शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

झटपट श्रीमंती, हायटेक जगण्याच्या लालसेने तरुणाई वळू लागली गुन्हेगारीकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 14:10 IST

हसणे, खेळणे मौज मस्ती करणे व शिक्षणाच्या वयातच अल्पवयीन मुलांच्या हाती चाकू सुरा पिस्तूल अशी शस्त्रे येऊ लागली आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा व घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यात हे तरुण अडकत आहेत.

दत्ता यादवसातारा : हायटेक जगण्याच्या लालसेने तरुणाई गुन्हेगारीकडे वळत आहे. विशेष म्हणजे झटपट श्रीमंती कमी श्रमात अधिक पैसा व मौजमस्ती यामुळेच तरुण चोरीच्या गुण्याकडे वळल्याचे दिसून येत आहे. हसणे, खेळणे मौज मस्ती करणे व शिक्षणाच्या वयातच अल्पवयीन मुलांच्या हाती चाकू सुरा पिस्तूल अशी शस्त्रे येऊ लागली आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा व घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यात हे तरुण अडकत आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देखील सर्वाधिक बंदी हे २० ते ३५ या वयोगटातील आहेत.

चोरी, घरफोडी, लूटमार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यात तरुणांचा सहभाग आहे. एका गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर केल्यावर लगेच काही दिवसात  तो दुसरा गुन्हा करतो. त्यामुळे तो परत कारागृहात पोहोचतो. तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण असल्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याऐवजी  त्यांच्याकडून गुन्हेगारीचे धडे मिळू लागतात. असा यापूर्वीचा पोलिसांच्या तपासातील अनुभव आहे. काही अल्पवयीन मुलेही चोरी करीत आहेत. गरिबीमुळे त्यांची मोबाईल खरेदी करण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे ही मुळे मोबाईल चोरीतून हौस आणि पैसाही मिळविण्याचा प्रयत्न करतात. अशी मुले अल्पयीन असल्याने कायद्याच्या चौकटीत सापडत नाहीत.

हे असे का घडतेय..

आत्ताची मुलं वेबसिरीज व चित्रपटांचे अनुकरण करायला लागले आहेत. चांगल्या पेक्षा वाईट गोष्टीत आहारी गेलेली आहेत. मुलांची संगत आवडीनिवडी यावर त्यांचे वागणं ठरू लागले आहे. गुन्हेगारीकडे वळणारा तरुण उद्याच्या भविष्याचा तसेच कुटुंबाचा विचार करत नाही. याच वयात त्यांना योग्य मार्गदर्शन समुपदेशनची गरज आहे. 

चोरीच्या घटनात तरुण अधिक

मोबाईल दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक तरुण असल्याचे तपासात उघड झाले आहे. कमी श्रमात अधिक पैसा व मौजमस्ती हेच त्यामागील कारण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या मुलांनी वेगळ्या नावाने आपल्या टोळ्या तयार केल्या आहेत. त्या टोळ्या सध्या पोलीस अधीक्षक विजयकुमार बन्सल  हे हद्दपार करत आहेत. मात्र तरीसुद्धा अद्याप अशा काही टोळ्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावर पोलिसांचा वॉच असून त्यांनाही हद्दपार केले जाणार आहे.

पालकांनी काळजी घ्यावी

आपली मुले काय करताहेत याकडे खरेतर पालकांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. मुलाची एखादी चुकीची गोष्ट कानावर आली तर पालकांचे ऐकून घेण्याची मानसिकता मुलांमध्ये राहिलेली नाही. पालकांनी मुलांशी संवाद वाढवायला हवा. मैत्रीचे नाते निर्माण करायला हवे. त्याशिवाय त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण. त्यांची पार्श्वभूमी काय, याची माहिती पालकांनी घ्यावी.

ज्यांच्या हाती उद्याचे भविष्य आहे. अशी तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळल्याचे दिसून येत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये पोलीस दलाच्या वतीने कार्यशाळा घेऊन वेळोवेळी जनजागृती करण्यात येते. यात पालकांची मोठी जबाबदारी आहे. आपला पाल्य काय करतो याकडे अधिक लक्ष देऊन पालकांनी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद वाढला पाहिजे. - किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा

 

गेल्या वर्षभरातील चोरीच्या घटनाजानेवारी ०८फेब्रुवारी  ११मार्च ०२एप्रिल ०४मे  ०६जून  ०८जुलै  ११ऑगस्ट  २३सप्टेंबर  ३२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी