शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

मातीतले मल्ल आता राजकीय आखाड्यात

By admin | Updated: February 17, 2017 22:55 IST

भुर्इंज गटात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला _- झेडपी दंगल

महेंद्र गायकवाड--पाचवड --भुर्इंज गटात प्रथमच प्रमुख चार पक्षांचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यावेळची भुर्इंज गटातील निवडणूक आमदार मकरंदआबा पाटील व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. आजपर्यंत या दोन्ही नेत्यांनी वाई तालुक्याबरोबरच जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे खोलवर नेऊन जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेची दमछाक करून सोडली होती. परंतु यावेळची राजकीय परिस्थिती बदलली असून, देशातील राजकीय बदलाचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही झाला आहे.दोन्ही नेत्यांचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या व दोघांचेही राजकीय होमपीच ठरलेल्या भुर्इंज गटात शिवसेना व भाजपाने याठिकाणी दमदार उमेदवारी देऊन प्रथमच मतविभागणीला पर्याय उभा केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचा विजयी उमेदवार ठरवणारी ही मतविभागणी कमळ की धनुष्यबाणाकडे जाणार याकडे भुर्इंज गटातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पाचवड व भुर्इंज या वाई तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. निवडणूक रणधुमाळीने सध्या या बाजारपेठांमध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रचार यंत्रणा कामाला लागली असून, बाजारपेठा वेगवेगळ्या पक्षांच्या पोस्टर्स व फ्लेक्सनी फुलल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी वापरलेल्या नावीन्यपूर्ण प्रचार गीतांमुळे त्या मतदारांचे लक्ष वेधत आहेत. ही निवडणूक कोणासाठी प्रतिष्ठेची तर कोणासाठी अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे.पैलवान एकमेकांसमोरकिसन वीर कारखान्याचे संचालक व जांबचे पैलवान मधुकर शिंदे यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचाराचा धुरळा उडवला असून, आपल्या उमेदवारांसाठी सर्व प्रकारचे डावपेच ते या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाड्यात खेळणार आहेत. त्यांच्यासोबत चिंधवली गावचे महान महाराष्ट्र केसरी पैलवान माणिक पवार यांनीही राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचारात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी भुर्इंजचे पैलवान प्रकाश पावशे यांनी प्रचाराची जबाबदारी घेतली असून, युवा प्रतिष्ठानचे सुधीर भोसले-पाटील यांच्या पत्नी रजनी भोसले-पाटील यांच्या प्रचार यंत्रणेत ते सहभागी आहेत. सर्व पक्षांचा बारकाईने अभ्यास करून नुकतेच कमळ हाती घेतलेले चिंधवलीचे पैलवान जयवंत पवार यांनी भाजपाच्या उमेदवारांसाठी गटातील स्वत:चे कार्यकर्ते कामाला लावले आहेत. मातीच्या कुस्तीत कधीही समोरासमोर न आलेले हे कसलेले मल्ल राजकीय आखाड्यात कुणाला कुठल्या डावावर चितपट करतायत याचीही उत्सुकता भुर्इंज गटात शिगेला पोहोचली आहे.