शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

वरुणराजा पावला; सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी १०६ टक्के 

By नितीन काळेल | Updated: August 26, 2024 19:17 IST

३ लाख हेक्टरवर पिकाखालील क्षेत्र : सात तालुक्यांत १०० टक्क्यांवर पेर; उत्पादनाकडून आशा 

सातारा : जिल्ह्यात जूनपासूनच वरुणराजा प्रसन्न झाल्याने यावर्षी खरीप हंगामातील पेरणी १०६ टक्के झाली आहे. ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. तर जिल्ह्यातील ७ तालुक्यांत १०० टक्क्यांवर पेरणी झालेली आहे. यावर्षी पिकांची स्थिती पाहता शेतकऱ्यांना उत्पादनाकडून आशा आहे.जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. जून महिन्यात मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला की पेरणीलाही सुरूवात होते. मागील तीन वर्षांचा अनुभवत पाहता यंदा मान्सूनचा पाऊस जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दाखल झाला. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे जूनच्या मध्यापासूनच खरीप पेरणीला सुरूवात झाली. खरीपातील पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा १०६ टक्के पेरणी झाली तर ३ लाख ५ हजार ७८८ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात भात, बाजरी, सोयाबीन, मका, खरीप ज्वारी, भुईमूग आदी प्रमुख पिके घेतली जातात. खरीपचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चीत करण्यात आलेले. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर होते. तर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार, मका १५ हजार, भुईमुगाचे २९ हजार ४३५ हेक्टर असे क्षेत्र निश्चीत होते. तर नागली, मूग, उडीद, तीळ, कारळा, सूर्यफूल यांचे क्षेत्रही जिल्ह्यात असते. पण, इतर प्रमुख पिकांच्या तुलनेत यांचे प्रमाण कमी असते. जिल्ह्यात यावर्षीही सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. ९६ हजार हेक्टरवर पीक आहे.सोयाबीन पेरणीची टक्केवारी १२८ इतकी झाली आहे. भाताची लागण ४२ हजार ६०४ हेक्टरवर आहे. ९७ टक्के क्षेत्रावर लागण झालेली आहे. बाजरीचे क्षेत्रात यंदाही घट आहे. ७३ टक्के क्षेत्रावरच पेर झालेली आहे. त्यामुळे बाजरीचे ४४ हजार हेक्टर क्षेत्र राहिले आहे. खरीप ज्वारी क्षेत्रातही घट आहे. ६१ टक्के क्षेत्र असून ६ हजार ८५८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. मका क्षेत्रात वाढ होत चालली आहे. सुमारे २२ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. मकेची १४३ टक्के पेरणी झाली आहे. भुईमुगाचे २७ हजार ४९५ हेक्टरवर पेरणी झाली. ९३ टक्के पेरणीचे प्रमाण आहे.यावर्षी पाऊस चांगला असूनही तूर क्षेत्र कमीच राहिले आहे. ४९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. तर अवघे ४७९ हेक्टर क्षेत्रात तूर आहे. मुग पेरणी वाढली आहे. मुगाची १२ हजार हेक्टरवर पेरणी झाली. तर उडीदही सुमारे चार हजार हेक्टरवर आहे. उडीद क्षेत्राची टक्केवारी १८० इतकी झाली आहे. तीळाची अवघी २८ तर कारळजाची २१ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

मका अन् सोयाबीन क्षेत्रात वाढ..जिल्ह्यात आतापर्यंत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर या तालुक्यात १०० टक्क्यांवर पेरणी झाली. यामध्ये खंडाळा तालुक्यात सर्वाधिक १४३ टक्क्यांवर पेर आहे. तर सातारा तालुक्यात ९८, जावळीत ९९, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यात प्रत्येकी ९६ टक्के पेरणी आहे. जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यात बाजरी पीक महत्वाचे असते. पण, यंदा फलटण वगळता इतर तालुक्यांत बाजरी क्षेत्रात घट आहे. सातारा, जावळी तालुक्यात भात क्षेत्रात वाढ झाली आहे. माण, खटाव, फलटण तालुक्यात मका क्षेत्रात वाढ झाली आहे. तसेच पाटण, कऱ्हाड, कोरेगाव, खटाव या तालुक्यात सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र