शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सातारा जिल्ह्यात मान्सूनची सलामी; दुष्काळी भागात ओढ्यांना पाणी, शेतकऱ्यांमध्ये आनंद

By नितीन काळेल | Updated: June 8, 2024 18:55 IST

कोयनेसह सर्वदूर पाऊस : काही ठिकाणी पुलावरुन पाणी 

सातारा : जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून, सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. तरीही शनिवारी साताऱ्यासह पश्चिम भागात अनेक ठिकाणी धुवाॅंधार पाऊस पडला. तर पूर्व दुष्काळी भागातही धो-धो पाऊस झाला. यामुळे ओढे भरुन वाहिले. तसेच पुलावरुन पाणी गेल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. तर या पावसामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण असून खरीप पेरणीला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात मागील दोन वर्षांत मान्सूनचा पाऊस १० जूननंतर दाखल झाला. त्यानंतरही पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला होता. यंदा मात्र मान्सून वेळेवर दाखल झाला आहे. जिल्ह्यात गुरूवारपासूनच पाऊस पडू लागलाय. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजा या भागात चांगला होत आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यांतीलही अनेक गावांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्री तर सातारा शहरात विजांच्या कडकडाटात पाऊस पडला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. त्यातच शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. तर शनिवारी दुपारच्या सुमारासही सातारा शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पाऊस कोसळत होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास पाऊस थांबला. पण, त्यानंतरही आभाळ भरुन आले आणि सायंकाळी साडे पाच वाजल्यापासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे शहरातील गटारी भरुन वाहिली. तसेच सर्व रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. सखल भागातही पाणी साचून राहिले.पूर्व भागातील माण, खटाव, फलटण या भागात चांगला पाऊस झाला. माणमधील वरकुटे मलवडी, शेनवडी, कुरणवाडी, काळचाैंडी परिसरात दमदार पाऊस पडला. यामुळे काही ठिकाणी ओढ्याला पाणी आले. तसेच जमिनीतही पाणी साचून राहिले. हा पाऊस खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तालुक्यातीलच मार्डी, पळशी, मोही परिसरातही पावसाने चांगलेच झोडपले. तासभर झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले होते.फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात सलग तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शनिवारच्या पावसामुळे आदर्की, हिंगणगाव ओढ्याला पूर आला होता. सावतानगर आणि पठाण वस्तीकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहिल्यामुळे काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. खंडाळा तालुक्यातही पाऊस झाला. खंबाटकी घाट आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर पावसामुळे समोरील काहीच दिसत नसल्याने महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.

कोयना, नवजाला आतापर्यंत ३७ मिलिमीटर पाऊस..जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १२ आणि नवजा येथे २१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला पाऊस झाला नाही. तर १ जूनपासून आतापर्यंत कोयना आणि नवजा येथे प्रत्येकी ३७ आणि महाबळेश्वरला १२ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. इतर भागातही पाऊस झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी