शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भंडाऱ्याची उधळण करीत काउदरयावर ‘निसर्गपूजा’; हजारो भाविकांचा सहभाग, मार्तंड-जानाईदेवी पायी पालखीचा ‘जयाद्री ते सह्याद्री’ प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 16:10 IST

जेजुरी येथून धार्मिक विधीपूर्वक रथासह पर्यावरणाचा संदेश देणारया पारंपारिक बैलगाड्यांचा ताफा जयाद्री ते सह्याद्री असा दीडशे दोनशे किलोमीटर प्रवास करतो. 

निलेश साळुंखेकोयनानगर: निसर्गाचे जतन व संवर्धन करा. तरच आपले जीवन सुखकारक होईल, हा संदेश देत राज्यात सुख-शांती नांदावी यासाठी निसर्गाला खंडोबाचा भंडारा व जानाईदेवीचा गुलाल, नारळ अर्पण करून निसर्गपुजा करण्यात आली. मणदुरे, ता. पाटण येथे जळव खिंडीजवळील उंच काऊदरयावर सोमवारी सकाळी दहा वाजता हा सोहळा पार पडला. सातारा जिल्ह्यासह जेजुरीतील मार्तंड जानाईदेवीच्या हजारो भाविक-भक्तांची यावेळी उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाटण, तारळे, सातारा येथील निसर्गप्रेमी तसेच जेजुरीतील ग्रामस्थांनी यात्रा उत्सवाच्या पालखी परंपरेला गत काही वर्षात पर्यावरण रक्षणाची जोड देवून जनजागृती करीत वसुंधरा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यंदाही निसर्गपुजेची ही परंपरा जपण्यात आली. निवकणे येथील जानाईदेवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त जेजुरी येथुन आठ दिवस प्रवास करुन मार्तंड-जानाईदेवी पायी पालखी सोहळा निवकणेत येतो. जेजुरी येथून धार्मिक विधीपूर्वक रथासह पर्यावरणाचा संदेश देणारया पारंपारिक बैलगाड्यांचा ताफा जयाद्री ते सह्याद्री असा दीडशे दोनशे किलोमीटर प्रवास करतो. सोमवारी सकाळी काऊदरयावर दाखल झाली. पुजा झाल्यानंतर झाडे लावा, झाडे जगवा अशी प्रार्थना करीत निसर्गाला नारळ अर्पण करण्यात आले. निसर्गपुजा कार्यक्रमास रविंद्र बारभाई, शेखर बारभाई, गणेश आगलावे विजय झगडे, शब्बीर तांबोळी, गोरख नारकर, शिवाजी कुतवळ, रेखाताई पाटील आदी जेजुरीचे भक्तगण, मणदुरे परिसरातील भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी कमलाकर म्हात्रे, दत्ता पाटील, अनिल म्हात्रे, सुभाष भोईर व मार्तंड जानाईदेवी पालखी सोहळा जेजुरीतील उपस्थित महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्यातील भाविकांनी महाप्रसाद घेतल्यानंतर सोहळा सदस्यांनी काऊदरयावर स्वच्छता मोहिम राबविली. स्वच्छता कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर वाजतगाजत जानाईदेवीच्या पालखीने निवकणेकडे प्रस्थान केले. चौकट शेंद्रेफाटा ते गणेश खिंड, निनाम पाडळी मार्गे पालखी तारळे येथे येते. गणेश खिंड दरम्यानचा रस्ता खराब असुन तो राज्याचे मंत्री पाटणचे लोकप्रतिनिधी ना. शंभुराज देसाई यांनी लक्ष घालुन वाहतुकीस योग्य करावा, अशी मागणी पालखी सोहळ्याच्यावतीने करण्यात आली. चौकट महाप्रसाद आणि पुजा झाल्यानंतर प्लास्टिक कचरा सड्यावर पसरला होता. तात्काळ जेजुरीकर बांधवांनी संपूर्ण कचरा गोळा केला. मोकळी जनावरे पठारावरती फिरत असतात. जनावराच्या पोटामध्ये हा प्लास्टिक कचरा जाऊ नये, म्हणून तात्काळ हा कचरा एकत्रित करण्यात आला. चौकट वनविभागानेही निसर्गपुजेत सहभागी व्हावे अशी अपेक्षा उपस्थितानी केली चौकट वृक्षबिया आणि भंडाऱ्याची उधळण करीत शेकडो भाविकांनी केली निसर्गाची पुजा श्री जानाई देवी मोफत अन्नदान सेवा पायी पालखी सोहळाच्या वतीने गेली वीस वर्ष सुरू आहे वनभोजनानंतर महिलांनी फेर धरत निसर्ग गाणी गायली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर