शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

घडतंय-बिघडतंय: ‘घोडं’ अडलंय; पण कोण बसणार !; सातारच्या पालकमंत्रिपदाची चौघांनाही आस

By प्रमोद सुकरे | Updated: December 27, 2024 13:05 IST

प्रमोद सुकरे कऱ्हाड : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदे ...

प्रमोद सुकरेकऱ्हाड : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे सगळीकडे उत्साह दिसतोय; पण पालकमंत्री कोण? याचं ‘घोडं’ अजूनही अडलंय. खरंतर ही माळ आपल्याच गळ्यात पडावी, अशी चौघांचीही इच्छा आहे; पण बोलून कोणच दाखवत नाही. सगळेच वरिष्ठांकडे बोट करत आहेत. पण पालकमंत्री पदाच्या घोड्यावर नक्की कोण बसणार? याबाबत जिल्हावासीयांमध्ये उत्सुकता लागून आहे.खरंतर राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला खूप मोठे यश मिळाले. तरी देखील मुख्यमंत्रिपदाचे गुऱ्हाळ अनेक दिवस सुरू राहिले. तेव्हा कोठे १३ दिवसांनी सत्तास्थापनेचे बारशे झाले. त्यानंतर विना मंत्रिमंडळाचेच नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडले. तेव्हा शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता मंत्री वाजत गाजत आपापल्या मतदारसंघात फिरत आहेत; पण आता पालकमंत्री कोण याच्यात अनेकांचा जीव अडकलेला दिसतोय.

सातारा जिल्ह्यात यावेळी महायुतीने आठही मतदारसंघांत बाजी मारली आहे. वरिष्ठांनीही ८ पैकी ४ आमदारांना कॅबिनेट मंत्री करून नवा इतिहास रचला आहे. आता मंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्याने चौघांच्याही मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी साताराच्या पालकमंत्रिपदाची माळही आपल्याच गळ्यात पडावी, अशी आशा त्यांना लागून राहिली आहे.

सातारा हा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळावी, असे प्रत्येक नेत्याला वाटते. साहजिकच मंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मकरंद पाटील या चौघांनाही तसे वाटले तर नवल नाही; पण आता संधी एकालाच मिळणार असल्याने धाकधूक वाढली आहे एवढेच !

उदयनराजेंनी केलीय गोची !भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारचे पालकमंत्रिपद शिवेंद्रराजे भोसले यांनाच मिळावे, अशी थेट मागणी केल्याने इतर तिघांची चांगलीच गोची झाली आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी त्यांची परिस्थिती मानली जात आहे.

भाजपचाच पालकमंत्री !जिल्ह्यात आठ पैकी चार आमदार हे भाजपचे निवडून आले आहेत. यापैकी शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे हे दोघे कॅबिनेटमंत्री आहेत. संख्याबळाचा विचार करता पालकमंत्रिपद भाजपकडेच राहणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण आता दोघांपैकी नक्की संधी कोणाला मिळणार? याची चर्चा तर होणारच !

मकरंद पाटील घोड्यावर !मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांचे तर त्यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात घोड्यावर बसून स्वागत केले आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पालकमंत्रीपदासाठी दावा करणार. त्यामुळे यातून तिन्ही पक्ष कसा मार्ग काढणार, हे पाहावे लागणार आहे.

अनुभवाचा विचार होणार का?सातारा जिल्ह्यातील सध्याच्या चार कॅबिनेट मंत्र्यांपैकी तीन मंत्री नवखे आहेत. फक्त शंभूराज देसाई यांनी यापूर्वी मंत्रिपद आणि सातारचे पालकमंत्रिपदही भूषवले आहे. त्यामुळे सातारचा पालकमंत्री निवडताना अनुभवाचा विचार होणार का? याचीही चर्चा होत आहे.

अडीच वर्षांचा फॉर्म्यूला होणार?पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळावे, यासाठीही सुप्त रस्सीखेच सुरू आहे. भाजपमधील दोन्ही मंत्र्यांना आणि त्याचबरोबर महायुतीतील इतर दोन मंत्र्यांनाही पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, असे वाटत आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवला जाणार का? याकडेही साऱ्यांच्या नजरा आहेत बरं.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणMahayutiमहायुतीguardian ministerपालक मंत्रीShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेMakarand Patilमकरंद पाटीलShambhuraj Desaiशंभूराज देसाईJaykumar Goreजयकुमार गोरे