शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेत राजकारणाचा शिरकाव - उदयनराजे भोसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:15 IST

सातारा : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी मराठा आरक्षणासह अनेक प्रश्न ...

सातारा : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी मराठा आरक्षणासह अनेक प्रश्न झुलवत ठेवले. आज मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यातही राजकारणाचा शिरकाव झाला आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. साताऱ्यात गुरुवारी पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे शरद पवार यांच्या हातात होते. मग त्यांनी ते का नाही केले. २३ मार्च १९९४ च्या अधिसूचनेवर कोणीच का भाष्य करत नाही. मनोज जरांगे-पाटील यांना मी सांगितले होते, आरक्षणाच्या प्रश्नावर आपण विचारमंथन करू. परंतु पुढे काही झाले नाही. त्यांच्या या लढ्यात आता राजकारणाचा शिरकाव झाला आहे. तुम्ही राजकारणच करणार असाल तर ठीक आहे. आम्ही चारसौ पारचा नारा दिला तर विरोधकांनी संविधान बदलण्याबाबत अपप्रचार सुरू केला. वास्तविक संविधानापलिकडे जाऊन कोणाला काहीही करता येत नाही.

कामे केली असती तर ही वेळ आली नसतीपश्चिम महाराष्ट्र हा आमचा बालेकिल्ला आहे, असे शरद पवार सांगत होते. मग पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजना का मार्गी लावल्या नाहीत. त्यांनी कामेच केली नाहीत म्हणूनच त्यांचे पश्चिम महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. कामे केली असती तर ही वेळ आली नसती, अशी मिश्कील टिपण्णीही उदयनराजे यांनी केली.

यशवंत विचारांचा विसर..काँग्रेसला यशवंत विचारांचा विसर पडला असून, जातीय तेढ निर्माण करण्याचे पाप त्यांनी केले आहे. या पक्षाने सत्ता विकेंद्रीकरणाला मूठमाती देऊन घराणेशाही सुरू ठेवली आहे. स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेल्या कामावर खापर फोडायचे हे बरोबर नाही, असेही यावेळी उदयनराजे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण