शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Ramraje Naik Nimbalkar: रामराजेंचा राष्ट्रवादीचाच नारा, स्टेटसवर घड्याळाचे चिन्ह; म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:56 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शरद पवारांचे नेतृत्व मानणारे नेते आहेत. मात्र, दुसऱ्या फळीतील नेत्यांशी त्यांचे फारसे जमेनासे झाले आहे.

सातारा : राज्यामध्ये शिवसेनेतील आमदारांनी फुटून स्वतंत्र गट तयार केल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही काही बड्या नेत्यांना गळाला लावले होते. त्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईत एक बैठकही झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, हाताला फारसे काही लागणार नाही, असा निष्कर्ष निघाल्यानंतर हे बंड काही प्रमाणात थंड झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव प्राधान्याने घेतले जात होते. मात्र, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोशल माध्यमातून सांगितले. स्टेटसवर घड्याळाचे चिन्ह ठेवून कळेल ही आशा असे सूचक शब्द त्यांनी वापरले आहेत.शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी आपला स्वतंत्र गट तयार केला आणि राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रेही ताब्यात घेतली. पक्षनेतृत्वावर हे आमदार नाराज होते आणि जनतेच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नव्हता, असे त्यांनी कारण दिले. मात्र, इकडे ज्यांना अपेक्षेपेक्षा अधिक निधी मिळाला, त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही खदखद सुरू आहे. एकमेकांचे पाय ओढण्यात माहीर असलेल्या या नेत्यांनी आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा होता कामा नये, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. प्रत्येकाने जिल्ह्यात आपलाच दरारा राहावा यासाठी नियोजन केले आहे. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर जिल्हा ताब्यातून जाणार आणि हातात काहीच उरणार नाही, याची जाणीव होऊ लागल्याने या नेत्यांमध्येही चुळबूळ सुरू झाली होती.या अस्वस्थतेतूनच काहींनी भाजपचा रस्ता धरल्याची चर्चा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून होती. रामराजे स्वत: त्यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील इतर नेत्यांनाही सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, रामराजेंना या चर्चांना पूर्णविराम मिळावा, या दृष्टीने काही संकेत दिले आहेत.पक्षाशी बांधीलकी वगैरे गोष्टी आता गौण झाल्या असून, सध्या सत्ता आणि वर्चस्व यांनाच प्राधान्य दिल्याचे दिसते. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवायची आणि कायम सत्तेत कसे राहू, याकडे अधिक कल असल्याने सध्या पक्षांच्या बाबतीत वरिष्ठ नेतेही संधीच्या शोधात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शरद पवारांचे नेतृत्व मानणारे नेते आहेत. मात्र, दुसऱ्या फळीतील नेत्यांशी त्यांचे फारसे जमेनासे झाले आहे. त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेण्याच्या तयारीत राष्ट्रवादीतील काही नेते असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

पक्षावर आपल्याच नातलगांची हवी मालकी... हेच नाराजीचे कारणकाँग्रेस, राष्ट्रवादी असो अगर शिवसेना; या पक्षांवर काही ठरावीक प्रमुखांची मालकी आहे. ती सोडण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे आपल्या घरातीलच कोणीतरी पक्षाची धुरा पुढे सांभाळावी, अशी त्यांची अपेक्षा असते. यातून काही निष्ठावंत नाराज होतात. त्यामुळे पक्षावरच ताबा मिळविण्याचा किंवा स्वतंत्र गट स्थापण्याचा प्रयत्न होतो आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही असाच विचार पुढे येऊ लागला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा