शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून कोट्यवधीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:39 IST

फलटण : ‘खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची ...

फलटण : ‘खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे,’ असा गंभीर आरोप दिगंबर आगवणे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.दिगंबर आगवणे यांनी अर्जात म्हटले आहे की, व्यवसायाच्या माध्यमातून २००७ मध्ये रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या सुरवडी येथील तत्कालीन स्वराज दूध डेअरीसाठी लाकूड पुरवठा करीत होतो. तेव्हापासून आर्थिक व्यवहार होते. त्यानंतर रणजितसिंह यांनी त्यांच्या उपळवे येथील स्वराज कारखान्याचे व्हाईस चेअरमनपदाचे आमिष दाखवून आर्थिक मदतीची विनंती केली.आपण २०१४ मध्ये पिंपळवाडी येथील सर्व्हे नं. ६४/४, क्षेत्र १.६२ हेक्टर ही जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुणे कॅम्प शाखाकडून ५० कोटी, बँक ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतून ४७.१३ कोटी आणि कॅनरा बँककडून ४५ कोटी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या साखर कारखान्यास कर्ज मिळण्याकरिता गहाण ठेवली. ऑक्टोबर २०१४ मध्ये नमूद कारखान्याचे व्हाईस चेअरमनपदावर आपली नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले.डिस्टिलरी प्रोजेक्टसाठी पुन्हा ही जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुणे कॅम्प शाखेत गहाण ठेवून ८४ कोटी कर्ज असे २२६ कोटी रुपये कर्ज साखर कारखान्याच्या चेअरमन रणजितसिंह निंबाळकर आणि संचालक मंडळाने तिन्ही बँकेच्या संमतीने काढले आहे.रणजितसिंह हे चेअरमन असलेल्या स्वराज पतसंस्थेतून २०१३ मध्ये त्यांच्या पत्नी जिजामाला यांना पंचायत समितीची निवडणूक लढवायची असल्याने आपल्या नावे कर्ज घेतले. पुढे २०१६-२०१७ मध्ये त्यांनी याच पतसंस्थेमध्ये आपली सुरवडी येथील शेत सर्व्हे नं. ४८/२ ह्या जमिनीचा वाद सुरू असल्यामुळे त्यांच्यावर वहिवाट व बोजा दिसण्यासाठी केस चालू असताना रणजितसिंह यांनी ही जमीन गहाण ठेवून एक कोटी रुपये कर्ज घेतले होते.परंतु कर्ज प्रकरणात आपल्या सह्या घेऊन संबंधित रक्कम आपल्याला मिळालेली नाही. त्यांपैकी परस्पर ५९ लाख रुपये कर्ज पतसंस्थेमध्ये कारखान्याने भरल्याचे आपल्याला समजले आहे. या कर्ज प्रकरणात आपल्या सह्या असल्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या पतसंस्थेद्वारे कलम १३८ एन. आय. ॲक्टप्रमाणे न्यायालयात दावा दाखला केला आहे, असे दिगंबर आगवणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणांवरून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड या साखर कारखान्याचे सर्व संचालक आणि स्वराज नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक यांच्याविरोधात विश्वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर