शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

जिल्ह्यात साखर उत्पादनाची कोटी क्विंटलकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST

वाठार स्टेशन : जिल्ह्यातील सोळापैकी पंधरा कारखान्यांचे गाळप वेगाने सुरू आहे. या हंगामात जरंडेश्वरने सर्वाधिक १२ लाख ४५ हजार ...

वाठार स्टेशन : जिल्ह्यातील सोळापैकी पंधरा कारखान्यांचे गाळप वेगाने सुरू आहे. या हंगामात जरंडेश्वरने सर्वाधिक १२ लाख ४५ हजार १७० मेट्रिक टन गाळप करीत १४ लाख ७ हजार ६०० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यापाठोपाठ कृष्णा कारखान्याने १२ लाख ५६ हजार २४० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात १९ मार्चअखेर जिल्ह्यात ८७ लाख ८७ हजार ९२३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ९७ लाख ८८ हजार ८६६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

मागील वर्ष सोडता सलग दोन वर्षांत शंभर लाख क्विंटल साखरेचे उत्पादन जिल्ह्यात झाले होते. या तुलनेत यंदाही साखर उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. या वर्षीही शंभर लाख क्विंटल साखरेचे उत्पादनाचा टप्पा सहज पार होणार आहे.

एका बाजूने साखर उत्पादन वाढत असताना दुसऱ्या बाजूने मात्र शेतकऱ्याला ऊस दर देण्याबाबतीत अनेक कारखाने उदासीन आहेत. एकरकमी एफआरपी दर देण्याची मानसिकता अनेक कारखानदारांची दिसत नाही. दोन ते तीन टप्प्यांत एफआरपी देण्यासाठी कारखान्यानी शेतकऱ्यांना बांधून घेतलं आहे.

जिल्ह्यात १९ मार्चअखेर श्रीराम जवाहर कारखान्याने ५ लाख ५ हजार ८०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. न्यू फलटण साखरवाडीने ५ लाख २२ हजार ४२० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. शरयू शुगरने ७ लाख २९ हजार ८०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. स्वराज इंडिया फलटणने ५ लाख ४४ हजार १५ लाख क्विंटल, जरंडेश्वर शुगरने १४ लाख ७ हजार ६०० लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

जयवंत शुगरने ६ लाख २८ हजार १५० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कृष्णाने १२ लाख ५६ हजार २४० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सह्याद्रीने १२ लाख ५० हजार ३६० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. रयत कारखान्याने ५ लाख ३८ हजार १७० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने २ लाख ४ हजार ३० मेट्रिक टन उसाचे गाळप करीत २ लाख ४४ हजार ६२५ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. अजिंक्यतारा कारखान्याने ६ लाख ४० हजार ६८० लाख मेट्रिक टन उत्पादित केली आहे.

किसन वीर साखर कारखान्याने ३ लाख ५६ हजार ४१० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे, तर नुकताच किसनवीर कारखान्याचा खंडाळा कारखान्याने २ लाख ७१ हजार १०० मेट्रिक टन गाळप करीत १ लाख ७० हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे, तर मागील वर्षीची एफआरपी न दिल्याने प्रतापगड कारखाना बंद आहे.

चौकट :

दुष्काळी तालुकेही अग्रेसर

माण खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगरने ५ लाख ४० हजार ३५० लाख क्विंटल, खटाव माण कारखान्याने ६ लाख ७१ हजार ०९६ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.