शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेत राजकारणाचा शिरकाव - उदयनराजे भोसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:15 IST

सातारा : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी मराठा आरक्षणासह अनेक प्रश्न ...

सातारा : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी मराठा आरक्षणासह अनेक प्रश्न झुलवत ठेवले. आज मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यातही राजकारणाचा शिरकाव झाला आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. साताऱ्यात गुरुवारी पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे शरद पवार यांच्या हातात होते. मग त्यांनी ते का नाही केले. २३ मार्च १९९४ च्या अधिसूचनेवर कोणीच का भाष्य करत नाही. मनोज जरांगे-पाटील यांना मी सांगितले होते, आरक्षणाच्या प्रश्नावर आपण विचारमंथन करू. परंतु पुढे काही झाले नाही. त्यांच्या या लढ्यात आता राजकारणाचा शिरकाव झाला आहे. तुम्ही राजकारणच करणार असाल तर ठीक आहे. आम्ही चारसौ पारचा नारा दिला तर विरोधकांनी संविधान बदलण्याबाबत अपप्रचार सुरू केला. वास्तविक संविधानापलिकडे जाऊन कोणाला काहीही करता येत नाही.

कामे केली असती तर ही वेळ आली नसतीपश्चिम महाराष्ट्र हा आमचा बालेकिल्ला आहे, असे शरद पवार सांगत होते. मग पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजना का मार्गी लावल्या नाहीत. त्यांनी कामेच केली नाहीत म्हणूनच त्यांचे पश्चिम महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. कामे केली असती तर ही वेळ आली नसती, अशी मिश्कील टिपण्णीही उदयनराजे यांनी केली.

यशवंत विचारांचा विसर..काँग्रेसला यशवंत विचारांचा विसर पडला असून, जातीय तेढ निर्माण करण्याचे पाप त्यांनी केले आहे. या पक्षाने सत्ता विकेंद्रीकरणाला मूठमाती देऊन घराणेशाही सुरू ठेवली आहे. स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेल्या कामावर खापर फोडायचे हे बरोबर नाही, असेही यावेळी उदयनराजे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण