शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Lok Sabha Election 2019 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागात प्रशासनाची हायटेक तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:01 IST

जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या

सातारा : जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, हे ओळखून निवडणूक विभागाने दुर्गम भागात हायटेक तयारी केली आहे.

सातारा लोकसभा मतदार संघाचा पश्चिम भाग अत्यंत दुर्गम आहे. जंगलव्याप्त असणाºया या परिसरात मोबाईलला रेंज मिळत नाही. सुगम भागाशी संपर्कही साधणे कठीण असते. लोकसभा निवडणुकीचे मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, प्रशासनात सुसूत्रता कायम राहावी, या उद्देशाने प्रशासनाने पावले उचलली आहेत.

जावळी तालुक्यातील देवळीमुरा, उत्तरेश्वर या गावांमध्ये बीएसएनलच्या माध्यमातून मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. या भागात ड्यूटी लागलेल्या कर्मचाºयांना बीएसएनएलचे सीम कार्ड घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ५५ गावांमध्ये वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील १८, महाबळेश्वर तालुक्यातील २७ व जावळी तालुक्यातील १० गावांमध्ये वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार यांच्यासाठी वॉकी टॉकी देण्यात येणार आहे. 

ही सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार असली तरीसुद्धा अधिकची दक्षता म्हणून वाहनधारी रनर्सची नेमणूकही करण्यात येणार आहे. ऐनवेळी सर्व यंत्रणा कोलमडली तरी दुचाकीवरून सर्व निरोप जवळचे पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालयाला पोहोचवता येणार आहेत. मोबाईल टॉवरचे टेस्टिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर खºया अर्थाने ही सर्व यंत्रणा किती उपयोगाची आहे, याबाबत अंदाज बांधणे सोपे जाणार आहे. दोन टॉवरची उभारणी; संपर्कात अडचणी येऊ नये म्हणून सतर्कता 

 

मतदानादिवशी दुर्गम भागात अडचणी टाळण्यासाठी निवडणूक विभागाने ही सतर्कता बाळगली आहे. दुर्गम भागात कार्यरत असणाºया निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांना वॉकी टॉकीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.-रेखा सोळंकी,  नोडल आॅफीसर निवडणूक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसातारा