शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चराऊ कुरण असणारा परिसर झाला कुरणवाडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:33 IST

नितीन काळेल सातारा : प्रत्येक गावाचे एक वैशिष्ट्य असते. काळाच्या ओघात घडणाऱ्या घटना किंवा आडनावावरूनही गावाला नाव मिळते. अशाचप्रकारे ...

नितीन काळेल

सातारा : प्रत्येक गावाचे एक वैशिष्ट्य असते. काळाच्या ओघात घडणाऱ्या घटना किंवा आडनावावरूनही गावाला नाव मिळते. अशाचप्रकारे माण तालुक्यातील कुरणवाडी. सातारा जिल्ह्याचे पूर्वेचे शेवटचे टोक. तर या गावाची सीमा सांगली जिल्ह्यातील अनेक गावांशी जोडली गेलेली. या ठिकाणी एकेकाळी जंगल, पाण्याची उपलब्धताआणि चराऊ कुरण म्हणून असलेला परिसर नंतर लोकवस्तीमुळे कुरणवाडी झाला.

सातारा जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, ज्यांची नावे वेगळी वाटतात. काही गावांना तर ऐतिहासिक संदर्भ आहे. काही गावांची नावे तर तेथील लोकांच्या आडनावावरून पडलेली आहेत. त्यानंतर ती तशीच रूढ झाली आणि शासकीयस्तरावर नोंदली गेली. अशाचप्रकारे माण तालुक्यातील कुरणवडी म्हणता येईल.

३० वर्षांपूर्वी वरकुटे मलवडी गावाचा भाग असलेली ही वाडी. वरकुट्याचे विभाजन झाले आणि कुरणवाडी स्वंतत्र गाव झाले. ग्रामपंचायत स्थापन झाली. तसेच प्रशासकीय स्तरावर स्वंतत्र गाव नोंदले गेले. या गावाची लोकसंख्या १५०० च्य्या आसपास. येथील लोकांचा व्यवसाय पूर्णपणे शेती. या शेतीबरोबरच जनावरे, शेळी आणि मेंढी पालन. आजही येथील मेंढपाळ वर्षातील पाच-सहा महिने चाऱ्याच्या शोधात जिल्ह्याबाहेर जातात. त्याला काळे रान म्हणतात. सोलापूर, उस्मानाबाद ते लातूरपर्यंत जातात. त्यांच्याबरोबर कुटुंबातील कोणी तरी असते. घोड्याच्या पाठीवर संसार बांधून त्यांची भटकंती सुरू असते. तर गावी मुले शाळेत जातात. घरातील वृध्द हे मुलांकडे तसेच शेतीकडे लक्ष ठेवतात. अलीकडे मेंढपाळचे प्रमाण कमी झाले आहे. मुले शिकून नोकरी करत आहेत. कोणी व्यवसाय करत आहे. अशा या गावाचे नाव गवताळ भाग व चराऊ कुरण यामुळे पडल्याचे ग्रामस्थ सांगतात.

सुमारे १०० वर्षांपूर्वीही कुरणवाडी भागात पाण्याची उपलब्धता होती. लोकवस्ती फारशी नसल्याने गवताळ भाग अधिक होता. दाट झाडीमुळे जंगल होते. त्यामुळे वरकुटे मलवडी परिसरातील लोक तेथे जनावरे चरण्यासाठी घेऊन जायचे. येथील पाणी, जनावरांसाठी गवत पाहून कालांतराने या भागात अनेक लोक स्थलांतरित झाले. येथे आटपाडकर, मिसाळ, बनसोडे, नरळे, खांडेकर अशा आडनावाचे लोक राहतात. यामध्ये बहुतांशी आटपाडकर नावाचे लोक आहेत. यामधील अनेकजण मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले. दुष्काळामुळे स्थलांतर करत ते आटपाडी (जि. सांगली) येथे आले. त्यानंतर ते कुरण परिसरात आले. त्याचबरोबर त्यांनी येथेच वास्तव्य केले. त्यांचे आटपाडकर हे आडनाव आटपाडीवरून पडल्याचे सांगण्यात आले. दुष्काळातही पाणी उपलब्ध असल्याने कुरण परिसरात हळू-हळू लोकवस्ती वाढली. लोक शेती करू लागले आणि कुरणचे कुरणवाडी झाली.

चौकट :

साताऱ्यापासून ११२ किलोमीटर अंतरावर...

कुरणवाडी हे गाव माण तालुक्यात आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या साताऱ्यापासून जवळपास ११२ किलोमीटर अंतरावर आहे. जिल्ह्याचे हे पूर्व टोक म्हटले जाते. कारण, या गावाला लागूनच सांगली जिल्ह्याची सीमा आहे. तर हेच गाव माण तालुक्याच्या मुख्यालयापासून ५० किलोमिटरवर आहे. तालुक्याच्या दक्षिण-पूर्व बाजूला हे गाव आहे. सोलापूर जिल्ह्याची सिमाही या गावापासून जवळच आहे. येथील लोकांचा व्यवहार हा अधिक करून सांगली जिल्ह्यातील दिघंची आणि आटपाडीशी अधिक आहे.

.........................................................................