शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पावसाने साथ दिलीय, आता नशीब अजमावणार; सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अडीच लाख हेक्टरवर 

By नितीन काळेल | Updated: July 12, 2024 19:09 IST

८७ टक्के क्षेत्रावर पूर्ण; चांगल्या पावसाचा परिणाम 

सातारा : जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून अडीच लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ८७ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे यंदा चांगल्या पावसामुळे वेळेत पेरणी पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात खरीप आणि रबी असे दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १४ हजार ३६९, भुईमूग २९ हजार ४३५ आणि सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर राहणार असल्याचा अंदाज आहे, तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफुलाचे क्षेत्र अत्यल्प आहे.मान्सूनच्या पावसावरच खरीप हंगाम घेण्यात येतो. पाऊस वेळेत आणि चांगला झाला तर पेरणी लवकर होते. यंदा पावसाला वेळेवर आणि दमदार सुरुवात झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीही वेळेवर सुरू झाली, तसेच पेरणीला वेगही आला होता. त्यामुळे आतापर्यंत ८७ टक्क्यांवर पेरणी पूर्ण झालेली आहे. सध्या २ लाख ५० हजार ७५१ हेक्टर क्षेत्रावर पीक आहे. यामुळे लवकरच पेरणी पूर्ण होणार आहे.आतापर्यंत भाताची ५६ टक्के लागण झालेली आहे. २४ हजार ४९२ हेक्टरवर लागण करण्यात आली आहे. अजूनही पश्चिम भागात भात लागणीची कामे सुरूच आहेत, तर ज्वारीची ६ हजार ८१० हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ६१ टक्के आहे. बाजरीची पेरणी ६४ टक्के झाली आहे. सुमारे ३९ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून यंदा या पिकाखालील क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.मका पिकाची सर्वाधिक ९५ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. १४ हजार ३६९ हेक्टर पेरणी झाली आहे, तर भुईमुगाची ९१ टक्के म्हणजेच सुमारे २७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाही सोयाबीन क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत सुमारे ८७ हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाणत ११६ टक्के झाले आहे. सोयाबीनला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे असल्याचे दिसून येत आहे.

खंडाळा तालुक्यात १२७ टक्के क्षेत्रावर पेरणी..जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्याने पेरणीलाही वेग आला. त्यामुळे खंडाळा तालुक्यात आतापर्यंत १२७ टक्के पेरणी झालेली आहे. तालुक्यातील खरीप क्षेत्र १० हजार ५५६ हेक्टर आहे, तर पेरणी १३ हजार ४५० हेक्टरवर झाली आहे. सातारा तालुक्यात १८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ८६ टक्के आहे. जावळीत ११ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून ६१ टक्के प्रमाण राहिले आहे, तसेच पाटण तालुक्यातील ४० हजार ३६२ हेक्टरवर पेर झाली आहे. कऱ्हाड तालुक्यात ९२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्या ३५ हजार हेक्टरवर पिके आहेत.कोरेगाव तालुक्यात ९० टक्के पेरणी झाली. आतापर्यंत १८ हजार ७०९ हेक्टरवर पिके घेतली आहेत. खटाव तालुक्यात ८२, तर माणमध्ये ९६ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. खटावमध्ये ३७ हजार, तर माण तालुक्यात ३८ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे. फलटणला ७९, वाई तालुक्यात ८४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात फक्त ५३ टक्के पेरणी झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfarmingशेतीFarmerशेतकरीRainपाऊस