शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेत राजकारणाचा शिरकाव - उदयनराजे भोसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:15 IST

सातारा : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी मराठा आरक्षणासह अनेक प्रश्न ...

सातारा : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी मराठा आरक्षणासह अनेक प्रश्न झुलवत ठेवले. आज मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यातही राजकारणाचा शिरकाव झाला आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. साताऱ्यात गुरुवारी पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे शरद पवार यांच्या हातात होते. मग त्यांनी ते का नाही केले. २३ मार्च १९९४ च्या अधिसूचनेवर कोणीच का भाष्य करत नाही. मनोज जरांगे-पाटील यांना मी सांगितले होते, आरक्षणाच्या प्रश्नावर आपण विचारमंथन करू. परंतु पुढे काही झाले नाही. त्यांच्या या लढ्यात आता राजकारणाचा शिरकाव झाला आहे. तुम्ही राजकारणच करणार असाल तर ठीक आहे. आम्ही चारसौ पारचा नारा दिला तर विरोधकांनी संविधान बदलण्याबाबत अपप्रचार सुरू केला. वास्तविक संविधानापलिकडे जाऊन कोणाला काहीही करता येत नाही.

कामे केली असती तर ही वेळ आली नसतीपश्चिम महाराष्ट्र हा आमचा बालेकिल्ला आहे, असे शरद पवार सांगत होते. मग पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजना का मार्गी लावल्या नाहीत. त्यांनी कामेच केली नाहीत म्हणूनच त्यांचे पश्चिम महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. कामे केली असती तर ही वेळ आली नसती, अशी मिश्कील टिपण्णीही उदयनराजे यांनी केली.

यशवंत विचारांचा विसर..काँग्रेसला यशवंत विचारांचा विसर पडला असून, जातीय तेढ निर्माण करण्याचे पाप त्यांनी केले आहे. या पक्षाने सत्ता विकेंद्रीकरणाला मूठमाती देऊन घराणेशाही सुरू ठेवली आहे. स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेल्या कामावर खापर फोडायचे हे बरोबर नाही, असेही यावेळी उदयनराजे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण