शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

स्वच्छता करू, कास जपू या.. , विद्यार्थ्यांकडून संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 17:25 IST

कास पठार व तलावाची स्वच्छता करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. याच भावनेतून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकसह तब्बल एक टन कचरा गोळा करून स्वच्छता करू या.. कास जपू या असा संदेश दिला.

ठळक मुद्देचार तास श्रमदानातून एक टन कचऱ्याची विल्हेवाटतलाव परिसरात विघ्नसंतोषींकडून प्लास्टिकच्या, काचेच्या बाटल्या स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत कासचे वैभव फुलविण्याचा चिमुकल्यांचा निर्धार

सातारा : जागतिक वारसा प्राप्त झालेल्या कास पठार व तलावाची स्वच्छता करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. याच भावनेतून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. सलग चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकसह तब्बल एक टन कचरा गोळा करून स्वच्छता करू या.. कास जपू या असा संदेश दिला.

जागतिक वारसा स्थळात समावेश झालेल्या कास पठार व तलावाला वर्षभरात लाखो पर्यटक भेटी देतात. पर्यटक येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या ठिकाणी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, काचेच्या बाटल्या अशा प्रकारच्या वस्तू तलाव परिसरात फेकल्या जात असल्याने सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. परिणामी येथील निसर्ग सौंदर्याला बाध पोहोचत आहे.

कास तलावातून संपूर्ण सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, कास परिसर स्वच्छ राहावा व नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबात जागृती व्हावी, या उद्देशाने गौरीशंकरच्या सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.

चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांना प्लास्टिक कागद, बाटल्या, पत्रावळ्या, काचेच्या वस्तू, कागद, गुटखा व सिगारेटची मोकळी पाकिटे असा तब्बल एक टन कचरा गोळा करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाटही लावली. चिमुकल्यांनी स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत कासचे वैभव फुलविण्याचा निर्धार यावेळी केला़

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजना गोसावी, मीनाक्षी सापते, उज्ज्वला सावंत, प्रिती पवार, राहुल भंडारे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे गौरीशंकर संस्थेचे अध्यक्ष प्रा़ मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी कौतुक केले़पर्यटकांनी कासच्या नैसर्गिक सौंदर्याचामनमुराद आनंद जरूर लुटावा़ परंतु हा आनंद उपभोगताना निसर्गाचे जतन करण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळली तर कासचे सौंदर्य अधिक खुलेल.- श्रीरंग काटेकर,जनसंपर्क अधिकारी, गौरीशंकर

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानDamधरण