शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी नागरिकांचे मोठ्या संख्येने महाबळेश्वरात बेकायदा वास्तव्य : किरिट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:38 IST

कोम्बिंग ऑपरेशनची मागणी

सातारा : जिल्ह्यात व महाबळेश्वरात बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येने बेकायदा वास्तव्य करत आहेत. महाबळेश्वरात सुरू असलेल्या बांधकामांवर हे नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवावे, अशी मागणी किरिट सोमय्या यांनी केली.भाजपचे नेते, माजी खासदार किरिट सोमय्या यांनी शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बेकायदा बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत चर्चा केली व शोधमोहीम राबवण्याची मागणी केली.किरिट सोमय्या म्हणाले, ‘बोगस जन्मदाखले मिळवून अनेक बांगलादेशींचे राज्यात, तसेच सातारा जिल्ह्यात वास्तव्य आहे. त्यांचा तातडीने शोध घेणे गरजेचे असून, कोम्बिंग ऑपरेशन राबवावे. राज्यातील बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांना बोगस जन्म दाखले, आधार कार्ड उपलब्ध होतात. यामागे मोठी यंत्रणा कार्यान्वित आहे. त्याचाही तातडीने शोध घ्यावा.महाबळेश्वर येथील वनसंरक्षित क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून अनेक रिसॉर्ट आणि बंगले उभे राहिलेले आहेत. मी लवकरच महाबळेश्वरला जाणार असून, अवैध बंगल्यांचे सर्वेक्षण करणार आहे. त्याची माहिती झाल्यानंतर मी पुन्हा माध्यमांशी बोलेन. सध्या काँग्रेस, उद्धवसेना, एमआयएम, समाजवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादी आदी पक्षांकडून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण सुरू असून, बांगलादेशींना वाचवण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

अवैध बांधकाम कोणाचेही असो, कारवाई होणारमहाबळेश्वरमधील संबंधित २३ मालमत्तांची यादी ऐन निवडणुकीवेळी का द्यावी वाटली, त्याठिकाणच्या बंगल्यांवर अनेक राजकीय नेते येत असल्याचा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला. यावर सोमय्या म्हणाले, ‘मी वर्षभर याचा पाठपुरावा करत आहे. पूर्ण अभ्यास झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मी माहिती दिली. त्यानुसार तपासणी सुरू आहे. ज्या कुणाचे अवैध बांधकाम सुरू आहे, त्यावर कारवाई होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

पार्थ पवार यांच्याविषयीच्या प्रश्नाला बगलउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहाराविषयीच्या प्रश्नाला सोमय्यांनी बगल दिली. ते म्हणाले, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च लक्ष घातले आहे. शासनाचे धोरण स्पष्ट आहे. कोणीही जमीन घोटाळा केला असला तरी सरकार कोणाला सोडणार नाही.’