शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडप्यांसाठी सुरक्षित निवारा; राज्यातील पहिले 'सेफ हाऊस' साताऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 11:36 IST

सातारा : जातीधर्माच्या नावावर स्वत:च्या कुटुंबातील मुला-मुलींचा जोडीदार निवडण्याच्या हक्क डावलला जाण्याच्या घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडत असतात. या ...

सातारा : जातीधर्माच्या नावावर स्वत:च्या कुटुंबातील मुला-मुलींचा जोडीदार निवडण्याच्या हक्क डावलला जाण्याच्या घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडत असतात. या पार्श्वभूमीवर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या कालखंडात सुरक्षित निवारा देणारे महाराष्ट्रातील पहिले सेफ हाऊस सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसमार्फत डॉ. हमीद दाभोलकर आणि शंकर कणसे यांनी दिली आहे.पत्रकात नमूद केले आहे की, गेली अनेक वर्षे महाराष्ट्र अंनिस आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देण्याचे काम करत आहे. यामध्ये घरच्या लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे अनेक जोडप्यांना सुरुवातीच्या कालखंडात त्यांच्या गावी लगेच जाता येत नाही, तसेच कुटुंबीय आणि समाजाकडून मारहाणीचा, तसेच जिवाचादेखील धोका उद्भवू शकतो, अशा परिस्थितीत त्या जोडप्याला सुरक्षित निवारा देणाऱ्या केंद्राची गरज म्हणून याची उभारणी करण्यात आली आहे. पंजाब, हरयाणासारख्या राज्यांमध्ये राज्य शासनाच्या मदतीने अशी सेफ हाऊस चालवली जातात. याच स्वरूपाचे पहिले सेफ हाऊस सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे.

शासन निर्णयामुळे मिळाले बळ!सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी, या समितीमार्फत त्यांच्याकडे मदत मागणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात अशा जोडप्यांना सुरक्षा निवारा केंद्र उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या शासन निर्णयामुळे महाअंनिससारख्या सुरक्षा निवारा केंद्र चालवणाऱ्या संस्थेला मोठे बळ मिळणार आहे.

जोडप्यांच्या आधारासाठी अंनिस खंबीरजात ही एक कुठलाही आधार नसलेली अंधश्रद्धा आहे, या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भूमिकेला अनुसरून हे केंद्र सुरू केले आहे. आंतरजातीय विवाहांच्या माध्यमातून जाती निर्मूलनाचे प्रयत्न करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचेदेखील यामध्ये नमूद केले आहे. महाराष्ट्र अंनिसमार्फत आज अखेर लावण्यात आलेल्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नामधील जोडप्यांमधील काही लोक या कामी महाअंनिसची मदत करणार आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न केलेल्या जोडप्यांना येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी त्यांना मदत मिळावी म्हणून अंनिसमार्फत एक आधार गटदेखील चालू करण्यात आला आहे.

असे सुरू होणार कामआंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न सहायता केंद्र चालवताना अंनिसमार्फत त्या मुला-मुलींची सविस्तर मुलाखत घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जातो आणि त्यानंतर पोलिसांची मदत घेऊन त्यांचे लग्न लावण्यास मदत करणे आणि गरज पडल्यास त्यांना सुरक्षित निवारा पुरवणे, हे काम केले जाते. हे सुरक्षा निवारा केंद्र पूर्ण मोफत चालवले जाते आणि आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्राची मदत हवी असल्यास त्यासाठी महाराष्ट्र अंनिसमार्फत ९९२२३५५४३५ ही मोफत हेल्पलाइनदेखील चालवली जाते, असेदेखील या पत्रकात नमूद केले आहे.

महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते शंकर कणसे यांच्या जागेत त्यांनी स्वखर्चातून हा सुरक्षा निवारा बांधला आहे आणि महाराष्ट्र अंनिस आणि स्नेह आधार संस्थेमार्फत हा उपक्रम चालवला जाणार आहे. या निवारा केंद्रामुळे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित निवारा देण्याची व्यवस्था होणार आहे. - डॉ. हमीद दाभोलकर, अंनिस, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न