शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

बांगलादेशी नागरिकांचे मोठ्या संख्येने महाबळेश्वरात बेकायदा वास्तव्य : किरिट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:38 IST

कोम्बिंग ऑपरेशनची मागणी

सातारा : जिल्ह्यात व महाबळेश्वरात बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येने बेकायदा वास्तव्य करत आहेत. महाबळेश्वरात सुरू असलेल्या बांधकामांवर हे नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवावे, अशी मागणी किरिट सोमय्या यांनी केली.भाजपचे नेते, माजी खासदार किरिट सोमय्या यांनी शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बेकायदा बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत चर्चा केली व शोधमोहीम राबवण्याची मागणी केली.किरिट सोमय्या म्हणाले, ‘बोगस जन्मदाखले मिळवून अनेक बांगलादेशींचे राज्यात, तसेच सातारा जिल्ह्यात वास्तव्य आहे. त्यांचा तातडीने शोध घेणे गरजेचे असून, कोम्बिंग ऑपरेशन राबवावे. राज्यातील बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांना बोगस जन्म दाखले, आधार कार्ड उपलब्ध होतात. यामागे मोठी यंत्रणा कार्यान्वित आहे. त्याचाही तातडीने शोध घ्यावा.महाबळेश्वर येथील वनसंरक्षित क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून अनेक रिसॉर्ट आणि बंगले उभे राहिलेले आहेत. मी लवकरच महाबळेश्वरला जाणार असून, अवैध बंगल्यांचे सर्वेक्षण करणार आहे. त्याची माहिती झाल्यानंतर मी पुन्हा माध्यमांशी बोलेन. सध्या काँग्रेस, उद्धवसेना, एमआयएम, समाजवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादी आदी पक्षांकडून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण सुरू असून, बांगलादेशींना वाचवण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

अवैध बांधकाम कोणाचेही असो, कारवाई होणारमहाबळेश्वरमधील संबंधित २३ मालमत्तांची यादी ऐन निवडणुकीवेळी का द्यावी वाटली, त्याठिकाणच्या बंगल्यांवर अनेक राजकीय नेते येत असल्याचा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला. यावर सोमय्या म्हणाले, ‘मी वर्षभर याचा पाठपुरावा करत आहे. पूर्ण अभ्यास झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मी माहिती दिली. त्यानुसार तपासणी सुरू आहे. ज्या कुणाचे अवैध बांधकाम सुरू आहे, त्यावर कारवाई होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

पार्थ पवार यांच्याविषयीच्या प्रश्नाला बगलउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहाराविषयीच्या प्रश्नाला सोमय्यांनी बगल दिली. ते म्हणाले, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च लक्ष घातले आहे. शासनाचे धोरण स्पष्ट आहे. कोणीही जमीन घोटाळा केला असला तरी सरकार कोणाला सोडणार नाही.’