शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणात महिलांपेक्षा पुरुष पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून लसीकरण सुरू झाले आहे. या लसीकरणाला सर्वाधिक पुरुष प्राधान्य देत आहेत. मात्र, महिलांचे ...

सातारा : जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून लसीकरण सुरू झाले आहे. या लसीकरणाला सर्वाधिक पुरुष प्राधान्य देत आहेत. मात्र, महिलांचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. याची कारणे अनेक असली तरी काही महिलांना रांगेत उभे राहण्यास नको तर काही महिलांना घरकामातून वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेक महिला लसीकरण करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर लसीकरणाचे महत्त्व सर्वांनाच पटले. पहिल्या लाटेवेळी अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. मात्र, दुसऱ्या लाटेची भीषणता पाहूनच अनेकांनी लसीकरण केंद्रावर रांगा लावण्यास सुरुवात केली. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर राहिले ते पुरुष. पहाटे तीन वाजता पुरुष लसीकरण केंद्रावर रांग लावत होते. त्यामुळे पुरुषांनी लसीकरण करून घेतले. त्या तुलनेत महिला मागे राहिल्या. महिलांचाही लसीकरण करण्यावर भर आहे. मात्र, घरातील कामातून वेळ मिळत नसल्याने अनेक महिला आज लसीकरणाला जाऊ, उद्या जाऊ, असे करत आहेत. त्यातच अधूनमधून जिल्ह्यात लसीचा होणारा तुटवडा हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. सकाळी घरातून लवकर आवरून लसीकरण केंद्रावर रांग लावणे महिलांना शक्य होत नसते. घरातील कामे व स्वयंपाक हा महिलांना करावा लागतो. लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीचा नंबर स्वतः लसीकरण करण्यास गेलेला व्यक्तीच लावू शकतो. त्यामुळे महिलांचे प्रमाण लसीकरणामध्ये कमी आहे. त्यातच मे महिन्यामध्ये रखरखते ऊन होते. या उन्हाच्या तडाख्यात महिला घरातून बाहेर पडल्या नाहीत. अनेक महिलांच्या घरापासून लसीकरण केंद्र दूरवर आहेत. त्यामुळेही त्या केंद्रापर्यंत जाण्यासाठी अनेकांना वाहनाची सोय नव्हती. रिक्षाचे भाडेही भरमसाठ सांगत असल्यामुळे अनेक महिलांनी लसीकरण केंद्रावर जाणे टाळले. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बस सुरू होतील व त्यानंतर आपण लसीकरण केंद्रावर जाऊ, असेही अनेक महिलांनी ठरवले आहे.

त्याचबरोबर आरोग्य विभागाने पुरुष आणि स्त्री यांचे नेमके किती लसीकरण झाले आहे, याचे वर्गीकरण केले नाही. त्यामुळे या विभागाकडे नेमकी आकडेवारीही उपलब्ध नाही. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीतून महिलांपेक्षा लसीकरण करण्यात पुरुष पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोट : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हृदयात धडकी भरत आहे. अनेकांचा जीव गेला आहे. हे पाहून मन कासावीस होते. लसीकरण केल्यानंतर कमीत कमी मृत्यू तरी होत नाही, हे शासनाने सांगितले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वांनीच लसीकरण केले आहे.

योगिनी जाधव, सातारा

कोट: लसीकरणासाठी आम्ही बराच प्रयत्न केला मात्र वारंवार लस संपली आहे, असे सांगण्यात येत आहे. एकदा तर आम्ही सकाळी सहा वाजता लसीकरण केंद्रावर जाऊन रांग लावली होती. मात्र, दोन तास उभे राहिल्यानंतर आम्हाला लस संपली असल्याचे सांगण्यात आले. त्या दिवसापासून आम्ही लसीकरण केंद्राकडे फिरकलो नाही.

सत्वशीला माने, यादोगोपाळ पेठ, सातारा

कोट : सध्याच्या स्थितीला लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. लसीकरणामुळे आपल्या शरिरातील प्रतिकारशक्ती वाढत आहे. कोरोना काय इतर आजारही या लसीमुळे होणार नाहीत. त्यामुळे मी लस घेतली आहे.

संजना देशमुख, विसावा नाका, सातारा