शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

दोन दिवसांनंतर बाजार समिती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:37 AM

CoronaVirus Satara: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन असल्याने दोन दिवस बंद असणारी सातारा बाजार समिती सोमवारी सुरू झाली. यामुळे तब्बल १ हजार ३३४ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यामध्ये बटाट्याची आवक तिप्पट वाढल्याचे दिसून आले. भाज्यांची आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण झाली, तर वाटाण्याचा भाव कायम टिकून असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देदोन दिवसांनंतर बाजार समिती सुरूमेथी, कोथिंबीरचा भाव वाढला...

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन असल्याने दोन दिवस बंद असणारी सातारा बाजार समिती सोमवारी सुरू झाली. यामुळे तब्बल १ हजार ३३४ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यामध्ये बटाट्याची आवक तिप्पट वाढल्याचे दिसून आले. भाज्यांची आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण झाली, तर वाटाण्याचा भाव कायम टिकून असल्याचे दिसून आले.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समिती वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवार आणि रविवारी बंद होती. सोमवारी सुरू झाल्यानंतर शेतमालाची मोठी आवक झाल्याचे दिसून आले.

सातारा बाजार समितीत सोमवारी ५६ वाहनांतून १ हजार ३३४ क्विंटल फळभाज्या आणि फळांची आवक झाली. बटाटा ४५९, लसूण २४ आणि आल्याची १३ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. आवक वाढल्याने काही भाज्यांच्या दरात किरकोळ घसरण झाली, तर काहींचे दर स्थिर राहिले.

सातारा बाजार समितीत गवारला दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारचा दर कमी झाल्याचे दिसून आले. तसेच शेवगा शेंगला ८० ते १०० पर्यंत दर आला. शेवगा शेंगेच्या दरात उतार दिसून आला. तर वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला. टमाटा ६० ते ८०, कोबीला ३० ते ५० रुपये भाव आला. टमाटा व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. त्यातच वांग्याचाही दर कमी झाला आहे, तर फ्लॉवरला १० किलोला २०० ते २५० रुपये अन् दोडक्याला २५० ते ३०० रुपये भाव आला. फ्लॉवरच्या दरात थोडी वाढ झाली आहे.

बटाट्याची दररोज सरासरी १०० ते २०० क्विंटल आवक होते. पण, सोमवारी ४५९ क्विंटल बटाटा आला होता. बटाट्याला क्विंटलला ८०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला क्विंटलला अडीच हजारांपासून तीन हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आले दरात उतार आहे. तर लसणाला क्विंटलला २ ते ६ हजारांपर्यंत भाव आला. लसणाचा दरही टिकून असल्याचे दिसून आले. वाटाण्याला ६ ते ७ हजारापर्यंत क्विंटलला दर मिळाला. वाटाण्याच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. बाजारात अजूनही भाज्यांचे दर कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

मेथी, कोथिंबीरचा भाव वाढला...

सातारा बाजार समितीत सोमवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. तसेच दरात सुधारणा आहे. मेथीच्या १५०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा १ हजार ते १२०० रुपये दर मिळाला, तर कोथिंबीरची १८०० पेंडी आली. याला शेकडा दर ७०० ते १ हजार रुपयांदरम्यान मिळाला, तर पालकला शेकडा ४०० ते ५०० रुपये दर आला.

 

टॅग्स :MarketबाजारSatara areaसातारा परिसर