शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून कोट्यवधीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:39 IST

फलटण : ‘खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची ...

फलटण : ‘खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे,’ असा गंभीर आरोप दिगंबर आगवणे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.दिगंबर आगवणे यांनी अर्जात म्हटले आहे की, व्यवसायाच्या माध्यमातून २००७ मध्ये रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या सुरवडी येथील तत्कालीन स्वराज दूध डेअरीसाठी लाकूड पुरवठा करीत होतो. तेव्हापासून आर्थिक व्यवहार होते. त्यानंतर रणजितसिंह यांनी त्यांच्या उपळवे येथील स्वराज कारखान्याचे व्हाईस चेअरमनपदाचे आमिष दाखवून आर्थिक मदतीची विनंती केली.आपण २०१४ मध्ये पिंपळवाडी येथील सर्व्हे नं. ६४/४, क्षेत्र १.६२ हेक्टर ही जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुणे कॅम्प शाखाकडून ५० कोटी, बँक ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतून ४७.१३ कोटी आणि कॅनरा बँककडून ४५ कोटी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या साखर कारखान्यास कर्ज मिळण्याकरिता गहाण ठेवली. ऑक्टोबर २०१४ मध्ये नमूद कारखान्याचे व्हाईस चेअरमनपदावर आपली नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले.डिस्टिलरी प्रोजेक्टसाठी पुन्हा ही जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुणे कॅम्प शाखेत गहाण ठेवून ८४ कोटी कर्ज असे २२६ कोटी रुपये कर्ज साखर कारखान्याच्या चेअरमन रणजितसिंह निंबाळकर आणि संचालक मंडळाने तिन्ही बँकेच्या संमतीने काढले आहे.रणजितसिंह हे चेअरमन असलेल्या स्वराज पतसंस्थेतून २०१३ मध्ये त्यांच्या पत्नी जिजामाला यांना पंचायत समितीची निवडणूक लढवायची असल्याने आपल्या नावे कर्ज घेतले. पुढे २०१६-२०१७ मध्ये त्यांनी याच पतसंस्थेमध्ये आपली सुरवडी येथील शेत सर्व्हे नं. ४८/२ ह्या जमिनीचा वाद सुरू असल्यामुळे त्यांच्यावर वहिवाट व बोजा दिसण्यासाठी केस चालू असताना रणजितसिंह यांनी ही जमीन गहाण ठेवून एक कोटी रुपये कर्ज घेतले होते.परंतु कर्ज प्रकरणात आपल्या सह्या घेऊन संबंधित रक्कम आपल्याला मिळालेली नाही. त्यांपैकी परस्पर ५९ लाख रुपये कर्ज पतसंस्थेमध्ये कारखान्याने भरल्याचे आपल्याला समजले आहे. या कर्ज प्रकरणात आपल्या सह्या असल्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या पतसंस्थेद्वारे कलम १३८ एन. आय. ॲक्टप्रमाणे न्यायालयात दावा दाखला केला आहे, असे दिगंबर आगवणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणांवरून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड या साखर कारखान्याचे सर्व संचालक आणि स्वराज नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक यांच्याविरोधात विश्वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर