शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

राज्यात नवीन रोपटे लावले, कसं वाढवायचं हे इतरांनी सांगायची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By दीपक शिंदे | Updated: November 1, 2022 19:22 IST

ज्यांना शेतीच करायची माहिती नाही त्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही

सातारा/बामणोली : कोयनेच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मी वाढलोय. पहिल्यापासून गावाची ओढ आहे. कुठे काय उगवते आणि लावलेले रोपटं कसं वाढवायचं, हे मला चांगले माहिती आहे. त्यामुळे राज्यात जे नवीन रोपटे लावले आहे, ते अत्यंत उत्तम प्रकारे जोपासले जाईल आणि त्याची वाढही होईल. त्यामुळे ज्यांना शेतीच करायची माहिती नाही त्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही, असा टोला मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे दोन दिवसांच्या सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे खुर्द या गावी आले होते. त्यांनी मंगळवारचा पूर्ण दिवस शेती कामासाठी दिला. त्यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.मुख्यमंत्री शिंदे यांना शेतीबाबत प्रचंड आवड आहे. दरवर्षी भात लावणीसाठी पावसाळ्यात आणि काढणीसाठी दिवाळीच्या काळात ते येत असत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पावसाळ्यात त्यांना फारसा वेळ देता आला नाही. मात्र, आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत त्यांनी मंगळवारचा संपूर्ण दिवस शेती कामासाठी दिला. त्याबरोबरच फळबागेतही फेरफटका मारत झाडांची पाहणी केली. त्यांनी स्वत: आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. पुढील तीन महिन्यांमध्ये या स्ट्रॉबेरीला फळे येणार आहेत. तर पावसाळ्याच्या दरम्यान लावलेल्या स्ट्रॉबेरीला सध्या लाल चिटूक स्ट्रॉबेरीही लागलेली दिसली.ते म्हणाले, आपण जेव्हा शेती करतो तेव्हाच इतरांना सांगू शकतो. त्यामुळे या भागात मी विविध प्रकारची शेती केली आहे. शेतात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. शेतात अत्याधुनिक यंत्राचा वापर केला आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. स्ट्रॉबेरी, सफरचंद, ड्रॅगन फ्रूट अशी वेगवेगळी फळशेती शेतकऱ्यांनी केली पाहिजे. पर्यायी पिके घेतली तर अडचणी कमी येतील. राज्यात दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होते. अशावेळी त्यातून सावरून कसे नियोजन करावे, यासाठी हे प्रयोग शेतात केले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांची पारंपरिक शेती खूप कमी होती. काही वर्षांत त्यांनी याठिकाणी शेती विकत घेतली आहे. त्या शेतात त्यांनी गोशाळाही बांधली आहे. यामध्ये गावठी गायींचे पालन केले जाते. त्याबरोबरच शेतीसाठी पाण्याकरिता शेततळे बांधण्यात आले असून, या शेततळ्यात मत्स्यपालनही केले जाते. अशा प्रकारे त्यांनी एकाच ठिकाणी विविध प्रयोग करून राज्यातील शेतकऱ्यांसाठीही वेगळा संदेश दिला आहे.या शेतीत मी खूप रमतो...गावाबद्दल प्रचंड ओढ आहेच; पण या ठिकाणचा निसर्ग एकनाथ शिंदे यांना नेहमी खुणावत असतो. या ठिकाणचा हिरवागार परिसर मनाला आनंद देतो. समोर निळेशार पाणी, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि या परिसरात मोबाइलचा संपर्क होत नाही. त्यामुळे सर्व कोलाहलापासून दूर निवांत राहता येत असल्याने याठिकाणी अधिक रमतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे