शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

निराधार ६२ युवतींच्या कपाळी ‘कुंकू’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:37 IST

कऱ्हाड : कुंकू हे सौभाग्याचं लेणं; पण ज्या युवतींवर नशीबच खट्टू झालंय त्यांच्या कपाळी कुंकवाचा टिळा उमटणार कसा? ज्यांना ...

कऱ्हाड : कुंकू हे सौभाग्याचं लेणं; पण ज्या युवतींवर नशीबच खट्टू झालंय त्यांच्या कपाळी कुंकवाचा टिळा उमटणार कसा? ज्यांना रक्ताच्या नात्यांनीही नाकारलं, त्यांचं कन्यादान करणार तरी कोण? कऱ्हाडच्या आशाकिरण संस्थेने अखेर ही जबाबदारी स्वीकारली़. अनाथ म्हणून वसतिगृहात दाखल झालेल्या ६२ मुलींचं त्यांनी कन्यादान केलं. त्यांना हक्काचं घर आणि मायेची माणसं मिळवून दिली़.

आशाकिरण वसतिगृहात दाखल होणाऱ्या युवतींपैकी बहुतांशजणी निराधार म्हणूनच वसतिगृहाची पायरी चढतात. काहीजणींचे आई-वडील हयात नसतात, तर घरच्या गरिबीमुळे काहींच्या आई-वडिलांनी घरावर तुळशीपत्र ठेवलेलं. या-ना-त्या कारणानं आपल्या माणसांना पोरक्या झालेल्या युवती या वसतिगृहाच्या उंबरठ्यावर येतात व येथेच त्या मायेची ऊब अन् आपुलकी शोधतात. वर्षानुवर्ष वसतिगृहालाच घर समजून त्या याठिकाणी वास्तव्य करतात.

रक्ताच्या नात्यातील कोणीही नसल्याने आपला कधी विवाह होईल, हे या युवतींच्या स्वप्नातही नसते; पण मुलगी उपवर होताच ‘आशाकिरण’चे सदस्य आपली ही जबाबदारी ओळखतात. संबंधित युवतीचा अनुरूप आणि कौटुंबिक स्थिती चांगली असलेल्या युवकाशी विवाह लावून दिला जातो. या विवाह सोहळ्यात आशाकिरणचे सदस्य माहेरच्या नातेवाईकांप्रमाणे सर्व जबाबदारी पार पाडतात. कऱ्हाडला १९५४ साली ही संस्था सुरू झाली. महिला व बालकल्याण विभागामार्फत या संस्थेचे काम चालते. गत काही वर्षात वसतिगृहात दाखल होणाऱ्या निराधार मुलींचा विवाह करून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून, आजअखेर ६२ युवतींचं कन्यादान या संस्थेने केले आहे.

- कोट

माहेरपणही होते संस्थेकडून

वसतिगृहातील मुलीचा विवाह ठरवताना संस्थेतील सर्व सदस्यांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. अगदी घरच्या मुलीप्रमाणे हा विवाह ठरवला जातो़. नियोजित वराची कौटुंबिक व आर्थिक स्थिती, सामाजिक स्थान याचीही पुरेपूर माहिती संकलित केली जाते. तसेच दोघांचीही रक्त तपासणी केली जाते. विवाहानंतर संबंधित मुलीचे माहेरपणही संस्थेमार्फतच केले जाते.

- चौकट

...असा होतो विवाह सोहळा

१) इच्छुक वर संस्थेत त्याबाबतचा अर्ज सादर करतात.

२) अर्ज दाखल झाल्यानंतर वधू-वराची पसंती पाहिली जाते.

३) आशाकिरणचे सदस्य युवकाचे घर, मालमत्ता पाहतात.

४) परिस्थितीची माहिती मुलीला देऊन तिचा होकार, नकार घेतला जातो.

५) पसंती झाल्यानंतर युवकाच्या कुटुंबाची माहिती घेतली जाते.

६) वधू-वराची माहिती संस्थेमार्फत पुणे आयुक्तालयांकडे सादर होते.

७) आयुक्तालयाच्या मंजुरीनंतर वधू, वराची एचआयव्ही तपासणी होते.

८) योग्य मुहूर्त पाहून विवाह सोहळा पार पाडला जातो.

- कोट

आशाकिरण वसतिगृहात दाखल होणाऱ्या मुली, महिलांची संस्थेमार्फत काळजी घेतली जाते. संस्थेमार्फत आजपर्यंत ६२ निराधार युवतींचे विवाह करण्यात आले आहेत. त्या युवतींना हक्काचे घर मिळाले आहे. सध्याही या युवती माहेर म्हणून संस्थेत येतात. काही दिवस राहून पुन्हा आपल्या सासरी निघून जातात.

- सुजाता शिंदे, प्रभारी अधीक्षक

आशाकिरण वसतिगृह, कऱ्हाड