शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

सातारा जिल्ह्यात २४ मंडलात अतिवृष्टी, कऱ्हाड तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार 

By नितीन काळेल | Updated: May 23, 2025 17:00 IST

शेत जमीनही वाहून गेली, ६ जनावरे, १५० कोंबड्यांचा मृत्यू अन् ४० घरांची पडझड 

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरूच असून २४ तासांत तब्बल २४ महसुल मंडलात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर पावसामुळे आतापर्यंत मोठ्या ६ जनावरांचा आणि १५० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४० घरांचेही नुकसान झालेले आहे. कऱ्हाड तालुक्यात शेतात खत टाकण्यासाठी गेल्यावर तुटलेल्या वीजतारेचा धक्का बसल्याने वृध्द शेतकरी ठार झाला. तसेच पेरले येथे शेत जमीन वाहून जाण्याचा प्रकार घडला आहे.सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. सोमवारपासून तर पावसाची उसंतच नाही. रात्रं-दिवस पाऊस पडू लागला आहे. आतापर्यंत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झालेला आहे. यामुळे नुकसानीच्याही घटना घडू लागल्या आहेत. वळवाच्या पावसामुळे वाई आणि फलटण तालुक्यात प्रत्येकी १ तर माण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी २ असे मिळून एकूण ६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर खटाव तालुक्यातच १५० कोंबड्याचाही मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.

सततच्या पावसात घरांचीही पडझड सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० घरांचे नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे. सातारा आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी १२ घरांचे तर कोरेगावला ६, वाई तालुक्यात ४, पाटण ३, माणमध्ये २ आणि खंडाळा तालुक्यात एका घराची पडझड झालेली आहे.

पेरलेतील शेतकऱ्याचा मृत्यू; वडोलीत जमीन वाहून गेली..कऱ्हाड तालुक्यातील पेरले येथील संभाजी सूर्यवंशी (वय ७०) हे गुरूवारी सायंकाळी शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तुटलेल्या वीजतारेचा धक्का बसला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कऱ्हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथे पावसामुळे अर्धा एेकर शेत जमीन वाहून गेली. त्यामुळे हळद पिकाचे नुकसान झाले आहे.

६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस..२४ तासांत जिल्ह्यातील तब्बल २४ मंडलात अतिवृष्टी झाली. ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. सातारा तालुक्यातील सातारा मंडलात ७६.८ मिलिमीटरची नोंद झाली. तर वर्ये ९३, कण्हेर ७७, अंबवडे ८९, दहिवड ७७, परळी मंडलात ८९ मिलिमीटर पाऊस झाला. जावळी तालुक्यात मेढा १०३, आनेवाडी ११०, कुडाळ ९८, बामणोली १२८, केळघर आणि करहर मंडलात १०३ मिलिमीटर पाऊस पडला.

कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशन ६६.५ आणि किन्हई मंडलात ८८.५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. वाई तालुक्यातील पसरणी मंडलात १०३, भुईंज आणि पाचवड ८४, धोम आणि वाई मंडल ७२ तर ओझर्डेत ७१ मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर तालुक्यात तापोळा मंडलात सर्वाधिक १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वर आणि पाचगणी मंडल १०३ आणि लामजला ७९ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKaradकराडFarmerशेतकरीDeathमृत्यू