शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालकांची कसरत, हजारो विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 3:39 PM

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या मायणी गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन्ही बाजूंच्या पुलाची अतिशय बिकट अवस्था झाली असून, पश्चिमेकडील पुलाच्या मध्यभागी व कडेला दोन मोठी भगदाडे पडले आहे.

मायणी- मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या मायणी गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन्ही बाजूंच्या पुलाची अतिशय बिकट अवस्था झाली असून, पश्चिमेकडील पुलाच्या मध्यभागी व कडेला दोन मोठी भगदाडे पडले आहे. याच पुलावरून रोज हजारो विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा प्रवास जीव मुठीत धरून करीत आहेत. तर वाहन चालकांनाही वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

मायणी गाव व चांदणी चौकाला जोडणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. तर त्याच्याच शेजारी उजव्या बाजूस गवतामध्ये (रक्षक दगडाजवळ) दुसरे एक भगदाड पडले आहे. तसेच पुलावर असंख्य लहान-मोठे खड्डेही पडलेले आहेत. या पुलाची उंची व रुंदी कमी आहे, तसेच संरक्षण जाळी नाही व पादचारी मार्गही नाही. या पुलाच्या दोन्ही बाजूस प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येणारे हजारो विद्यार्थी याच पुलाचा वापर करीत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

गावातून मुख्य चौक व विटा, सांगली, वडूज, सातारा, कऱ्हाड व पुणे मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी वाहनचालकांना याच पुलाचा आधार घ्यावा लागतो. याच पुलावर असंख्य खड्डे त्यातही पडलेली मोठी भगदाडे अरुंद व कमी उंचीचा पूल, रक्षक दगडावरती वाढलेली झुडपे व शिक्षणासाठी चालत असलेले हजारो विद्यार्थी व ग्रामस्थ त्यातून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी याच मार्गावरील म्हणजे गावाच्या पूर्व बाजूच्या पुलाचा संरक्षण कट्टा पडला आहे. त्याकडे संबंधित बांधकाम विभागाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मायणी पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी लाल रिबीन लावून सामाजिक बांधिलकीचे दर्शन संपूर्ण मायणीकरांना घडविले होते. तरी बांधकाम विभाग झोपलेलाच असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.