शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

निरा देवघरचे पाणी डेटा बदलून बारामतीला वळविले, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:28 IST

केंद्र सरकार निरा देवघर आणि कृष्णा भीमा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईल

नसीर शिकलगार

फलटण: निरा देवघर प्रकल्प हा तत्कालीन सरकारने रखडला असून याचे हककाचे पाणी  डेटा बदलून बारामतीला वळविण्याचा गंभीर आरोप केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला. केंद्र सरकार निरा देवघर आणि कृष्णा भीमा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईल आणि दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडवेल अशी ग्वाही मंत्री शेखावत यांनी यावेळी दिली.रखडलेला निरा देवघर सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या अनुषंगाने व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या हेतूसाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज, सकाळपासून पुण्यातून हेलिकॉप्टरने हवाई पाहणी केली. यानंतर त्यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदे घेतली. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीराव पाटील, आ. समाधान अवताडे, माजी आमदार  प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री शेखावत म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न संदर्भात यापूर्वी खासदार नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्याशी वारंवार संवाद साधून पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष हवाई पाहणी दौरा करून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा आढावा घेतला. यापूर्वीच्या सरकारने प्रकल्प रखडवलायापूर्वीच्या सरकारने राजकारण आणून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प रखडविला होता. तत्कालीन सरकारने प्रकल्प रखडवितानाच स्थानिकावर अन्याय करून निरा देवघरचा डेटा बदलून हे पाणी बारामतीकडे वळविले होते व दिशाभूल केली होती. याचा रिपोर्ट आपल्याकडे आहे असे स्पष्ट करून निरा देवघर सिंचन प्रकल्पाला तीन हजार नऊशे कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली असल्याने केंद्र सरकार सुद्धा या प्रकल्पासाठी गांभीर्याने निधी उपलब्ध करून देईल व सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न कायमचा संपवून टाकेल असे गजेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले.अत्यंत सुनियोजित पद्धतीने पूर्वीच्या सरकारने निरा देवघरचे हक्काचे पाणी बारामतीला वळविले होते. याबाबत आपण केंद्र व राज्य सरकारला सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये हक्काचे पाणी बारामतीला दिल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून हे प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही शेखावत यांनी दिल्याने पाणी प्रश्न संपुष्टात येईल असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरWaterपाणी