शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

स्वच्छता करू, कास जपू या.. , विद्यार्थ्यांकडून संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 17:25 IST

कास पठार व तलावाची स्वच्छता करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. याच भावनेतून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकसह तब्बल एक टन कचरा गोळा करून स्वच्छता करू या.. कास जपू या असा संदेश दिला.

ठळक मुद्देचार तास श्रमदानातून एक टन कचऱ्याची विल्हेवाटतलाव परिसरात विघ्नसंतोषींकडून प्लास्टिकच्या, काचेच्या बाटल्या स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत कासचे वैभव फुलविण्याचा चिमुकल्यांचा निर्धार

सातारा : जागतिक वारसा प्राप्त झालेल्या कास पठार व तलावाची स्वच्छता करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. याच भावनेतून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. सलग चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकसह तब्बल एक टन कचरा गोळा करून स्वच्छता करू या.. कास जपू या असा संदेश दिला.

जागतिक वारसा स्थळात समावेश झालेल्या कास पठार व तलावाला वर्षभरात लाखो पर्यटक भेटी देतात. पर्यटक येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या ठिकाणी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, काचेच्या बाटल्या अशा प्रकारच्या वस्तू तलाव परिसरात फेकल्या जात असल्याने सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. परिणामी येथील निसर्ग सौंदर्याला बाध पोहोचत आहे.

कास तलावातून संपूर्ण सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, कास परिसर स्वच्छ राहावा व नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबात जागृती व्हावी, या उद्देशाने गौरीशंकरच्या सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.

चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांना प्लास्टिक कागद, बाटल्या, पत्रावळ्या, काचेच्या वस्तू, कागद, गुटखा व सिगारेटची मोकळी पाकिटे असा तब्बल एक टन कचरा गोळा करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाटही लावली. चिमुकल्यांनी स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत कासचे वैभव फुलविण्याचा निर्धार यावेळी केला़

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजना गोसावी, मीनाक्षी सापते, उज्ज्वला सावंत, प्रिती पवार, राहुल भंडारे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे गौरीशंकर संस्थेचे अध्यक्ष प्रा़ मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी कौतुक केले़पर्यटकांनी कासच्या नैसर्गिक सौंदर्याचामनमुराद आनंद जरूर लुटावा़ परंतु हा आनंद उपभोगताना निसर्गाचे जतन करण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळली तर कासचे सौंदर्य अधिक खुलेल.- श्रीरंग काटेकर,जनसंपर्क अधिकारी, गौरीशंकर

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानDamधरण