शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

स्वच्छता करू, कास जपू या.. , विद्यार्थ्यांकडून संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 17:25 IST

कास पठार व तलावाची स्वच्छता करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. याच भावनेतून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकसह तब्बल एक टन कचरा गोळा करून स्वच्छता करू या.. कास जपू या असा संदेश दिला.

ठळक मुद्देचार तास श्रमदानातून एक टन कचऱ्याची विल्हेवाटतलाव परिसरात विघ्नसंतोषींकडून प्लास्टिकच्या, काचेच्या बाटल्या स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत कासचे वैभव फुलविण्याचा चिमुकल्यांचा निर्धार

सातारा : जागतिक वारसा प्राप्त झालेल्या कास पठार व तलावाची स्वच्छता करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. याच भावनेतून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. सलग चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकसह तब्बल एक टन कचरा गोळा करून स्वच्छता करू या.. कास जपू या असा संदेश दिला.

जागतिक वारसा स्थळात समावेश झालेल्या कास पठार व तलावाला वर्षभरात लाखो पर्यटक भेटी देतात. पर्यटक येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या ठिकाणी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, काचेच्या बाटल्या अशा प्रकारच्या वस्तू तलाव परिसरात फेकल्या जात असल्याने सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. परिणामी येथील निसर्ग सौंदर्याला बाध पोहोचत आहे.

कास तलावातून संपूर्ण सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, कास परिसर स्वच्छ राहावा व नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबात जागृती व्हावी, या उद्देशाने गौरीशंकरच्या सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.

चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांना प्लास्टिक कागद, बाटल्या, पत्रावळ्या, काचेच्या वस्तू, कागद, गुटखा व सिगारेटची मोकळी पाकिटे असा तब्बल एक टन कचरा गोळा करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाटही लावली. चिमुकल्यांनी स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत कासचे वैभव फुलविण्याचा निर्धार यावेळी केला़

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजना गोसावी, मीनाक्षी सापते, उज्ज्वला सावंत, प्रिती पवार, राहुल भंडारे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे गौरीशंकर संस्थेचे अध्यक्ष प्रा़ मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी कौतुक केले़पर्यटकांनी कासच्या नैसर्गिक सौंदर्याचामनमुराद आनंद जरूर लुटावा़ परंतु हा आनंद उपभोगताना निसर्गाचे जतन करण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळली तर कासचे सौंदर्य अधिक खुलेल.- श्रीरंग काटेकर,जनसंपर्क अधिकारी, गौरीशंकर

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानDamधरण