शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

चराऊ कुरण असणारा परिसर झाला कुरणवाडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:33 IST

नितीन काळेल सातारा : प्रत्येक गावाचे एक वैशिष्ट्य असते. काळाच्या ओघात घडणाऱ्या घटना किंवा आडनावावरूनही गावाला नाव मिळते. अशाचप्रकारे ...

नितीन काळेल

सातारा : प्रत्येक गावाचे एक वैशिष्ट्य असते. काळाच्या ओघात घडणाऱ्या घटना किंवा आडनावावरूनही गावाला नाव मिळते. अशाचप्रकारे माण तालुक्यातील कुरणवाडी. सातारा जिल्ह्याचे पूर्वेचे शेवटचे टोक. तर या गावाची सीमा सांगली जिल्ह्यातील अनेक गावांशी जोडली गेलेली. या ठिकाणी एकेकाळी जंगल, पाण्याची उपलब्धताआणि चराऊ कुरण म्हणून असलेला परिसर नंतर लोकवस्तीमुळे कुरणवाडी झाला.

सातारा जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, ज्यांची नावे वेगळी वाटतात. काही गावांना तर ऐतिहासिक संदर्भ आहे. काही गावांची नावे तर तेथील लोकांच्या आडनावावरून पडलेली आहेत. त्यानंतर ती तशीच रूढ झाली आणि शासकीयस्तरावर नोंदली गेली. अशाचप्रकारे माण तालुक्यातील कुरणवडी म्हणता येईल.

३० वर्षांपूर्वी वरकुटे मलवडी गावाचा भाग असलेली ही वाडी. वरकुट्याचे विभाजन झाले आणि कुरणवाडी स्वंतत्र गाव झाले. ग्रामपंचायत स्थापन झाली. तसेच प्रशासकीय स्तरावर स्वंतत्र गाव नोंदले गेले. या गावाची लोकसंख्या १५०० च्य्या आसपास. येथील लोकांचा व्यवसाय पूर्णपणे शेती. या शेतीबरोबरच जनावरे, शेळी आणि मेंढी पालन. आजही येथील मेंढपाळ वर्षातील पाच-सहा महिने चाऱ्याच्या शोधात जिल्ह्याबाहेर जातात. त्याला काळे रान म्हणतात. सोलापूर, उस्मानाबाद ते लातूरपर्यंत जातात. त्यांच्याबरोबर कुटुंबातील कोणी तरी असते. घोड्याच्या पाठीवर संसार बांधून त्यांची भटकंती सुरू असते. तर गावी मुले शाळेत जातात. घरातील वृध्द हे मुलांकडे तसेच शेतीकडे लक्ष ठेवतात. अलीकडे मेंढपाळचे प्रमाण कमी झाले आहे. मुले शिकून नोकरी करत आहेत. कोणी व्यवसाय करत आहे. अशा या गावाचे नाव गवताळ भाग व चराऊ कुरण यामुळे पडल्याचे ग्रामस्थ सांगतात.

सुमारे १०० वर्षांपूर्वीही कुरणवाडी भागात पाण्याची उपलब्धता होती. लोकवस्ती फारशी नसल्याने गवताळ भाग अधिक होता. दाट झाडीमुळे जंगल होते. त्यामुळे वरकुटे मलवडी परिसरातील लोक तेथे जनावरे चरण्यासाठी घेऊन जायचे. येथील पाणी, जनावरांसाठी गवत पाहून कालांतराने या भागात अनेक लोक स्थलांतरित झाले. येथे आटपाडकर, मिसाळ, बनसोडे, नरळे, खांडेकर अशा आडनावाचे लोक राहतात. यामध्ये बहुतांशी आटपाडकर नावाचे लोक आहेत. यामधील अनेकजण मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले. दुष्काळामुळे स्थलांतर करत ते आटपाडी (जि. सांगली) येथे आले. त्यानंतर ते कुरण परिसरात आले. त्याचबरोबर त्यांनी येथेच वास्तव्य केले. त्यांचे आटपाडकर हे आडनाव आटपाडीवरून पडल्याचे सांगण्यात आले. दुष्काळातही पाणी उपलब्ध असल्याने कुरण परिसरात हळू-हळू लोकवस्ती वाढली. लोक शेती करू लागले आणि कुरणचे कुरणवाडी झाली.

चौकट :

साताऱ्यापासून ११२ किलोमीटर अंतरावर...

कुरणवाडी हे गाव माण तालुक्यात आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या साताऱ्यापासून जवळपास ११२ किलोमीटर अंतरावर आहे. जिल्ह्याचे हे पूर्व टोक म्हटले जाते. कारण, या गावाला लागूनच सांगली जिल्ह्याची सीमा आहे. तर हेच गाव माण तालुक्याच्या मुख्यालयापासून ५० किलोमिटरवर आहे. तालुक्याच्या दक्षिण-पूर्व बाजूला हे गाव आहे. सोलापूर जिल्ह्याची सिमाही या गावापासून जवळच आहे. येथील लोकांचा व्यवहार हा अधिक करून सांगली जिल्ह्यातील दिघंची आणि आटपाडीशी अधिक आहे.

.........................................................................