शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

सातारा जिल्ह्यात पाऊस कमी; धरणात पाण्याची आवक सुरुच, कोयनेतून विसर्ग वाढला

By नितीन काळेल | Updated: July 30, 2024 13:08 IST

उरमोडीतूनही पाणी सोडणार 

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक टिकून आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊ लागला आहे. परिणामी कोयना धरणातून सुमारे ४२ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. तर उरमोडी धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर २४ तासांत महाबळेश्वरला १५८ आणि नवजा येथे १०७ मिलिमीटरची नोंद झाली.जिल्ह्यात मागील आठवड्यात धुवाधार पाऊस झाला. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करावा लागला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात आवक कायम आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०७ तर नवजाला ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ५८३, नवजा येथे ४ हजार १५४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ३ हजार ९१३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यातच सकाळच्या सुमारास कोयनेत ३५ हजार ४०१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठाही ८५.३७ टीएमसी झाला होता. तर ८१.११ टक्के धरण भरले आहे.त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. दरवाजातील विसर्ग ३० हजारावरुन ४० हजारांपर्यंत नेण्यात आला. तर पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे कोयनेतून ४२ हजार १०० क्यूसेक विसर्ग होत आहे. या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

धोम धरणातूही विसर्ग..वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ८२.५८ टक्के झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आसरे बोगद्यातून कालव्यात १०० तर वीजगृहातून २०० असा एेकूण ३०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारासही सांडव्यावरुन विसर्ग करण्याचे नियोजन होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

उरमोडीचेही दरवाजे उघडणार..सातारा तालुक्यातील उरमोडी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी वक्र दरवाजे आणि वीजगृहातून विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे उरमोडी नदीकाठच्या रहिवाशांना पात्रात प्रवेश करु नये, अशी सूचना करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण