शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

चराऊ कुरण असणारा परिसर झाला कुरणवाडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:33 IST

नितीन काळेल सातारा : प्रत्येक गावाचे एक वैशिष्ट्य असते. काळाच्या ओघात घडणाऱ्या घटना किंवा आडनावावरूनही गावाला नाव मिळते. अशाचप्रकारे ...

नितीन काळेल

सातारा : प्रत्येक गावाचे एक वैशिष्ट्य असते. काळाच्या ओघात घडणाऱ्या घटना किंवा आडनावावरूनही गावाला नाव मिळते. अशाचप्रकारे माण तालुक्यातील कुरणवाडी. सातारा जिल्ह्याचे पूर्वेचे शेवटचे टोक. तर या गावाची सीमा सांगली जिल्ह्यातील अनेक गावांशी जोडली गेलेली. या ठिकाणी एकेकाळी जंगल, पाण्याची उपलब्धताआणि चराऊ कुरण म्हणून असलेला परिसर नंतर लोकवस्तीमुळे कुरणवाडी झाला.

सातारा जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, ज्यांची नावे वेगळी वाटतात. काही गावांना तर ऐतिहासिक संदर्भ आहे. काही गावांची नावे तर तेथील लोकांच्या आडनावावरून पडलेली आहेत. त्यानंतर ती तशीच रूढ झाली आणि शासकीयस्तरावर नोंदली गेली. अशाचप्रकारे माण तालुक्यातील कुरणवडी म्हणता येईल.

३० वर्षांपूर्वी वरकुटे मलवडी गावाचा भाग असलेली ही वाडी. वरकुट्याचे विभाजन झाले आणि कुरणवाडी स्वंतत्र गाव झाले. ग्रामपंचायत स्थापन झाली. तसेच प्रशासकीय स्तरावर स्वंतत्र गाव नोंदले गेले. या गावाची लोकसंख्या १५०० च्य्या आसपास. येथील लोकांचा व्यवसाय पूर्णपणे शेती. या शेतीबरोबरच जनावरे, शेळी आणि मेंढी पालन. आजही येथील मेंढपाळ वर्षातील पाच-सहा महिने चाऱ्याच्या शोधात जिल्ह्याबाहेर जातात. त्याला काळे रान म्हणतात. सोलापूर, उस्मानाबाद ते लातूरपर्यंत जातात. त्यांच्याबरोबर कुटुंबातील कोणी तरी असते. घोड्याच्या पाठीवर संसार बांधून त्यांची भटकंती सुरू असते. तर गावी मुले शाळेत जातात. घरातील वृध्द हे मुलांकडे तसेच शेतीकडे लक्ष ठेवतात. अलीकडे मेंढपाळचे प्रमाण कमी झाले आहे. मुले शिकून नोकरी करत आहेत. कोणी व्यवसाय करत आहे. अशा या गावाचे नाव गवताळ भाग व चराऊ कुरण यामुळे पडल्याचे ग्रामस्थ सांगतात.

सुमारे १०० वर्षांपूर्वीही कुरणवाडी भागात पाण्याची उपलब्धता होती. लोकवस्ती फारशी नसल्याने गवताळ भाग अधिक होता. दाट झाडीमुळे जंगल होते. त्यामुळे वरकुटे मलवडी परिसरातील लोक तेथे जनावरे चरण्यासाठी घेऊन जायचे. येथील पाणी, जनावरांसाठी गवत पाहून कालांतराने या भागात अनेक लोक स्थलांतरित झाले. येथे आटपाडकर, मिसाळ, बनसोडे, नरळे, खांडेकर अशा आडनावाचे लोक राहतात. यामध्ये बहुतांशी आटपाडकर नावाचे लोक आहेत. यामधील अनेकजण मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले. दुष्काळामुळे स्थलांतर करत ते आटपाडी (जि. सांगली) येथे आले. त्यानंतर ते कुरण परिसरात आले. त्याचबरोबर त्यांनी येथेच वास्तव्य केले. त्यांचे आटपाडकर हे आडनाव आटपाडीवरून पडल्याचे सांगण्यात आले. दुष्काळातही पाणी उपलब्ध असल्याने कुरण परिसरात हळू-हळू लोकवस्ती वाढली. लोक शेती करू लागले आणि कुरणचे कुरणवाडी झाली.

चौकट :

साताऱ्यापासून ११२ किलोमीटर अंतरावर...

कुरणवाडी हे गाव माण तालुक्यात आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या साताऱ्यापासून जवळपास ११२ किलोमीटर अंतरावर आहे. जिल्ह्याचे हे पूर्व टोक म्हटले जाते. कारण, या गावाला लागूनच सांगली जिल्ह्याची सीमा आहे. तर हेच गाव माण तालुक्याच्या मुख्यालयापासून ५० किलोमिटरवर आहे. तालुक्याच्या दक्षिण-पूर्व बाजूला हे गाव आहे. सोलापूर जिल्ह्याची सिमाही या गावापासून जवळच आहे. येथील लोकांचा व्यवहार हा अधिक करून सांगली जिल्ह्यातील दिघंची आणि आटपाडीशी अधिक आहे.

.........................................................................