शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

गुन्हेगारी कारवायामुळे साताऱ्यातील नीरा नदीपात्र बदनाम; आत्महत्या, खूनाच्या घटनेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 14:24 IST

परस्परांच्या हद्दीत सुरक्षित ठिकाणाची निवड करून गुन्हेगारी कारवाया करण्याचे प्रस्थ वाढल्याने नीरा नदीपात्र अधिक बदनाम झाले.

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कारागृहात परजिल्ह्यातील गुन्हेगारांच्या परस्परांशी झालेल्या ओळखीचं पर्यवसान पुढे टोळीत होत असल्याने पोलिस यंत्रणासाठी यांना जेरबंद करणे मोठे आव्हान ठरत आहे. परस्परांच्या हद्दीत सुरक्षित ठिकाणाची निवड करून गुन्हेगारी कारवाया करण्याचे प्रस्थ वाढल्याने नीरा नदीपात्र अधिक बदनाम झाले.सातारा जिल्ह्यात नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद यासह पुण्या-मुंबईच्या टोळ्या सक्रिय असतात. या टोळ्यांच्या मध्ये नव्या चेहऱ्यांचा उपयोग कारवायांसाठी केला जातो. गुन्हा पचविण्यासाठी, पुरावा नष्ट करण्यासाठी नीरा नदीचे पात्र सुरक्षित असल्याची रेकी गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारांनी केली आहे. परिणामी गेल्या वर्षभरामध्ये वीसहून अधिक घटना शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. वास्तुविशारद यांचा खून, सांगलीतील उद्योजकांच्या मुलाचा घातपात व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आत्महत्येचा समावेश आहे.

पुण्यापेक्षा सातारा सोयीचासातारा जिल्ह्याच्या हद्दीत खून करून निरा नदीपात्रात मृतदेह टाकल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एका संशयिताने पोलीस तपासात धक्कादायक खुलासा केला होता. त्याने पोलिसांजवळ सांगितलं की, ‘पुण्यात गुन्हा दाखल झाला तर कोणाकडे जायचं आणि कुठं कोणाला मॅनेज करायचं, हा मोठा प्रश्न असतो. तिथं होणाऱ्या ‘तडजोडी’ हलक्यात नसतात. पुण्यापेक्षा सातारा कधीही ‘परवडतो’! आता हे परवडणं काय आणि कसं यावर मात्र तो संशयितच अधिक प्रकाश टाकू शकतो.

कारागृहात मिळतेय यंत्रणांना गुंगारा देण्याची शिकवणकारागृहात आठवड्यापेक्षा अधिक वेळ राहिलेल्यांना येथे गुन्हेगार विश्वातील गुरू आणि महागुरू भेटतात.आपापल्या आवडीने कारागृहात टोळीत सहभागी व्हायचं आणि बाहेर पडल्यानंतर काही काम असेल तरच भेटायचं हा निकष अगदी ठरलेला असतो. कारागृहात असताना मात्र, गुन्हा कसा करावा? पुरावा कसा नष्ट करावा? यासह यंत्रणेला गुंगारा देण्याचे एकसेएक किस्से चवीने सांगितले जातात

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीriverनदी