शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

डोंगरकपारीतील धबधबे ठरतायेत पर्यटनाचे केंद्रबिंदू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : ‘हिरवा निसर्ग हा संगतीने, जीवन सफर करा गमतीने’ या काव्यपंक्ती वास्तवात उतरविण्यासाठी अलीकडे पर्यटकांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खंडाळा : ‘हिरवा निसर्ग हा संगतीने, जीवन सफर करा गमतीने’ या काव्यपंक्ती वास्तवात उतरविण्यासाठी अलीकडे पर्यटकांचा कल नैसर्गिक ठिकाणांकडे वाढला आहे. हिरव्यागार निसर्गाची मौज लुटण्यासाठी पावसाळा सुरू झाला की डोंगरमाथ्यावरील ठिकाणे, दऱ्याखोऱ्यातील छोटे-मोठे धबधबे हे पर्यटनाचे केंद्रबिंदू होऊ लागले आहेत. त्यामुळे या नव्या स्थळांचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढताना दिसत आहे.

पावसाळा सुरु झाला की निसर्गात रंगांची मुक्त उधळण पाहायला मिळते. आजूबाजूच्या डोंगररांगा हिरवाई नटून जातात. डोंगराच्या उंच कड्यावरून पावसाचे पाणी धबधब्याच्या रूपाने फेसाळत कोसळताना दिसू लागते. हा सर्वच निसर्गरम्य देखावा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी कौटुंबिक सहलींसह मित्र-मैत्रिणींचा कल अशा ठिकाणांकडे वाढताना पाहायला मिळत आहे.

पर्यटन ही हल्ली हौस बनू लागली आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे धार्मिक आणि पौराणिक स्थळांकडे न जाता नैसर्गिक ठिकाणांकडे ओढा अधिक वाढत आहे. त्यातच प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी असल्याने निसर्गातील उंच डोंगर, घनदाट जंगलातील वाटा, फेसाळणारे धबधबे, ऐतिहासिक गड किल्ले, नदीकाठचे प्रदेश, अथांग समुद्रकिनारा याची प्राधान्याने निवड केली जाते.

(चौकट..)

कुटुंबासह पर्यटनस्थळी गर्दी

कोरोनामुळे पडलेल्या लॉकडाऊनमध्ये सध्या शिथिलता दिल्याने गेल्या दीड वर्षात घराबाहेर पडू न शकलेली पर्यटनप्रेमी मोठ्या उत्साहाने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह, मित्रांसह पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. घरात कोंदटलेल्या वातावरणात आणि शहरातील कोरोनाच्या भीतीचे वातावरणापासून दोन दिवस निसर्गाच्या सान्निध्यात जाणे अधिक सोयीस्कर मानले जात आहे. त्यामुळे अशा पर्यटनस्थळी गर्दी वाढताना दिसत आहे .॥

(चौकट)

नैसर्गिक ठिकाणांकडे अधिक आकर्षण..!

सातारा जिल्ह्यात खंडाळ्याची हरेश्वर डोंगररांग, वाईच्या पश्चिम भागातील जोर, जांभळी खोरे, रायरेश्वर, कोळेकर पठार, महाबळेश्वरची सह्याद्री पर्वतरांग, जावळीचे निर्भीड अरण्य, मेरुलिंग, सूळपाणी डोंगर, साताराचे परळी, यवतेश्वर खोरे, जरंडेश्वरचा डोंगर, कास पठार, पाटणमधील कोयना, मोरगिरी खोरे, सडावाघापूर, वाल्मीकी पठार या भागातील नैसर्गिक ठिकाणांकडे अधिक आकर्षण आहे.

(कोट..)

भटकंती हा माणसाचा सहजभाव आहे. नैसर्गिक ठिकाणी झाडाझुडपांच्या आणि पशुपक्ष्यांच्या सहवासात दोन दिवस घालवल्यामुळे मन प्रसन्न होते. पुढील कामासाठी चैतन्य निर्माण होते. त्याचबरोबर डोंगरवाटा चालत राहिल्याने आरोग्य अधिक चांगले राहते. यासाठी धार्मिक स्थळांपेक्षा डोंगरातील नवीन ठिकाणे नेहमी आकर्षित करतात. आम्ही त्याची मौज घेत असतो.

-मिलिंद बच्चेवार, अधीक्षक अभियंता, पर्यटक

........................................

२७खंडाळा

निसर्गरम्य देखावा डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी कौटुंबिक सहलींसह मित्र-मैत्रिणींचा कल अशा ठिकाणांकडे वाढताना पाहायला मिळत आहे.