शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

राज्यात नवीन रोपटे लावले, कसं वाढवायचं हे इतरांनी सांगायची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By दीपक शिंदे | Updated: November 1, 2022 19:22 IST

ज्यांना शेतीच करायची माहिती नाही त्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही

सातारा/बामणोली : कोयनेच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मी वाढलोय. पहिल्यापासून गावाची ओढ आहे. कुठे काय उगवते आणि लावलेले रोपटं कसं वाढवायचं, हे मला चांगले माहिती आहे. त्यामुळे राज्यात जे नवीन रोपटे लावले आहे, ते अत्यंत उत्तम प्रकारे जोपासले जाईल आणि त्याची वाढही होईल. त्यामुळे ज्यांना शेतीच करायची माहिती नाही त्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही, असा टोला मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे दोन दिवसांच्या सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे खुर्द या गावी आले होते. त्यांनी मंगळवारचा पूर्ण दिवस शेती कामासाठी दिला. त्यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.मुख्यमंत्री शिंदे यांना शेतीबाबत प्रचंड आवड आहे. दरवर्षी भात लावणीसाठी पावसाळ्यात आणि काढणीसाठी दिवाळीच्या काळात ते येत असत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पावसाळ्यात त्यांना फारसा वेळ देता आला नाही. मात्र, आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत त्यांनी मंगळवारचा संपूर्ण दिवस शेती कामासाठी दिला. त्याबरोबरच फळबागेतही फेरफटका मारत झाडांची पाहणी केली. त्यांनी स्वत: आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. पुढील तीन महिन्यांमध्ये या स्ट्रॉबेरीला फळे येणार आहेत. तर पावसाळ्याच्या दरम्यान लावलेल्या स्ट्रॉबेरीला सध्या लाल चिटूक स्ट्रॉबेरीही लागलेली दिसली.ते म्हणाले, आपण जेव्हा शेती करतो तेव्हाच इतरांना सांगू शकतो. त्यामुळे या भागात मी विविध प्रकारची शेती केली आहे. शेतात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. शेतात अत्याधुनिक यंत्राचा वापर केला आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. स्ट्रॉबेरी, सफरचंद, ड्रॅगन फ्रूट अशी वेगवेगळी फळशेती शेतकऱ्यांनी केली पाहिजे. पर्यायी पिके घेतली तर अडचणी कमी येतील. राज्यात दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होते. अशावेळी त्यातून सावरून कसे नियोजन करावे, यासाठी हे प्रयोग शेतात केले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांची पारंपरिक शेती खूप कमी होती. काही वर्षांत त्यांनी याठिकाणी शेती विकत घेतली आहे. त्या शेतात त्यांनी गोशाळाही बांधली आहे. यामध्ये गावठी गायींचे पालन केले जाते. त्याबरोबरच शेतीसाठी पाण्याकरिता शेततळे बांधण्यात आले असून, या शेततळ्यात मत्स्यपालनही केले जाते. अशा प्रकारे त्यांनी एकाच ठिकाणी विविध प्रयोग करून राज्यातील शेतकऱ्यांसाठीही वेगळा संदेश दिला आहे.या शेतीत मी खूप रमतो...गावाबद्दल प्रचंड ओढ आहेच; पण या ठिकाणचा निसर्ग एकनाथ शिंदे यांना नेहमी खुणावत असतो. या ठिकाणचा हिरवागार परिसर मनाला आनंद देतो. समोर निळेशार पाणी, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि या परिसरात मोबाइलचा संपर्क होत नाही. त्यामुळे सर्व कोलाहलापासून दूर निवांत राहता येत असल्याने याठिकाणी अधिक रमतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे