शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
5
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
6
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
7
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
8
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
9
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
10
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
11
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
12
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
13
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
14
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
15
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
16
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
17
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
18
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
19
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
20
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

सातारा जिल्ह्यात २४ मंडलात अतिवृष्टी, कऱ्हाड तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार 

By नितीन काळेल | Updated: May 23, 2025 17:00 IST

शेत जमीनही वाहून गेली, ६ जनावरे, १५० कोंबड्यांचा मृत्यू अन् ४० घरांची पडझड 

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरूच असून २४ तासांत तब्बल २४ महसुल मंडलात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर पावसामुळे आतापर्यंत मोठ्या ६ जनावरांचा आणि १५० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४० घरांचेही नुकसान झालेले आहे. कऱ्हाड तालुक्यात शेतात खत टाकण्यासाठी गेल्यावर तुटलेल्या वीजतारेचा धक्का बसल्याने वृध्द शेतकरी ठार झाला. तसेच पेरले येथे शेत जमीन वाहून जाण्याचा प्रकार घडला आहे.सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. सोमवारपासून तर पावसाची उसंतच नाही. रात्रं-दिवस पाऊस पडू लागला आहे. आतापर्यंत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झालेला आहे. यामुळे नुकसानीच्याही घटना घडू लागल्या आहेत. वळवाच्या पावसामुळे वाई आणि फलटण तालुक्यात प्रत्येकी १ तर माण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी २ असे मिळून एकूण ६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर खटाव तालुक्यातच १५० कोंबड्याचाही मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.

सततच्या पावसात घरांचीही पडझड सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० घरांचे नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे. सातारा आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी १२ घरांचे तर कोरेगावला ६, वाई तालुक्यात ४, पाटण ३, माणमध्ये २ आणि खंडाळा तालुक्यात एका घराची पडझड झालेली आहे.

पेरलेतील शेतकऱ्याचा मृत्यू; वडोलीत जमीन वाहून गेली..कऱ्हाड तालुक्यातील पेरले येथील संभाजी सूर्यवंशी (वय ७०) हे गुरूवारी सायंकाळी शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तुटलेल्या वीजतारेचा धक्का बसला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कऱ्हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथे पावसामुळे अर्धा एेकर शेत जमीन वाहून गेली. त्यामुळे हळद पिकाचे नुकसान झाले आहे.

६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस..२४ तासांत जिल्ह्यातील तब्बल २४ मंडलात अतिवृष्टी झाली. ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. सातारा तालुक्यातील सातारा मंडलात ७६.८ मिलिमीटरची नोंद झाली. तर वर्ये ९३, कण्हेर ७७, अंबवडे ८९, दहिवड ७७, परळी मंडलात ८९ मिलिमीटर पाऊस झाला. जावळी तालुक्यात मेढा १०३, आनेवाडी ११०, कुडाळ ९८, बामणोली १२८, केळघर आणि करहर मंडलात १०३ मिलिमीटर पाऊस पडला.

कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशन ६६.५ आणि किन्हई मंडलात ८८.५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. वाई तालुक्यातील पसरणी मंडलात १०३, भुईंज आणि पाचवड ८४, धोम आणि वाई मंडल ७२ तर ओझर्डेत ७१ मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर तालुक्यात तापोळा मंडलात सर्वाधिक १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वर आणि पाचगणी मंडल १०३ आणि लामजला ७९ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKaradकराडFarmerशेतकरीDeathमृत्यू