शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

मराठी माणसाने व्यापार उद्योगात प्रवेश करावा - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:56 IST

साताऱ्यात जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन

सातारा : जागतिक मराठी संमेलनाचा उद्देश केवळ साहित्यिकांचा मेळा नाही. साहित्याने मनाचे आणि बुद्धीचे पोषण होते. परंतु, पोटाचा प्रश्न सुटेल असे नाही. मराठी माणसाने व्यापारी उद्योग, कला-कौशल्य क्षेत्रात प्रवेश केला पाहिजे. जागतिक संमेलनाच्या व्यासपीठावर त्या माहितीचे व ज्ञानाचे आदान प्रदान केले पाहिजे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्था सातारा आयोजित जागतिक मराठी अकादमी संमेलनात ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ लेखक डॉ. आ. ह. साळुंखे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष कवी रामदास फुटाणे, खा. रामशेठ ठाकूर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, यशवंतराव गडाख, माजी मंत्री उल्हासदादा पवार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर, कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरु ज्ञानदेव म्हस्के, अभिनेते सयाजी शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, रयतचे व्हा. चेअरमन, भगिरथ शिंदे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.शरद पवार म्हणाले, सातारा ही पराक्रमांची, सुधारकांची, स्वातंत्र्यसैनिकांची अन् साहित्यिकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. याच भूमीत जागतिक मराठी संमेलन होत आहे, याचा मला अभिमान वाटतो. आता शिवछत्रपतींची दृष्टी घेऊन स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील. नव्या पिढीमध्ये व्यापारी आणि उद्यम वृत्ती वाढीस लागली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० एकरावर कृषीवर आधारित उद्योग उभे करण्याची संकल्पना हाती घेतली होती. ती मार्गी लागावी.आ. ह. साळुंखे म्हणाले, आमच्या पिढीतली मुलं-मुली गोरगरीब आई-वडिलांच्या पोटी जन्माला येऊन धडपड करून शिकलो. आता मात्र मुलांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं अवघड झालं आहे. त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल, याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. शंभर टक्के लोकांना स्वतःची शंभर टक्के गुणवत्ता फुलवण्याची संधी मिळू शकते, तोच समाज आदर्श समाज म्हणता येईल. आदिवासी, ग्रामीण, भटके विमुक्त आदी समाजातील मुलांना घरातील भाषा आणि शाळेत प्रमाण भाषा वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सगळ्या बोलींमधून काही महत्त्वाचे निवडक शब्द प्रमाण मराठीत स्वीकारून मान्यता दिली तर प्रमाण मराठीची शुद्धता कमी होणार नाही तर अधिक समृद्ध होईल.आशिष शेलार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच अधिवेशनात महाराष्ट्र जोडण्याची घोषणा केली होती. सर्व पक्षांच्या नेत्यांशी, वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांशी प्रामाणिकपणे संवाद व समन्वय ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, एकजण रोज सकाळी ९ वाजता शब्ददारिद्र्य घेऊन सर्वांसमोर येतोय. त्याला आवरायला हवे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

पवार यांचा शाळेतही अन् राजकारणातही आदर्शमी शिकलो त्या मराठा मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार होते. माझ्या राजकीय कारकिर्दीचे कुलगुरूदेखील शरद पवारच होते, असे उदय सामंत यांनी म्हटले. मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री शरद पवार यांनीच बनवले होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर मराठी भाषा विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ते शाळेत व राजकारणात आदर्श आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवार