शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कुणी राधा घ्या, कुणी सीता घ्या...; साताऱ्यात ७० हून अधिक मुलींचं एकाच वेळी नामकरण, जगातील पहिलंच सामूहिक बारसं

By दीपक देशमुख | Updated: March 8, 2023 16:08 IST

महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील ७० हून अधिक मुलींच्या बारशाचा सोहळा पार पडला

सातारा : सामूहिक विवाह सोहळ्याबाबत ऐकले होते; पण सामूहिक बारसे पहिल्यांदाच ऐकले. सातारा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या सामूहिक बारशाचा आजचा उपक्रम राज्याला नक्कीच दिशा देणारा आहे. असा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रथम होत असेल, असे गौरवोद्गार भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काढले.सातारा येथील राधिका संकुलात महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील ७० हून अधिक मुलींच्या बारशाचा कार्यक्रम भाजप महिला मोर्चाच्या वतीने उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. सुनिशा शहा, सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, माजी नगरसेवक विकास भोसले, विठ्ठल बलशेटवार आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी चित्रा वाघ म्हणाल्या, महिला एक दिवस संपावर गेल्यातर काय होईल, याची कुणी कल्पना करू शकत नाही. महिलांना देवत्व देऊ नका; पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मात्र नक्की द्या. आजची महिला कुठेच कमी नाही. तिला आर्थिक बळ मिळणे गरजेचे आहे. आगामी काळात महिला आर्थिक स्वावलंबी कशी होईल, यासाठी महिला माेर्चा काम करेल. महिला जोपर्यंत आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत तिचे सक्षमीकरण होऊ शकत नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा महिलांतील कर्तृत्वाला वाव देणार आहे.लहान मुलांचे बारसे करताना एक ते दोन वर्षांच्या नामकरण न झालेल्या मुलींचेही बारसे झाले. ५१ मुलींचे बारशाचे नियोजन होते; पण ७० हून अधिक मुलींची बारशी झाली. या उपक्रमामुळे मनस्वी आनंद होत असल्याचे उद्गगार वाघ यांनी काढले.यानंतर वाघ यांनी स्वत: काही मुलींचे नामकरण केले. यावेळी नवजात मुलींना भेटवस्तू, पालकांना पोशाख करण्यात आले. हळदी-कुंकू व वाणवाटप सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.नैराश्यातून विरोधकांची वक्तव्येकार्यक्रमानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजघराण्याचा भाजपत सन्मान नसल्याचे विरोधकांचे आरोप असल्याचे पत्रकारांशी सांगितले असता वाघ म्हणाल्या, हातातोंडाशी असलेला घास गेल्यामुळे विरोधक नैराश्यवस्थेत आहेत. त्यामुळे ते वाट्टेल ते बोलत आहेत. त्यांची वक्तव्ये गांभिर्याने घेण्याची गरज नाही. तसेच महिलांच्या सुरक्षितेला सरकार प्राधान्य देत आहे. शक्ती कायदा झाला तर त्याचे स्वागत आहे. तरीही सध्याचे कायदे सक्षम असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. गेल्या सात महिन्यात महिला अत्याचारप्रकरणी कसूर केलेल्या दोन डझन पोलिसांना निलंबीत केले आहे. बारा वर्षांच्या आतील मुलीवर अत्याचार झाल्यास फाशीची तरतूद करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांना सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहेच; पण समाजाने अशा विकृती हटवण्यासाठी सहभाग घेण्याची व जनजागृतीची गरज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWomen's Day Specialजागतिक महिला दिनBJPभाजपा