शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

लग्न सोहळे मांडवाऐवजी रंगताहेत पोलीस ठाण्यात, उत्साहाच्या भरात घडतंय भलतंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:18 IST

बूट पळविण्यावरुन हाणामारी, वधूला उचलून घेताना चुकीचा स्पर्श अशा घटनामुळे होतायत वाद

दत्ता यादवसातारा : लग्न समारंभ म्हटला की नानाविध प्रकारचे लोक आणि त्यांचे मन राखण्यासाठी महिनोन महिने तयारी केली जाते. मात्र, ऐन लग्न सोहळ्यात या तयारीवर अलीकडे पाणी पडत आहे. लग्नातील नवनवीन रुढी, परंपरा वादाचे कारण ठरू लागल्या असून, या लग्नसोहळ्यांचा बॅण्ड मांडवात वाजण्याऐवजी आता चक्क पोलीस ठाण्यात घुमू लागलाय.अलीकडे लग्न सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या रूढी, परंपरा सुरू झाल्या आहेत. या रुढीतून लग्नसोहळ्याला रंगत येत असली तरी यातून नातं तुटण्याचेही प्रकार सर्रास घडू लागलेत. त्यामुळे या रुढी कितपत जपल्या जाव्यात, हाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय. आनंदात सुरू असणारा लग्न सोहळा क्षणात विस्फोटक बनतोय. एवढेच नव्हे तर नातं जोडायला आलेले पै पाहुणे एकमेकांचे वैरी होताहेत. हे असं का घडतंय, याचीही विचारणा होणे गरजेचे आहे.सातारा जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून लग्न सोहळ्याला गालबोट लागण्याचे प्रकार घडत आहेत. अशा काही मोजक्या घटना आपण पाहू या.सातारा तालुक्यातील एका मंगल कार्यालयामध्ये इंजिनिअर असलेल्या एका युवतीचा लग्नसोहळा होता. हा सोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडत होता. पण जेव्हा वधू आणि वर एकमेकांच्या गळ्यात हार घालत होते तेव्हा वधूला काही उत्साही युवकांनी उचलून घेतलं. पण इथं भलतंच घडलं. ज्या युवकांनी वधूला उचलून घेतलं होतं त्यापैकी एकाने वधूला चुकीचा स्पर्श केला. हा प्रकार वधूच्या लक्षात आल्यानंतर तिने युवकांना हाताने बाजूला झटकलं आणि घडलेला प्रकार इतरांना सांगितला.

बूट पळविण्यावरुन हाणामारीपाटण तालुक्यात लग्न सोहळा पार पडल्यानंतर नवरदेवाचे बूट दोन मुलींनी लपवून ठेवले. बूट परत देण्यासाठी मुलींनी दहा हजारांची मागणी केली. पण बूट होते केवळ दीड हजारांचे. वरपित्याला हे समजल्यावर त्यांनी जवळच दुकानात जाऊन दुसरे शूज आणले. याचा राग मुलींना आला. त्यांनी ते शूज तेथे असलेल्या गटारात टाकले. इथेच वादाला तोंड फुटलं. शाब्दीक चकमकीनंतर हमरीतुमरी होऊन दोन्ही वऱ्हाडी मंडळी. एकमेकांना भिडली. तुंबळ हाणामारी झाली.

लग्न सोहळ्यात चित्रपटातील अनुकरण केले जात आहे. हे पहिल्यांदा थांबविले पाहिजे. अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केले पाहिजेत. तरच लग्न सोहळ्यातील वादावादीचे प्रकार थांबतील. - जितेंद्र वाडेकर, सामाजिक कार्यकर्ता, सातारा 

उत्साहाच्या भरात वहऱ्हाडी मंडळीकडून काहीही घडतंय. याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. काय करावे आणि काय करू नये, अशा प्रकारच्या सूचनांची पाटी लग्न सोहळा ठिकाणच्या बाहेर लावणे हिताचे आहे. - विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्नPoliceपोलिस