शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडप्यांसाठी सुरक्षित निवारा; राज्यातील पहिले 'सेफ हाऊस' साताऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 11:36 IST

सातारा : जातीधर्माच्या नावावर स्वत:च्या कुटुंबातील मुला-मुलींचा जोडीदार निवडण्याच्या हक्क डावलला जाण्याच्या घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडत असतात. या ...

सातारा : जातीधर्माच्या नावावर स्वत:च्या कुटुंबातील मुला-मुलींचा जोडीदार निवडण्याच्या हक्क डावलला जाण्याच्या घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडत असतात. या पार्श्वभूमीवर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या कालखंडात सुरक्षित निवारा देणारे महाराष्ट्रातील पहिले सेफ हाऊस सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसमार्फत डॉ. हमीद दाभोलकर आणि शंकर कणसे यांनी दिली आहे.पत्रकात नमूद केले आहे की, गेली अनेक वर्षे महाराष्ट्र अंनिस आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देण्याचे काम करत आहे. यामध्ये घरच्या लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे अनेक जोडप्यांना सुरुवातीच्या कालखंडात त्यांच्या गावी लगेच जाता येत नाही, तसेच कुटुंबीय आणि समाजाकडून मारहाणीचा, तसेच जिवाचादेखील धोका उद्भवू शकतो, अशा परिस्थितीत त्या जोडप्याला सुरक्षित निवारा देणाऱ्या केंद्राची गरज म्हणून याची उभारणी करण्यात आली आहे. पंजाब, हरयाणासारख्या राज्यांमध्ये राज्य शासनाच्या मदतीने अशी सेफ हाऊस चालवली जातात. याच स्वरूपाचे पहिले सेफ हाऊस सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे.

शासन निर्णयामुळे मिळाले बळ!सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी, या समितीमार्फत त्यांच्याकडे मदत मागणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात अशा जोडप्यांना सुरक्षा निवारा केंद्र उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या शासन निर्णयामुळे महाअंनिससारख्या सुरक्षा निवारा केंद्र चालवणाऱ्या संस्थेला मोठे बळ मिळणार आहे.

जोडप्यांच्या आधारासाठी अंनिस खंबीरजात ही एक कुठलाही आधार नसलेली अंधश्रद्धा आहे, या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भूमिकेला अनुसरून हे केंद्र सुरू केले आहे. आंतरजातीय विवाहांच्या माध्यमातून जाती निर्मूलनाचे प्रयत्न करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचेदेखील यामध्ये नमूद केले आहे. महाराष्ट्र अंनिसमार्फत आज अखेर लावण्यात आलेल्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नामधील जोडप्यांमधील काही लोक या कामी महाअंनिसची मदत करणार आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न केलेल्या जोडप्यांना येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी त्यांना मदत मिळावी म्हणून अंनिसमार्फत एक आधार गटदेखील चालू करण्यात आला आहे.

असे सुरू होणार कामआंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न सहायता केंद्र चालवताना अंनिसमार्फत त्या मुला-मुलींची सविस्तर मुलाखत घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जातो आणि त्यानंतर पोलिसांची मदत घेऊन त्यांचे लग्न लावण्यास मदत करणे आणि गरज पडल्यास त्यांना सुरक्षित निवारा पुरवणे, हे काम केले जाते. हे सुरक्षा निवारा केंद्र पूर्ण मोफत चालवले जाते आणि आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्राची मदत हवी असल्यास त्यासाठी महाराष्ट्र अंनिसमार्फत ९९२२३५५४३५ ही मोफत हेल्पलाइनदेखील चालवली जाते, असेदेखील या पत्रकात नमूद केले आहे.

महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते शंकर कणसे यांच्या जागेत त्यांनी स्वखर्चातून हा सुरक्षा निवारा बांधला आहे आणि महाराष्ट्र अंनिस आणि स्नेह आधार संस्थेमार्फत हा उपक्रम चालवला जाणार आहे. या निवारा केंद्रामुळे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित निवारा देण्याची व्यवस्था होणार आहे. - डॉ. हमीद दाभोलकर, अंनिस, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न