शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘बांधकाम’च्या खड्ड्याला पालिकेचे नाव

By admin | Updated: January 13, 2016 22:08 IST

पोलीस वसाहतीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष : रस्ता दुरुस्तीअभावी नागरिकांचे गेल्या अनेक महिन्यांपासून हाल

 सातारा : सातारा शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली-बोळातील रस्ते चकाचक झाले असले तरी पालिकेच्या समोरच असलेल्या पोलीस वसाहतीचा रस्ता अजूनही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणच्या खड्ड्यात वाहन अडकले तर नागरिक पालिकेलाच जबाबदार धरत आहेत. वास्तविक हा रस्ता बांधकाम विभागाच्या हद्दीतील असूनदेखील खड्ड्यासाठी पालिकेला नावे ठेवण्यात येत असल्याचा प्रकार येथे पाहायला मिळत आहे. नगरपरिषदेच्या मुख्य द्वारासमोरच पोलीस वसाहत आहे. आंबेडकर स्मारकापासून शहर पोलीस स्टेशनकडे जाणारा हा रस्ता मागील दोन ते तीन वर्षांपासून डांबरीकरण न झाल्याने जगोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविताना खड्डे चुकविण्याचे जणू आव्हानच वाहनधारकाला पेलावे लागते. शहरातील अगदी काही ठिकाणी १० ते २० वर्षांपूर्वीचे रस्ते प्रथमच डांबरीकरण केले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु पालिकेच्या समोरील खड्डे पालिकेला दिसत का नाही, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. पालिका प्रशासन व अधिकाऱ्यांना वाहनधारकांचे बोलणे खावे लागत आहे. याचा जास्त खुलासा केल्यानंतर वाहनधारकांच्या लक्षात येते की, हा रस्ता बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असून, या रस्त्याची जबाबदारीही बांधकाम विभागाची आहे. दरम्यान, पोलीस वस्तीतील दुरुस्तीही सर्व जबाबदारी ही बांधकाम विभागाची आहे. या वसाहतीच्या प्रत्येक निवासस्थानाकडून दुरुस्तीसाठी पगारातून रक्कम कपात केली जाते. तरीदेखील बांधकाम विभाग या वसाहतीकडे किमान मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करीत आहे. या वसाहतीतील रस्ते कमी आणि खड्डे जास्त, अशी अवस्था झाली असून, रस्त्याची मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. वेळोवेळी पोलीसच मातीचा भराव टाकून रस्ता दुरुस्त करत आहेत. साताऱ्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ऐकेरी वाहतूक सुरू केली आहे. तेव्हापासून या रस्त्यावर वर्दळ वाढली असून, बहुतांशी शहरातील नागरिक याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असल्याचे पहायला मिळते. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी पोलीस वसाहती बरोबर शहरातील नागरिकांनीही केली आहे. (प्रतिनिधी) चारचाकी वाहनांचे होतेय नुकसान ४एकेरी वाहतुकीच्या वेळी अनेकदा जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याचा आधार घेतला होता. मात्र, चारचाकी वाहनांना या रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यात असणारे खड्डे आणि स्पीडब्रेकर यामुळे चारचाकी वाहन नियंत्रणात आणणे चालकाल कसरतीचे वाटत असल्याचे चित्र दिसते.