शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

मोहिते-भोसले मनोमिलनासाठी पतंगरावांची साद! अतुलबाबांची ‘गुगली : पतंगरावांचे आवाहन अन् मदनदादांचा प्रतिसाद; राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:05 IST

कºहाड : जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर राजकीय फटकेबाजीही अनुभवायला मिळाली.

ठळक मुद्देशुक्रवारी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर राजकीय फटकेबाजीही अनुभवायला मिळाली‘त्याच्या जन्माच्या अगोदर कृष्णाकाठच्या यशवंत-जयवंत यांचं बंधुप्रेम

प्रमोद सुकरे ।कºहाड : जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर राजकीय फटकेबाजीही अनुभवायला मिळाली. प्रास्ताविकातच अतुलबाबांनी पतंगरावांना उद्देशून ‘गुगली’ टाकली. त्यावर माजीमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मोहिते-भोसले मनोमिलनासाठी पुन्हा एकदा साद घातली. तर त्याला मदनदादांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

खरंतर आजच्या कार्यक्रम पत्रिकेवर निमंत्रित म्हणून डॉ. सुरेश भोसले, मदनराव मोहिते आणि डॉ. अतुल भोसले या तिघांचीच नावे होती. त्यामुळे डॉ. इंद्रजित मोहिते या कार्यक्रमासाठी असणार की नाही, याबाबत अनेकांच्या मनातशंका होती. मात्र, प्रत्यक्षात मोहिते-भोसले कुटुंबाचे मार्गदर्शक असणाºया माजीमंत्री पतंगराव कदम यांच्यासोबत डॉ. इंद्रजित मोहितेही व्यासपीठावर कार्यक्रमाला हजर राहिले.

त्यामुळे अनेकांच्या शंकांना उत्तर मिळाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यासपीठावरील मान्यवरांचा उल्लेख करताना भारती विद्यापीठाचे प्रमुख डॉ. पतंगराव कदम यांचा विशेष उल्लेख केला. ‘त्यांचे आमच्या कुटुंबावर नेहमीच प्रेम राहिले आहे,’ असे सांगतानाच ‘फक्त इंद्रजितबाबांवर जरा जास्तच प्रेम आहे,’ असा चिमटा त्यांनी काढला. त्यावेळी उपस्थितांमध्ये खसखस पिकली.मात्र, आता पतंगराव कदम काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागली होती. डॉ. पतंगराव कदम बोलायला उभे राहिल्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत ‘अतुल तरुण नेता आहे,’ अशी सुरुवात केली. ‘त्याच्या जन्माच्या अगोदर कृष्णाकाठच्या यशवंत-जयवंत यांचं बंधुप्रेम साºया महाराष्ट्राला माहिती होतं पण त्याला दृष्ट लागली. हे घरएकत्र राहिलं पाहिजे, अशी माझी इच्छा होती, आहे आणि राहील.सगळे एकत्र आल्याशिवा गतवैभव प्राप्त होणार नाही,’ असे सांगायलाही यावेळी पतंगराव कदम विसरले नाहीत.पतंगराव कदम यांंच्या भाषणानंतर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते बोलायला उभे राहिले. त्यांनी अप्पा आणि भाऊंच्या कार्याबद्दल बोलतानाच, ‘पतंगराव कदम यांनी सांगितलेले मला पटलं आहे. म्हणून तर मी अतुलच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतलाय,’असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद दिला.अर्ज काढून घेतले नसते तर..!या साºयांचा मी एकदा मेळ घातला होता. त्यावेळेला सुरेशबाबांनी जर आपल्या समर्थकांचे कृष्णा कारखाना निवडणुकीतील अर्ज मागे काढून घेतले नसते तर कारखाना चुकीच्या लोकांच्या ताब्यात गेला नसता. आणि कारखान्याचा खेळखंडोबाही झाला नसता, अशा कानपिचक्याही पतंगरावांनी यावेळी दिल्या.‘ते’ काळ ठरवेलराजकीय पटलावर अनेक घडामोडी घडत असतात. त्यानुसार अतुललाही काही राजकीय निर्णय घ्यावे लागले आहेत. त्याने घेतलेले निर्णय बरोबर की चूक, हे येणारा काळ ठरवेल; पण घर एकत्र असणं गरजेचं असल्याचं पतंगरावांनी यावेळी आवर्जून सांगितलं.जयवंतराव अप्पाच भाजपमध्ये येणार होते!माजीमंत्री चिमणराव डांगे यांनी आपल्या भाषणात जयवंतराव भोसले अप्पाच भाजपच्या चिन्हावर लोकसभेला उभे राहणार होते, असे सांगितले. मात्र, त्यावेळी कºहाड लोकसभेची जागा भाजप-शिवसेना युतीमध्ये सेनेकडे होती. त्यामुळे तांत्रिक अडचण असल्याने अप्पांनी शिवसेनाप्रणित उमेदवार म्हणून निवडणूक लढवली असल्याचे डांगे यांनी सांगितले. हाच धागा पकडत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आजोबांची इच्छा नातवाने पूर्ण केली असल्याचे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्याला दाद दिली.