शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कोणी अंगावर आले तर शिंगावर घ्या, मंत्री शंभूराज देसाईंनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 19:25 IST

त्या व्यक्तीने चुकीची माहिती दिल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची सुपारी याच व्यक्तीने कुणाला तरी दिली होती.’

रहिमतपूर : ‘रहिमतपूर नगरपरिषदेत काम करत असताना ‘आर ला कारं’ करायची वेळ आली तर मागे सरकायचे नाही. विनाकारण कुणाच्या अंगावर जायचं नाही, पण कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचे,’ असा इशारा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.रहिमतपूर येथे शुक्रवारी आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण माने होते. यावेळी संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, जयवंत शेलार, सुरेश भोसले, ज्ञानेश्वर गोडसे, प्रशांत साळुंखे, दत्ता भोसले उपस्थित होते.

त्या व्यक्तीने चुकीची माहिती दिल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेशंभूराज देसाई म्हणाले, ‘भाजप-शिवसेना युतीतून २०१९ मध्ये निवडणूक लढविली. मतदारांनी पाठबळ दिल्याने भाजप-सेनेला स्पष्ट बहुमत मिळाले; परंतु भाजपऐवजी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर मिळून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे किंगमेकर म्हणून ओळखले जातात. त्यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनीही किंगमेकर म्हणून काम करत मुख्यमंत्रिपद सामान्य शिवसैनिकाला द्यावे. शिवसैनिकांचे होते परंतु उद्धव ठाकरेंच्या कायमजवळ असणारी व्यक्ती जी पंधरा दिवसांपासून जवळ दिसत नाही. त्या व्यक्तीने चुकीची माहिती दिल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची सुपारी याच व्यक्तीने कुणाला तरी दिली होती.’‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांना पक्षाला वेळ देण्यासाठी मर्यादा आल्या. त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्या वाढल्यामुळे शिवसेना आमदार, जिल्हाप्रमुख, शिवसैनिक यांना ते वेळ देऊ शकले नाहीत. ते हळूहळू शिवसैनिकांपासून दुरावले. मुंबई बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराबरोबर संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून आम्हाला कुणी बसवले? या कृतीतूनच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी केली. यामुळेच शिवसेनेत उठाव झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर नैसर्गिक युती करून भाजप-शिवसेना असे नवीन सरकार बनले.

मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे निर्णय उपमुख्यमंत्रीच घ्यायचे

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. उद्धव ठाकरे अनेकदा गैरहजर असत; परंतु त्याची उणीव उपमुख्यमंत्री अजित पवार भरून काढायचे. मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे निर्णय उपमुख्यमंत्रीच घ्यायचे. त्यामुळे जनतेला वाटायचे सरकार अजित पवारच चालवतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात शिवसेना चौथ्या नंबरला गेली.

रहिमतपूरला संपर्क संपर्कप्रमुखपद असतानाही मेळावा नाही

रहिमतपूरला राज्यस्तरावरील संपर्कप्रमुखपद असताना शिवसेनेच्या मंत्र्याला बोलावून रहिमतपूरला कधी मेळावा झाला नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे तत्कालीन उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्यावर शंभूराज देसाई यांनी घणाघात केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाई