शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

लग्न सोहळे मांडवाऐवजी रंगताहेत पोलीस ठाण्यात, उत्साहाच्या भरात घडतंय भलतंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:18 IST

बूट पळविण्यावरुन हाणामारी, वधूला उचलून घेताना चुकीचा स्पर्श अशा घटनामुळे होतायत वाद

दत्ता यादवसातारा : लग्न समारंभ म्हटला की नानाविध प्रकारचे लोक आणि त्यांचे मन राखण्यासाठी महिनोन महिने तयारी केली जाते. मात्र, ऐन लग्न सोहळ्यात या तयारीवर अलीकडे पाणी पडत आहे. लग्नातील नवनवीन रुढी, परंपरा वादाचे कारण ठरू लागल्या असून, या लग्नसोहळ्यांचा बॅण्ड मांडवात वाजण्याऐवजी आता चक्क पोलीस ठाण्यात घुमू लागलाय.अलीकडे लग्न सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या रूढी, परंपरा सुरू झाल्या आहेत. या रुढीतून लग्नसोहळ्याला रंगत येत असली तरी यातून नातं तुटण्याचेही प्रकार सर्रास घडू लागलेत. त्यामुळे या रुढी कितपत जपल्या जाव्यात, हाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय. आनंदात सुरू असणारा लग्न सोहळा क्षणात विस्फोटक बनतोय. एवढेच नव्हे तर नातं जोडायला आलेले पै पाहुणे एकमेकांचे वैरी होताहेत. हे असं का घडतंय, याचीही विचारणा होणे गरजेचे आहे.सातारा जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून लग्न सोहळ्याला गालबोट लागण्याचे प्रकार घडत आहेत. अशा काही मोजक्या घटना आपण पाहू या.सातारा तालुक्यातील एका मंगल कार्यालयामध्ये इंजिनिअर असलेल्या एका युवतीचा लग्नसोहळा होता. हा सोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडत होता. पण जेव्हा वधू आणि वर एकमेकांच्या गळ्यात हार घालत होते तेव्हा वधूला काही उत्साही युवकांनी उचलून घेतलं. पण इथं भलतंच घडलं. ज्या युवकांनी वधूला उचलून घेतलं होतं त्यापैकी एकाने वधूला चुकीचा स्पर्श केला. हा प्रकार वधूच्या लक्षात आल्यानंतर तिने युवकांना हाताने बाजूला झटकलं आणि घडलेला प्रकार इतरांना सांगितला.

बूट पळविण्यावरुन हाणामारीपाटण तालुक्यात लग्न सोहळा पार पडल्यानंतर नवरदेवाचे बूट दोन मुलींनी लपवून ठेवले. बूट परत देण्यासाठी मुलींनी दहा हजारांची मागणी केली. पण बूट होते केवळ दीड हजारांचे. वरपित्याला हे समजल्यावर त्यांनी जवळच दुकानात जाऊन दुसरे शूज आणले. याचा राग मुलींना आला. त्यांनी ते शूज तेथे असलेल्या गटारात टाकले. इथेच वादाला तोंड फुटलं. शाब्दीक चकमकीनंतर हमरीतुमरी होऊन दोन्ही वऱ्हाडी मंडळी. एकमेकांना भिडली. तुंबळ हाणामारी झाली.

लग्न सोहळ्यात चित्रपटातील अनुकरण केले जात आहे. हे पहिल्यांदा थांबविले पाहिजे. अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केले पाहिजेत. तरच लग्न सोहळ्यातील वादावादीचे प्रकार थांबतील. - जितेंद्र वाडेकर, सामाजिक कार्यकर्ता, सातारा 

उत्साहाच्या भरात वहऱ्हाडी मंडळीकडून काहीही घडतंय. याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. काय करावे आणि काय करू नये, अशा प्रकारच्या सूचनांची पाटी लग्न सोहळा ठिकाणच्या बाहेर लावणे हिताचे आहे. - विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्नPoliceपोलिस