शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

जिल्ह्यात साखर उत्पादनाची कोटी क्विंटलकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST

वाठार स्टेशन : जिल्ह्यातील सोळापैकी पंधरा कारखान्यांचे गाळप वेगाने सुरू आहे. या हंगामात जरंडेश्वरने सर्वाधिक १२ लाख ४५ हजार ...

वाठार स्टेशन : जिल्ह्यातील सोळापैकी पंधरा कारखान्यांचे गाळप वेगाने सुरू आहे. या हंगामात जरंडेश्वरने सर्वाधिक १२ लाख ४५ हजार १७० मेट्रिक टन गाळप करीत १४ लाख ७ हजार ६०० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यापाठोपाठ कृष्णा कारखान्याने १२ लाख ५६ हजार २४० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात १९ मार्चअखेर जिल्ह्यात ८७ लाख ८७ हजार ९२३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ९७ लाख ८८ हजार ८६६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

मागील वर्ष सोडता सलग दोन वर्षांत शंभर लाख क्विंटल साखरेचे उत्पादन जिल्ह्यात झाले होते. या तुलनेत यंदाही साखर उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. या वर्षीही शंभर लाख क्विंटल साखरेचे उत्पादनाचा टप्पा सहज पार होणार आहे.

एका बाजूने साखर उत्पादन वाढत असताना दुसऱ्या बाजूने मात्र शेतकऱ्याला ऊस दर देण्याबाबतीत अनेक कारखाने उदासीन आहेत. एकरकमी एफआरपी दर देण्याची मानसिकता अनेक कारखानदारांची दिसत नाही. दोन ते तीन टप्प्यांत एफआरपी देण्यासाठी कारखान्यानी शेतकऱ्यांना बांधून घेतलं आहे.

जिल्ह्यात १९ मार्चअखेर श्रीराम जवाहर कारखान्याने ५ लाख ५ हजार ८०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. न्यू फलटण साखरवाडीने ५ लाख २२ हजार ४२० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. शरयू शुगरने ७ लाख २९ हजार ८०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. स्वराज इंडिया फलटणने ५ लाख ४४ हजार १५ लाख क्विंटल, जरंडेश्वर शुगरने १४ लाख ७ हजार ६०० लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

जयवंत शुगरने ६ लाख २८ हजार १५० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कृष्णाने १२ लाख ५६ हजार २४० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सह्याद्रीने १२ लाख ५० हजार ३६० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. रयत कारखान्याने ५ लाख ३८ हजार १७० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने २ लाख ४ हजार ३० मेट्रिक टन उसाचे गाळप करीत २ लाख ४४ हजार ६२५ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. अजिंक्यतारा कारखान्याने ६ लाख ४० हजार ६८० लाख मेट्रिक टन उत्पादित केली आहे.

किसन वीर साखर कारखान्याने ३ लाख ५६ हजार ४१० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे, तर नुकताच किसनवीर कारखान्याचा खंडाळा कारखान्याने २ लाख ७१ हजार १०० मेट्रिक टन गाळप करीत १ लाख ७० हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे, तर मागील वर्षीची एफआरपी न दिल्याने प्रतापगड कारखाना बंद आहे.

चौकट :

दुष्काळी तालुकेही अग्रेसर

माण खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगरने ५ लाख ४० हजार ३५० लाख क्विंटल, खटाव माण कारखान्याने ६ लाख ७१ हजार ०९६ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.