शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

मोहिते-भोसले मनोमिलनासाठी पतंगरावांची साद! अतुलबाबांची ‘गुगली : पतंगरावांचे आवाहन अन् मदनदादांचा प्रतिसाद; राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:05 IST

कºहाड : जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर राजकीय फटकेबाजीही अनुभवायला मिळाली.

ठळक मुद्देशुक्रवारी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर राजकीय फटकेबाजीही अनुभवायला मिळाली‘त्याच्या जन्माच्या अगोदर कृष्णाकाठच्या यशवंत-जयवंत यांचं बंधुप्रेम

प्रमोद सुकरे ।कºहाड : जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर राजकीय फटकेबाजीही अनुभवायला मिळाली. प्रास्ताविकातच अतुलबाबांनी पतंगरावांना उद्देशून ‘गुगली’ टाकली. त्यावर माजीमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मोहिते-भोसले मनोमिलनासाठी पुन्हा एकदा साद घातली. तर त्याला मदनदादांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

खरंतर आजच्या कार्यक्रम पत्रिकेवर निमंत्रित म्हणून डॉ. सुरेश भोसले, मदनराव मोहिते आणि डॉ. अतुल भोसले या तिघांचीच नावे होती. त्यामुळे डॉ. इंद्रजित मोहिते या कार्यक्रमासाठी असणार की नाही, याबाबत अनेकांच्या मनातशंका होती. मात्र, प्रत्यक्षात मोहिते-भोसले कुटुंबाचे मार्गदर्शक असणाºया माजीमंत्री पतंगराव कदम यांच्यासोबत डॉ. इंद्रजित मोहितेही व्यासपीठावर कार्यक्रमाला हजर राहिले.

त्यामुळे अनेकांच्या शंकांना उत्तर मिळाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यासपीठावरील मान्यवरांचा उल्लेख करताना भारती विद्यापीठाचे प्रमुख डॉ. पतंगराव कदम यांचा विशेष उल्लेख केला. ‘त्यांचे आमच्या कुटुंबावर नेहमीच प्रेम राहिले आहे,’ असे सांगतानाच ‘फक्त इंद्रजितबाबांवर जरा जास्तच प्रेम आहे,’ असा चिमटा त्यांनी काढला. त्यावेळी उपस्थितांमध्ये खसखस पिकली.मात्र, आता पतंगराव कदम काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागली होती. डॉ. पतंगराव कदम बोलायला उभे राहिल्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत ‘अतुल तरुण नेता आहे,’ अशी सुरुवात केली. ‘त्याच्या जन्माच्या अगोदर कृष्णाकाठच्या यशवंत-जयवंत यांचं बंधुप्रेम साºया महाराष्ट्राला माहिती होतं पण त्याला दृष्ट लागली. हे घरएकत्र राहिलं पाहिजे, अशी माझी इच्छा होती, आहे आणि राहील.सगळे एकत्र आल्याशिवा गतवैभव प्राप्त होणार नाही,’ असे सांगायलाही यावेळी पतंगराव कदम विसरले नाहीत.पतंगराव कदम यांंच्या भाषणानंतर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते बोलायला उभे राहिले. त्यांनी अप्पा आणि भाऊंच्या कार्याबद्दल बोलतानाच, ‘पतंगराव कदम यांनी सांगितलेले मला पटलं आहे. म्हणून तर मी अतुलच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतलाय,’असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद दिला.अर्ज काढून घेतले नसते तर..!या साºयांचा मी एकदा मेळ घातला होता. त्यावेळेला सुरेशबाबांनी जर आपल्या समर्थकांचे कृष्णा कारखाना निवडणुकीतील अर्ज मागे काढून घेतले नसते तर कारखाना चुकीच्या लोकांच्या ताब्यात गेला नसता. आणि कारखान्याचा खेळखंडोबाही झाला नसता, अशा कानपिचक्याही पतंगरावांनी यावेळी दिल्या.‘ते’ काळ ठरवेलराजकीय पटलावर अनेक घडामोडी घडत असतात. त्यानुसार अतुललाही काही राजकीय निर्णय घ्यावे लागले आहेत. त्याने घेतलेले निर्णय बरोबर की चूक, हे येणारा काळ ठरवेल; पण घर एकत्र असणं गरजेचं असल्याचं पतंगरावांनी यावेळी आवर्जून सांगितलं.जयवंतराव अप्पाच भाजपमध्ये येणार होते!माजीमंत्री चिमणराव डांगे यांनी आपल्या भाषणात जयवंतराव भोसले अप्पाच भाजपच्या चिन्हावर लोकसभेला उभे राहणार होते, असे सांगितले. मात्र, त्यावेळी कºहाड लोकसभेची जागा भाजप-शिवसेना युतीमध्ये सेनेकडे होती. त्यामुळे तांत्रिक अडचण असल्याने अप्पांनी शिवसेनाप्रणित उमेदवार म्हणून निवडणूक लढवली असल्याचे डांगे यांनी सांगितले. हाच धागा पकडत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आजोबांची इच्छा नातवाने पूर्ण केली असल्याचे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्याला दाद दिली.