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री शेखावत म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न संदर्भात यापूर्वी खासदार नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्याशी वारंवार संवाद साधून पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष हवाई पाहणी दौरा करून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा आढावा घेतला. यापूर्वीच्या सरकारने प्रकल्प रखडवलायापूर्वीच्या सरकारने राजकारण आणून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प रखडविला होता. तत्कालीन सरकारने प्रकल्प रखडवितानाच स्थानिकावर अन्याय करून निरा देवघरचा डेटा बदलून हे पाणी बारामतीकडे वळविले होते व दिशाभूल केली होती. याचा रिपोर्ट आपल्याकडे आहे असे स्पष्ट करून निरा देवघर सिंचन प्रकल्पाला तीन हजार नऊशे कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली असल्याने केंद्र सरकार सुद्धा या प्रकल्पासाठी गांभीर्याने निधी उपलब्ध करून देईल व सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न कायमचा संपवून टाकेल असे गजेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले.अत्यंत सुनियोजित पद्धतीने पूर्वीच्या सरकारने निरा देवघरचे हक्काचे पाणी बारामतीला वळविले होते. याबाबत आपण केंद्र व राज्य सरकारला सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये हक्काचे पाणी बारामतीला दिल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून हे प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही शेखावत यांनी दिल्याने पाणी प्रश्न संपुष्टात येईल असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरWaterपाणी