शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

निराधार ६२ युवतींच्या कपाळी ‘कुंकू’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:37 IST

कऱ्हाड : कुंकू हे सौभाग्याचं लेणं; पण ज्या युवतींवर नशीबच खट्टू झालंय त्यांच्या कपाळी कुंकवाचा टिळा उमटणार कसा? ज्यांना ...

कऱ्हाड : कुंकू हे सौभाग्याचं लेणं; पण ज्या युवतींवर नशीबच खट्टू झालंय त्यांच्या कपाळी कुंकवाचा टिळा उमटणार कसा? ज्यांना रक्ताच्या नात्यांनीही नाकारलं, त्यांचं कन्यादान करणार तरी कोण? कऱ्हाडच्या आशाकिरण संस्थेने अखेर ही जबाबदारी स्वीकारली़. अनाथ म्हणून वसतिगृहात दाखल झालेल्या ६२ मुलींचं त्यांनी कन्यादान केलं. त्यांना हक्काचं घर आणि मायेची माणसं मिळवून दिली़.

आशाकिरण वसतिगृहात दाखल होणाऱ्या युवतींपैकी बहुतांशजणी निराधार म्हणूनच वसतिगृहाची पायरी चढतात. काहीजणींचे आई-वडील हयात नसतात, तर घरच्या गरिबीमुळे काहींच्या आई-वडिलांनी घरावर तुळशीपत्र ठेवलेलं. या-ना-त्या कारणानं आपल्या माणसांना पोरक्या झालेल्या युवती या वसतिगृहाच्या उंबरठ्यावर येतात व येथेच त्या मायेची ऊब अन् आपुलकी शोधतात. वर्षानुवर्ष वसतिगृहालाच घर समजून त्या याठिकाणी वास्तव्य करतात.

रक्ताच्या नात्यातील कोणीही नसल्याने आपला कधी विवाह होईल, हे या युवतींच्या स्वप्नातही नसते; पण मुलगी उपवर होताच ‘आशाकिरण’चे सदस्य आपली ही जबाबदारी ओळखतात. संबंधित युवतीचा अनुरूप आणि कौटुंबिक स्थिती चांगली असलेल्या युवकाशी विवाह लावून दिला जातो. या विवाह सोहळ्यात आशाकिरणचे सदस्य माहेरच्या नातेवाईकांप्रमाणे सर्व जबाबदारी पार पाडतात. कऱ्हाडला १९५४ साली ही संस्था सुरू झाली. महिला व बालकल्याण विभागामार्फत या संस्थेचे काम चालते. गत काही वर्षात वसतिगृहात दाखल होणाऱ्या निराधार मुलींचा विवाह करून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून, आजअखेर ६२ युवतींचं कन्यादान या संस्थेने केले आहे.

- कोट

माहेरपणही होते संस्थेकडून

वसतिगृहातील मुलीचा विवाह ठरवताना संस्थेतील सर्व सदस्यांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. अगदी घरच्या मुलीप्रमाणे हा विवाह ठरवला जातो़. नियोजित वराची कौटुंबिक व आर्थिक स्थिती, सामाजिक स्थान याचीही पुरेपूर माहिती संकलित केली जाते. तसेच दोघांचीही रक्त तपासणी केली जाते. विवाहानंतर संबंधित मुलीचे माहेरपणही संस्थेमार्फतच केले जाते.

- चौकट

...असा होतो विवाह सोहळा

१) इच्छुक वर संस्थेत त्याबाबतचा अर्ज सादर करतात.

२) अर्ज दाखल झाल्यानंतर वधू-वराची पसंती पाहिली जाते.

३) आशाकिरणचे सदस्य युवकाचे घर, मालमत्ता पाहतात.

४) परिस्थितीची माहिती मुलीला देऊन तिचा होकार, नकार घेतला जातो.

५) पसंती झाल्यानंतर युवकाच्या कुटुंबाची माहिती घेतली जाते.

६) वधू-वराची माहिती संस्थेमार्फत पुणे आयुक्तालयांकडे सादर होते.

७) आयुक्तालयाच्या मंजुरीनंतर वधू, वराची एचआयव्ही तपासणी होते.

८) योग्य मुहूर्त पाहून विवाह सोहळा पार पाडला जातो.

- कोट

आशाकिरण वसतिगृहात दाखल होणाऱ्या मुली, महिलांची संस्थेमार्फत काळजी घेतली जाते. संस्थेमार्फत आजपर्यंत ६२ निराधार युवतींचे विवाह करण्यात आले आहेत. त्या युवतींना हक्काचे घर मिळाले आहे. सध्याही या युवती माहेर म्हणून संस्थेत येतात. काही दिवस राहून पुन्हा आपल्या सासरी निघून जातात.

- सुजाता शिंदे, प्रभारी अधीक्षक

आशाकिरण वसतिगृह, कऱ्हाड